शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंदोऱ्यातील नामांतर शहीद स्मारकाची दुर्दशा

By admin | Updated: September 10, 2015 03:37 IST

नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामठी रोडवरील इंदोरा दहा नंबर पूल येथे उभारण्यात आलेल्या नामांतर शहीद स्मारकाला अवघे दोन वर्ष लोटले आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्याचे फवारे बंदच नागपूर : नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामठी रोडवरील इंदोरा दहा नंबर पूल येथे उभारण्यात आलेल्या नामांतर शहीद स्मारकाला अवघे दोन वर्ष लोटले आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या दोन वर्षातच या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. येथील पाण्याचे फवारे बंद असून सुरक्षा भिंतीवरील दिवे सुरूच झालेले नाहीत. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी लढण्यात आलेले आंदोलन हे नामांतराचे आंदोलन म्हणून ओळखले जाते. १९७८ ते १९९४ असे इतके प्रदीर्घ काळापर्यंत हे आंदोलन चालले. या आंदोलनादरम्यान नागपूर ते औरंगाबाद दरम्यान ऐतिहासिक असा लाँग मार्च काढण्यात आला होता. प्रदीर्घ काळ चाललेल्या या आंदोलनादरम्यान सुहासिनी बनसोड, गोविंद भुरेवार, भालचंद्र बोरकर, रोशन बोरकर, अविनाश डोंगरे, नारायण गायकवाड, शब्बीर अली काजल हुसैन, चंदर कांबळे, पोचिराम कांबळे, डोमाजी कुत्तरमारे, जनार्दन मवाळे, जनार्दन मस्के, रतन मेंढे, कैलाश पंडीत, रतन परदेशी, दिलीप रामटेके, ज्ञानेश्वर साखरे, अब्दुल सत्तार, प्रतिभा तायडे, दिवाकर थोरात, गौतम वाघमारे मनोज वाघमारे, शीला डोंगरे आदींसह २७ भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. नामांतराच्या या लढ्यातील या शहीद भीम सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महानगरपालिकेतर्फे इंदोरा १० नंबर पुलाजवळ सुंदर असे स्मारक उभारण्यात आले आहे. नामांतरासाठी आंदोलन करीत असलेले भीमसैनिक आणि त्यांच्यावरील लाठीहल्ला याचा सुंदर असावा देखावा तयार करण्यात आला आहे. नामांतराच्या आंदोलनात शहीद झालेल्या सर्व शहीद भीमसैनिकांची नावे कोरण्यात आली आहेत. चारही बाजूंनी सुरक्षा भिंत. त्यावरील कोरीव काम करून दिवे बसवण्यात आले. संपूर्ण स्मारकात सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. एक छोटेखानी खुले रंगमंच उभारण्यात आले. तसेच स्मारकाच्या मधोमध पाण्याचे फवारे असलेले दोन टाके तयार करण्यात आले आहे. या फवाऱ्यांवर सुंदर लाईट इफेक्ट करण्याच्या दृष्टीने लाईट्स लावण्यात आलेले आहे. २०१३ मध्ये हे स्मारक पूर्ण झाले. मोठ्या थाटात त्याचे लोकार्पण करण्यात आले.या स्मारकात दरदिवशी सायंकाळच्या सुमारास नागरिक फिरायला येतात. ४ आॅगस्ट या दिवशी तर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. दोन वर्षात स्मारकाची दुर्दशा पाहून नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)महापौरांशी चर्चा करणार नामांतर शहीद स्मारकाची दोन वर्षातच दुर्दशा व्हावी, हे योग्य नाही. काही अडचणी असतील तर त्या लगेच दूर केल्या जातील आपण स्वत: यासंदर्भात महापौरांशी भेटून चर्चा करू आणि स्मारकातील समस्या दूर करू. -डॉ. मिलिंद माने, आमदार शौचालयाची दयनीय अवस्था स्मारक परिसरात शौचालय बांधण्यात आले आहे. परंतु त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यात कुणी जाऊच शकत नाही. दरवाजा कुलुप लावून बंद करण्यात आला आहे. स्मारकातील झाडांची व्यवस्था सध्या चांगली आहे. परंतु स्मारकाच्या चारही बाजूंनी लावलेले दिवे मात्र बंद आहेत. गणेश पाठराबे, नागरिक

पाण्याची व्यवस्था नाही स्मारक अतिशय सुंदर असे बांधण्यात आले. परंतु त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र लक्ष नाही. सुरक्षेच्या दृष्टीने स्मारकात २४ तास एका गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु स्मारकात साध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना मोठी अडचण होते. पाण्याची व्यवस्था नसल्याने पाण्याचे फवारेसुद्धा बंद पडले आहेत. विनोद सोमकुवर - नागरिक