शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

समाजभान जपणारी कविता

By admin | Updated: December 27, 2015 03:31 IST

वाङ्मय ही संवाद कला आहे. त्यामुळेच दोन रसिकांचा संवाद हे देखील साहित्य ठरते.

सुधाकर गायधनी : प्रीतगंधा कवितासंग्रहाचे प्रकाशननागपूर : वाङ्मय ही संवाद कला आहे. त्यामुळेच दोन रसिकांचा संवाद हे देखील साहित्य ठरते. कवयित्री माला पारधी म्हणजे कवितेचे बीजसत्व असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या या कवितासंग्रहात प्रीतीचा गंध दरवळतो पण तरीही त्यांच्या कवितेने समाजभान सोडलेले नाही. त्यांच्या कविता भावकवितेशी नातेबद्ध आहे. त्यांच्या काही कविता गझल या आकृतीबंधांची आठवण करून देणाऱ्या आहेत, असे मत ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले. कवयित्री माला पारधी यांच्या ‘प्रीतगंधा’ कवितासंग्रहाचे प्रकाशन हॉटेल रंगोली येथे सुधाकर गायधनी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, ज्येष्ठ साहित्यिक श्यामकांत कुळकर्णी, कवयित्री डॉ. रेखा लांजेवार उपस्थित होत्या. गायधनी म्हणाले, हल्ली सर्वत्र कविता गवतासारखी पसरलेली असताना ‘प्रीतगंधा’ हे बहरलेले फुलझाड आहे. डॉ. वि. स. जोग यांनी सर्व वक्त्यांच्या वक्तव्याचा परामर्श घेत कवितासंग्रहातील सौंदर्यस्थळे आणि बलस्थाने मार्मिकपणे उलगडून दाखविली. श्यामकांत कुळकर्णी यांनी कवितासंग्रहातील कवितांचे रसग्रहण केले. शैलेंद्र लेंडे म्हणाले, कवी म्हणून स्वत:ला सिद्ध करणे हे कठीण काम आहे. त्यासाठी कवीचा अभ्यास आणि चिंतन असणे आवश्यक आहे. त्याशिवाय सिद्ध करता येत नाही. माला पारधी यांच्या कवितेतून सर्वच भाव प्रभावीपणे व्यक्त झाले आहे, असे मत व्यक्त केले. रेखा लांजेवार यांनी प्रेमकवितांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैशली टालाटुले यांनी तर आभार प्राप्ती पारधी यांनी मानले. याप्रसंगी माला पारधी यांनी प्रास्ताविकातून कवितासंग्रहाची निर्मितीप्रक्रिया सांगितली. (प्रतिनिधी)