शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

ज्ञानप्राप्तीची जाणीव करवून देणारी कविता सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:10 IST

- सुधीर रसाळ : डॉ. वि. भि. कोलते व्याख्यानमाला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जीवनाचे मर्म कळायला लावते ती ...

- सुधीर रसाळ : डॉ. वि. भि. कोलते व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जीवनाचे मर्म कळायला लावते ती कविता ज्ञानाइतकीच मूलभूत असते. ज्ञानाच्या पातळीवर समांतर अनुभूती देत आणि ज्ञानप्राप्ती होत असल्याची जाणीव करवून देते ती कविता सर्वोत्तम असल्याची भावना डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. वि. भि. कोलते व्याख्यानमालेत ते बोलत होते. आभासी यंत्रणेद्वारे पार पडलेल्या या व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. कुलगुरू यांनी वि. भि. कोलते यांच्या कार्याचे स्मरण केले. माजी महापौर अटलबहादूर सिंग यांच्या पुढाकाराने डॉ. कोलते व्याख्यानमाला विद्यापीठात सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

चांगल्या कवितेबाबत कुठल्याही अभिरुचीसंपन्न वाचकाला सांगावं लागत नाही. मात्र एखाद्या कवितेला चांगली का म्हणावे, याचे निकष ठरवावे लागतात. समीक्षेचा प्रारंभ इथूनच होतो. भाषिक नवनिर्मितीची जी अनेक रूपं आहेत, त्यात काव्य, कथन आणि नाट्य ही मूलभूत रूपे निर्माण झाली आहे. कविता हे भाषेचे कलात्मक रूप आहे. ती कलात्मक अभिव्यक्तीचे साधन आणि साध्यही आहे. कवितेचे अनेक प्रकार दिसतात. पण, कवितेचे मूलभूत रूप मात्र भावकवितेतच दिसते. भावकवितेमध्ये मानवी भावना महत्वाच्या असतात. कवितेतील भाव शब्दात व्यक्त केला जातो. कवितेमध्ये शब्दाच्या वाच्यार्थातून एक अर्थ साकार होत असतानाच तो नाकारून आणखी अनेक अर्थ प्राप्त होतात. अनेक पातळ्यांवर कवितेमध्ये एक संघटना बांधली जाते. थोडक्यात चांगली कविता म्हणजे मूलभूत विचार, नाट्यात्मक रूप असलेली ती भावगर्भ अशी असते आणि ती वाचताना वाचकाला विचार आणि व्यक्तिमत्त्व संपन्न झाल्यासारखे जाणवत असल्याचे रसाळ यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर सुजित जाधव व हेमराज निखाडे यांनी तांत्रिक बाजू सांभाळल्या.

...............