शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कवी भाऊ पंचभाई यांचे निधन

By admin | Updated: January 22, 2016 03:23 IST

‘एक वाळलेली काडी, माझ्या अंगणात आली, मले फुलव म्हणाली, मले खुलव म्हणाली. इले बिलगता जीव, माहा होये

नागपूर : ‘एक वाळलेली काडी, माझ्या अंगणात आली, मले फुलव म्हणाली, मले खुलव म्हणाली. इले बिलगता जीव, माहा होये कासावीस, तिले तिथं बी उपास, तिले इथं बी उपास...’ ‘हुंकार वादळाचे’ कविता संग्रहातील या काव्याने जनमानसात पोहोचलेले प्रसिद्ध कवी भाऊ ऊर्फ भाऊराव रामराव पंचभाई यांचे गुरुवारी पहाटे ४ वाजता नागपूर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पिंपळगाव या खेड्यात जन्मलेले भाऊ पंचभाई यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. पुढे त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एमए आणि त्यानंतर कायद्याचे शिक्षण घेतले. पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूट येथून चित्रपट निर्मात्याचे प्रशिक्षणही प्राप्त केले. काही काळ दूरदर्शनला निर्माता म्हणून काम पाहिले. २००२ पासून त्यांनी उच्च आणि जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. ते नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांचे वर्ग घेत होते. १३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जात असताना पांढराबोढी, नागपूर येथे त्यांचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू असताना ते कोमात गेले. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. भाऊ पंचभाई यांनी आपला पहिला कविता संग्रह ‘हुंकार वादळाचे’ १९८९ मध्ये काढला. यातील ‘एक वाळलेली काडी, माझ्या अंगणात आली...’ या काव्याला गायक कलावंत अनिरुद्ध बनकर यांनी संगीतबद्ध करून आपल्या आवाजातून जनमानसात पोहचविले. या कविता संग्रहाला शासनाचा पुरस्कारही मिळाला. २००४ मध्ये त्यांचा दुसरा कविता संग्रह ‘निखाऱ्यांच्या रांगोळ्या’ प्रकाशित झाला. २०१४ मध्ये ‘अभंगाच्या ठिणग्या’ आणि ‘स्पंदन पिसारा’ हा संग्रहही प्रकाशित झाला. नुकत्याच त्यांचे ‘स्वप्नगंधा’ आणि ‘कुंदनबन’ हे दोन्ही कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर होते. ‘जखमांचा अजिंठा’ हा त्यांचा ललित संग्रह आणि ‘आंबेडकरवादी साहित्य आणि समाजक्रांती’ हा वैचारिक निबंधही प्रकाशित झाला आहे. दूरदर्शनला निर्माता म्हणून असताना ‘तुफानातील दिवे’ या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्ध मिळाली होती. यात प्रसिद्ध लोककवी व लोकशाहीर वामनदादा कर्डकपासून अनेकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. १९८३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आयोजित सातव्या भारतीय दलित साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अखिल भारतीय दलित साहित्य संसदेचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.