शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय निवासी शाळेतील ३२ विद्यार्थिनींना विषबाधा

By admin | Updated: July 27, 2014 01:17 IST

महागाव येथील शासकीय निवासी मुलींच्या शाळेतील ३२ विद्यार्थिनींना शनिवारी सकाळी विषबाधा झाल्याने त्यांना महागाव आणि सवना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर : निवासी समाजकल्याण अधिकाऱ्यावर गुन्हामहागाव/सवना (जि.यवतमाळ) : महागाव येथील शासकीय निवासी मुलींच्या शाळेतील ३२ विद्यार्थिनींना शनिवारी सकाळी विषबाधा झाल्याने त्यांना महागाव आणि सवना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असून दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी निवासी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यासह शाळेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.महागाव येथील सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मुलींची शासकीय निवासी शाळेत २०३ मुली येथे शिक्षण घेत आहेत. शनिवारी सकाळी ७ वाजता अनेक मुलींना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्या सुरू झाल्या तर काहींचे पोट दुखत होते. हा प्रकार माहीत होताच मुलींना महागावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. एका पाठोपाठ एक ३२ मुलींना येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी अत्यवस्थ असलेल्या १९ मुलींना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. महागाव येथे १३ मुलींवर उपचार करून सुटी देण्यात आल्याची माहिती महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती राठोड यांनी दिली. सवना येथे उपचार सुरू असलेल्या विद्यार्थिनींमध्ये सावित्री प्रमोद मोरे, प्राची तुकाराम सिंगाडे, सृष्टी सुरेश वाघमारे, भाग्यश्री संजय वाघमारे, अश्विनी विजय खंदारे, अस्मिता समाधान खंदारे, मनीषा मंचक पवार, सविता रोहिदास जाधव, दुर्गा अशोक चंदनकर, मंगला रामकिसन खंदारे, आरती शिवाजी चंदनकर, उषा साहेबराव वाघमारे, तृष्णा अरुण स्थूल, साक्षी विठ्ठल नरवाडे, दीक्षा अशोक साबळे, वृषिगंधा रमेश पाईकराव, दीक्षा अंबादास कांबळे, संध्या संजय काळबांडे, कांचन संतोष खंडागळे यांचा समावेश आहे. सर्व मुली १२ ते १४ वयोगटातील आहेत. या ठिकाणी शिक्षिका सुजाता पाटे सोडून कुणीही उपस्थित नव्हते. मुख्याध्यापिका मंगला भोयर यवतमाळवरून सकाळी ११ वाजता सवना रुग्णालयात दाखल झाल्या. या विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.निलेश उके यांनी सांगितले. दरम्यान, प्रभारी तहसीलदार सुशील पांडे, तलाठी ललित इंगोले यांनी शाळेत पाहणी केली. त्यावेळी मुलींनी पाणी बरोबर मिळत नसल्याची तक्रार केली. निवासी शाळेच्या अधीक्षिका गैरहजर असल्याने संपर्क होवू शकला नाही. परंतु त्यांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याची लेखी माहिती येथील तहसीलदारांना दिली असल्याचे पांडे यांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच पालक बाहेरगावावरून शाळेत दाखल झाले. (शहर प्रतिनिधी)पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखलविद्यार्थिनींना झालेल्या विषबाधाप्रकरणी आमणी बु. येथील पालक प्रमोद विठ्ठल मोरे यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून जिल्हा निवासी समाजकल्याण अधिकारी, शाळेच्या निवासी अधीक्षक शीतल तेलंगे, निवासी व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.