शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इंदोऱ्यातील नामांतर शहीद स्मारकाची दुर्दशा

By admin | Updated: September 10, 2015 03:37 IST

नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामठी रोडवरील इंदोरा दहा नंबर पूल येथे उभारण्यात आलेल्या नामांतर शहीद स्मारकाला अवघे दोन वर्ष लोटले आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्याचे फवारे बंदच नागपूर : नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामठी रोडवरील इंदोरा दहा नंबर पूल येथे उभारण्यात आलेल्या नामांतर शहीद स्मारकाला अवघे दोन वर्ष लोटले आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या दोन वर्षातच या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. येथील पाण्याचे फवारे बंद असून सुरक्षा भिंतीवरील दिवे सुरूच झालेले नाहीत. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी लढण्यात आलेले आंदोलन हे नामांतराचे आंदोलन म्हणून ओळखले जाते. १९७८ ते १९९४ असे इतके प्रदीर्घ काळापर्यंत हे आंदोलन चालले. या आंदोलनादरम्यान नागपूर ते औरंगाबाद दरम्यान ऐतिहासिक असा लाँग मार्च काढण्यात आला होता. प्रदीर्घ काळ चाललेल्या या आंदोलनादरम्यान सुहासिनी बनसोड, गोविंद भुरेवार, भालचंद्र बोरकर, रोशन बोरकर, अविनाश डोंगरे, नारायण गायकवाड, शब्बीर अली काजल हुसैन, चंदर कांबळे, पोचिराम कांबळे, डोमाजी कुत्तरमारे, जनार्दन मवाळे, जनार्दन मस्के, रतन मेंढे, कैलाश पंडीत, रतन परदेशी, दिलीप रामटेके, ज्ञानेश्वर साखरे, अब्दुल सत्तार, प्रतिभा तायडे, दिवाकर थोरात, गौतम वाघमारे मनोज वाघमारे, शीला डोंगरे आदींसह २७ भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. नामांतराच्या या लढ्यातील या शहीद भीम सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महानगरपालिकेतर्फे इंदोरा १० नंबर पुलाजवळ सुंदर असे स्मारक उभारण्यात आले आहे. नामांतरासाठी आंदोलन करीत असलेले भीमसैनिक आणि त्यांच्यावरील लाठीहल्ला याचा सुंदर असावा देखावा तयार करण्यात आला आहे. नामांतराच्या आंदोलनात शहीद झालेल्या सर्व शहीद भीमसैनिकांची नावे कोरण्यात आली आहेत. चारही बाजूंनी सुरक्षा भिंत. त्यावरील कोरीव काम करून दिवे बसवण्यात आले. संपूर्ण स्मारकात सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. एक छोटेखानी खुले रंगमंच उभारण्यात आले. तसेच स्मारकाच्या मधोमध पाण्याचे फवारे असलेले दोन टाके तयार करण्यात आले आहे. या फवाऱ्यांवर सुंदर लाईट इफेक्ट करण्याच्या दृष्टीने लाईट्स लावण्यात आलेले आहे. २०१३ मध्ये हे स्मारक पूर्ण झाले. मोठ्या थाटात त्याचे लोकार्पण करण्यात आले.या स्मारकात दरदिवशी सायंकाळच्या सुमारास नागरिक फिरायला येतात. ४ आॅगस्ट या दिवशी तर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. दोन वर्षात स्मारकाची दुर्दशा पाहून नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)महापौरांशी चर्चा करणार नामांतर शहीद स्मारकाची दोन वर्षातच दुर्दशा व्हावी, हे योग्य नाही. काही अडचणी असतील तर त्या लगेच दूर केल्या जातील आपण स्वत: यासंदर्भात महापौरांशी भेटून चर्चा करू आणि स्मारकातील समस्या दूर करू. -डॉ. मिलिंद माने, आमदार शौचालयाची दयनीय अवस्था स्मारक परिसरात शौचालय बांधण्यात आले आहे. परंतु त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यात कुणी जाऊच शकत नाही. दरवाजा कुलुप लावून बंद करण्यात आला आहे. स्मारकातील झाडांची व्यवस्था सध्या चांगली आहे. परंतु स्मारकाच्या चारही बाजूंनी लावलेले दिवे मात्र बंद आहेत. गणेश पाठराबे, नागरिक

पाण्याची व्यवस्था नाही स्मारक अतिशय सुंदर असे बांधण्यात आले. परंतु त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र लक्ष नाही. सुरक्षेच्या दृष्टीने स्मारकात २४ तास एका गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु स्मारकात साध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना मोठी अडचण होते. पाण्याची व्यवस्था नसल्याने पाण्याचे फवारेसुद्धा बंद पडले आहेत. विनोद सोमकुवर - नागरिक