शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अनधिकृत ताबा हटवून महिलेला दिला भूखंड

By admin | Updated: June 1, 2016 03:14 IST

शासनाच्या योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील लोकांना भूखंड वाटप करण्यात येते. त्यानुसार नासुप्रने मौजा वांजरी येथे वाटप केलेल्या

नासुप्रची कारवाई : महिलेने मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रारनागपूर : शासनाच्या योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील लोकांना भूखंड वाटप करण्यात येते. त्यानुसार नासुप्रने मौजा वांजरी येथे वाटप केलेल्या भूखंडधारकांच्या वारस मुलीचा हक्क नाकारून दुसऱ्या व्यक्तीने त्यावर अवैध ताबा केला होता. नासुप्रच्या पथकाने मंगळवारी या जागेवरील ताबा हटवून पीडित महिलेला तिचा भूखंड मिळवून दिला.भूखंडाचा ताबा मिळावा यासाठी ही महिला गेल्या पाच महिन्यापासून नासुप्र कार्यालयात चकरा मारत होती. परंतु न्याय न मिळाल्याने या महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. नासुप्रने वांजरी येथील खसरा क्र. ३०/१, ४६ या जागेवर दुर्बल घटकातील लोकांना भूखंडाचे वाटप केले होते. येथील ३०/२ क्रमांचा भूखंड रघुवीर रामाजी गौरखेडे यांना वाटप करण्यात आला होता. ते आपल्या मुलांसह येथे वास्तव्यास होते. त्यांची मुलगी इंदिरा गणवीर व इतर मुलींचा विवाह झाला होता. १३ एप्रिल १९९० रोजी रघुवीर गौरखेडे यांच्या मुलाचे निधन झाले. त्यानंतर शेजारी असलेले पांडे यांनी भूखंड बळकावण्यासाठी गौरखेडे कुटुंबाला त्रास देणे सुरू केले. दरम्यान, १८ मार्च २०११ रोजी गौरखेडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हा भूखंड त्यांची मुलगी इंदिरा गणवीर यांंच्या नावावर करण्यात आला. असे असतानाही पांडे यांनी स्वत:चा व गौरखेडे यांचा असे दोन भूखंड शमसुद्दीन सराजुद्दीन यांना विकले. डिसेंबर २०१५ मध्ये शमसुद्दीन याने गौरखेडे यांच्या भूखंडावर बांधकाम करून अनधिकृत ताबा घेतला. याविरोधात इंदिरा गणवीर यांनी नासुप्रकडे तक्रार केली. परंतु तिला न्याय मिळाला नाही. अखेर तिने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे यासंदर्भात तक्रार केली. याची दखल घेत पीडित महिलेला न्याय देण्याचे निर्देश नासुप्रला देण्यात आले. त्यानुसार नासुप्रच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्नसोमवारी नासुप्रचे पथक अवैध ताबा हटविण्यासाठी वांजरी येथे पोहचताच अतिक्रमण करणाऱ्याने कारवाईला विरोध दर्शविला. माजी नगरसेवक व स्थानिक नेत्याच्या मुलाने नासुप्रच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु अधिकाऱ्यांनी विरोध केल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यानंतर त्याचा विरोध थांबला.