शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

शासकीय निवासी शाळेतील ३२ विद्यार्थिनींना विषबाधा

By admin | Updated: July 27, 2014 01:17 IST

महागाव येथील शासकीय निवासी मुलींच्या शाळेतील ३२ विद्यार्थिनींना शनिवारी सकाळी विषबाधा झाल्याने त्यांना महागाव आणि सवना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर : निवासी समाजकल्याण अधिकाऱ्यावर गुन्हामहागाव/सवना (जि.यवतमाळ) : महागाव येथील शासकीय निवासी मुलींच्या शाळेतील ३२ विद्यार्थिनींना शनिवारी सकाळी विषबाधा झाल्याने त्यांना महागाव आणि सवना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असून दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी निवासी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यासह शाळेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.महागाव येथील सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मुलींची शासकीय निवासी शाळेत २०३ मुली येथे शिक्षण घेत आहेत. शनिवारी सकाळी ७ वाजता अनेक मुलींना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्या सुरू झाल्या तर काहींचे पोट दुखत होते. हा प्रकार माहीत होताच मुलींना महागावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. एका पाठोपाठ एक ३२ मुलींना येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी अत्यवस्थ असलेल्या १९ मुलींना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. महागाव येथे १३ मुलींवर उपचार करून सुटी देण्यात आल्याची माहिती महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती राठोड यांनी दिली. सवना येथे उपचार सुरू असलेल्या विद्यार्थिनींमध्ये सावित्री प्रमोद मोरे, प्राची तुकाराम सिंगाडे, सृष्टी सुरेश वाघमारे, भाग्यश्री संजय वाघमारे, अश्विनी विजय खंदारे, अस्मिता समाधान खंदारे, मनीषा मंचक पवार, सविता रोहिदास जाधव, दुर्गा अशोक चंदनकर, मंगला रामकिसन खंदारे, आरती शिवाजी चंदनकर, उषा साहेबराव वाघमारे, तृष्णा अरुण स्थूल, साक्षी विठ्ठल नरवाडे, दीक्षा अशोक साबळे, वृषिगंधा रमेश पाईकराव, दीक्षा अंबादास कांबळे, संध्या संजय काळबांडे, कांचन संतोष खंडागळे यांचा समावेश आहे. सर्व मुली १२ ते १४ वयोगटातील आहेत. या ठिकाणी शिक्षिका सुजाता पाटे सोडून कुणीही उपस्थित नव्हते. मुख्याध्यापिका मंगला भोयर यवतमाळवरून सकाळी ११ वाजता सवना रुग्णालयात दाखल झाल्या. या विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.निलेश उके यांनी सांगितले. दरम्यान, प्रभारी तहसीलदार सुशील पांडे, तलाठी ललित इंगोले यांनी शाळेत पाहणी केली. त्यावेळी मुलींनी पाणी बरोबर मिळत नसल्याची तक्रार केली. निवासी शाळेच्या अधीक्षिका गैरहजर असल्याने संपर्क होवू शकला नाही. परंतु त्यांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याची लेखी माहिती येथील तहसीलदारांना दिली असल्याचे पांडे यांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच पालक बाहेरगावावरून शाळेत दाखल झाले. (शहर प्रतिनिधी)पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखलविद्यार्थिनींना झालेल्या विषबाधाप्रकरणी आमणी बु. येथील पालक प्रमोद विठ्ठल मोरे यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून जिल्हा निवासी समाजकल्याण अधिकारी, शाळेच्या निवासी अधीक्षक शीतल तेलंगे, निवासी व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.