शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सोयाबीन उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:24 IST

दिवाळीच्या मुहूर्तावर व्यापाºयांनी सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात केली. यावर्षी केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव ३,०५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला असला तरी खुल्या बाजारात......

ठळक मुद्देबाजारभाव गडगडले : सरकार हमीभावानुसार सोयाबीन खरेदी करणार काय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या मुहूर्तावर व्यापाºयांनी सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात केली. यावर्षी केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव ३,०५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला असला तरी खुल्या बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल १,६०० ते २,१०० रुपये भाव मिळत आहे. या व्यवहारात सोयाबीन उत्पादकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असली तरी केंद्र आणि राज्य सरकार काहीही उपाययोजना करायला तयार नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.यावर्षी नागपूर जिल्ह्यात सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. त्यातच अनुकूल वातावरणामुळे सोयाबीनचे उत्पादन समाधानकारक आहे. मात्र, ऐन सोयाबीन कापणीच्या काळात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील काही भागातील सोयाबीनला अंकुर फुटल्याने दर्जा खालावला.काही भागातील सोयाबीनचा दर्जा मात्र कायम आहे. दिवाळीमुळे तसेच देणी द्यावयाची असल्याने बहुतांश शेतकºयांनी सोयाबीनची मळणी करून ते विक्रीला बाजारात आणले. कृषी उत्पन्न बाजार समितीसह अन्य ठिकाणी मिळणारा बाजारभाव पाहून सोयाबीन उत्पादकांच्या पदरी याहीवर्षी निराशाच पडली.मागील वर्षी बाजारात सोयाबीनची अशीच अवस्था होती. पावसामुळे खराब झालेले सोयाबीन खरेदी करायला कुणीही तयार नव्हते. ती सोयाबीन शासनानेसुद्धा खरेदी केली नाही. मागील वर्षी सोयाबीनला २,६०० ते ३,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे याही वर्षी सोयाबीनला प्रति क्विंटल किमान तीन हजार रुपये भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. वास्तवात, यावर्षी सोयाबीनचा हमीभावदेखील ३,०५० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला. सोयाबीन ढेप आणि तेलाला बाजारात चांगली मागणी असतानाही सोयाबीनचे भाव मात्र कोलमडले आहेत.सध्या सोयाबीनला मिळणाºया बाजारभावामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. खरं तर जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितींच्या आवारात काटापूजन करून सोयाबीनच्या खरेदीला रीतसर सुरुवात करण्यात आली.शेतकºयांना निकड असल्याने त्यांनी सोयाबीन बाजार समितीच्या यार्डात विकायला न्यायला सुरुवात केली. परंतु सोयाबीनला हमीभावाएवढाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. सरकार शेतीमालाचा हमीभाव दरवर्षी जाहीर करते तरी कशासाठी, असा प्रश्नही काही शेतकºयांनी उपस्थित केला.सरकार खरेदी करणार काय?एखाद्या शेतीमालाला बाजारात सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्यास त्या शेतीमालाची हमीभावानुसार खरेदी करण्याची जबाबदारी ही शासनाची असते, असा नियम आहे. या नियमानुसार केंद्र किंवा राज्य सरकारने विविध ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतकºयांकडील सोयाबीन हमीभावानुसार (प्रति क्विंटल ३०५० रुपये) खरेदी करायला पाहिजे. शासनाला संपूर्ण परिस्थिती माहिती असूनही शासन बाजारात हस्तक्षेप करायला तयार नाही. बाजारात कोलमडलेले सोयाबीनचे भाव हे सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा परिणाम असल्याचा आरोप काही शेतकºयांनी केला.आंदोलनाची गरजसोयाबीनला सध्या मिळणारा भाव हा परवडण्याजोगा नाही. गेल्या रबी हंगामात तुरीचे असेच हाल झाले होते. शासनाने हमीभावाप्रमाण्ो तुरीची खरेदी केली खरी पण काही शेतकºयांना अद्यापही तुरीचे चुकारे देण्यात आले नाहीत. सत्ताधारी पक्ष शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी झुलवत आहे. दुसरीकडे, अस्मानी संकटांमुळे शेतीमालाच्या उत्पादनात घट झाली असूनही बाजारात समाधानकारक भाव मिळत नाही. त्यामुळे शेतीमालाच्या योग्य भावासाठी आंदोलनाची गरज असून, विरोधी पक्ष मात्र अशा विदारक परिस्थितीतही गप्प असल्याने शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावेशासनाने सोयाबीनचा हमीभाव ३०५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला. प्रत्यक्षात व्यापाºयांकडून २००० रुपये प्रति क्विं टलप्रमाणे सोयाबीन खरेदी केले जात आहे. हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक त्रस्त झाले आहेत. सध्या सोयाबीनला २००० ते २१०० रुपये प्रति क्विं टल भाव मिळत आहे. या भावातून सोयाबीनचा उत्पादनखर्चही भरून निघत नाही. शेतकरी आधीच संकटात असल्याने राज्य शासनाने सोयाबीनचे पडलेले भाव गांभीर्याने घ्यायला पाहिजे. यावर्षी शेतीमालाच्या उत्पादनात घट झाली आहे. तरीही शेतकºयांना कमी भाव मिळतो आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने सोयाबीनची हमीभावानुसार खरेदी करावी. त्यासाठी राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे.- कृपाल तुमाने,खासदार, रामटेक.