शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

पोलिसांना कायदा हातात घेता येणार नाही

By admin | Updated: July 28, 2016 02:47 IST

कळमना पोलीस ठाण्यात सूडभावनेने एफआयआर नोंदविण्यात आल्याचा आरोप करून दोन भंगार व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

नागपूर : कळमना पोलीस ठाण्यात सूडभावनेने एफआयआर नोंदविण्यात आल्याचा आरोप करून दोन भंगार व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी बुधवारी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता पोलिसांना कायदा हातात घेऊन कारवाई करता येणार नाही, असे मत व्यक्त करून कळमना पोलिसांना कडक शब्दांत फटकारले. करीम पटेल व रज्जाक पटेल अशी भंगार व्यावसायिकांची नावे असून ते सख्खे भाऊ होत. त्यांचे कळमन्यातील चिखली ले-आऊट येथे गोदाम आहे. कळमना पोलिसांनी २७ मार्च २०१५ रोजी गोदामावर धाड टाकली. गोदामात सनफ्लॅग व इतर कंपन्यांचे वेगवेगळ्या लांबीचे व एकूण ११ टन वजनाचे स्टील बार आढळून आले होते. या स्टील बारची किंमत पाच लाख रुपये आखण्यात आली होती. यानंतर पटेल बंधूंविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ४१४, ४६८, ४७१, ३४ व मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १२४ अन्वये एफआयआर दाखल केला. हा एफआयआर रद्द करण्यासाठी पटेल बंधूंनी उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे. अर्जावर अंतिम सुनावणी करताना न्यायालयाला कळमना पोलिसांनी या प्रकरणात कायदा हातात घेऊन कारवाई केल्याची बाब आढळून आली. यामुळे न्यायालयाने कळमना पोलिसांची कानउघाडणी केली. गोदामात चोरीचा माल ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यामुळे धाड टाकल्याचे कारण पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. परंतु या स्पष्टीकरणामुळे न्यायालयाचे समाधान झालेले नाही. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येणार आहे, याची माहिती घेण्यासाठी पोलीस उपायुक्त (झोन-५) अभिनाशकुमार यांना न्यायालयात बोलावण्यात आले होते. परंतु अभिनाशकुमार शहरात हजर नव्हते. त्यामुळे प्रकरणावर ३ आॅगस्ट रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर व अ‍ॅड. विलास डोंगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)