शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
6
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
7
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
8
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
9
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
10
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
11
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
12
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
13
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
14
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
15
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
16
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
17
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
18
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
19
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
20
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण

कवी भाऊ पंचभाई यांचे निधन

By admin | Updated: January 22, 2016 03:23 IST

‘एक वाळलेली काडी, माझ्या अंगणात आली, मले फुलव म्हणाली, मले खुलव म्हणाली. इले बिलगता जीव, माहा होये

नागपूर : ‘एक वाळलेली काडी, माझ्या अंगणात आली, मले फुलव म्हणाली, मले खुलव म्हणाली. इले बिलगता जीव, माहा होये कासावीस, तिले तिथं बी उपास, तिले इथं बी उपास...’ ‘हुंकार वादळाचे’ कविता संग्रहातील या काव्याने जनमानसात पोहोचलेले प्रसिद्ध कवी भाऊ ऊर्फ भाऊराव रामराव पंचभाई यांचे गुरुवारी पहाटे ४ वाजता नागपूर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पिंपळगाव या खेड्यात जन्मलेले भाऊ पंचभाई यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. पुढे त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एमए आणि त्यानंतर कायद्याचे शिक्षण घेतले. पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूट येथून चित्रपट निर्मात्याचे प्रशिक्षणही प्राप्त केले. काही काळ दूरदर्शनला निर्माता म्हणून काम पाहिले. २००२ पासून त्यांनी उच्च आणि जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. ते नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांचे वर्ग घेत होते. १३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जात असताना पांढराबोढी, नागपूर येथे त्यांचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू असताना ते कोमात गेले. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. भाऊ पंचभाई यांनी आपला पहिला कविता संग्रह ‘हुंकार वादळाचे’ १९८९ मध्ये काढला. यातील ‘एक वाळलेली काडी, माझ्या अंगणात आली...’ या काव्याला गायक कलावंत अनिरुद्ध बनकर यांनी संगीतबद्ध करून आपल्या आवाजातून जनमानसात पोहचविले. या कविता संग्रहाला शासनाचा पुरस्कारही मिळाला. २००४ मध्ये त्यांचा दुसरा कविता संग्रह ‘निखाऱ्यांच्या रांगोळ्या’ प्रकाशित झाला. २०१४ मध्ये ‘अभंगाच्या ठिणग्या’ आणि ‘स्पंदन पिसारा’ हा संग्रहही प्रकाशित झाला. नुकत्याच त्यांचे ‘स्वप्नगंधा’ आणि ‘कुंदनबन’ हे दोन्ही कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर होते. ‘जखमांचा अजिंठा’ हा त्यांचा ललित संग्रह आणि ‘आंबेडकरवादी साहित्य आणि समाजक्रांती’ हा वैचारिक निबंधही प्रकाशित झाला आहे. दूरदर्शनला निर्माता म्हणून असताना ‘तुफानातील दिवे’ या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्ध मिळाली होती. यात प्रसिद्ध लोककवी व लोकशाहीर वामनदादा कर्डकपासून अनेकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. १९८३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आयोजित सातव्या भारतीय दलित साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अखिल भारतीय दलित साहित्य संसदेचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.