शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

दिल्ली, मुंबईचा प्रवास सुखाचा; राजधानी, दुरंतो एक्सप्रेस कायमस्वरूपी धावणार!

By नरेश डोंगरे | Published: March 28, 2024 3:08 PM

मध्य रेल्वेचा निर्णय : मुंबई-दिल्ली आणि नागपूर-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मुंबई-दिल्ली आणि नागपूर-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत सोयीच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार आहे. विशेष म्हणजे, या चारही (जाणाऱ्या दोन आणि येणाऱ्या दोन) गाड्यांना एक अतिरिक्त वातानुकुलित (थर्ड एसी) डबाही जोडण्यात येणार आहे.

मुंबईहून दिल्ली आणि दिल्लीहून मुंबई तसेच नागपूरहून मुंबई आणि मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहून मध्य रेल्वेने राजधानी एक्सप्रेस आणि दुरांतो एक्सप्रेस काही महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्वावर सुरू केल्या होत्या. या चारही गाड्या ३१ मार्च २०२४ पर्यतच धावणार, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या चारही गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे या गाड्यांना आणखी काही एसी कोच जोडून त्या कायमस्वरूपी चालविण्यात याव्या, असा प्रस्ताव रेल्वेच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला होता. त्यावर विचार विमर्श झाल्यानंतर या चारही गाड्यांना एका थर्ड एसीचा अतिरिक्त कोच जोडून त्याला ३१ मार्चनंतरही कायमस्वरूपी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.

नव्या निर्णयानुसार, गाडी क्रमांक २२२२१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १ एप्रिल पासून चालविण्यात येईल. तर, गाडी क्रमांक २२२२२ हजरत निजामुद्दीन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -राजधानी एक्स्प्रेस दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकातून २ एप्रिल पासून चालवण्यात येईल. 

त्याचप्रमाणे १२२८९ नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस नागपूर स्थानकावरून १ एप्रिल पासून चालविण्यात येईल. तर १२२९० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर दुरांतो एक्सप्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २ एप्रिल पासून चालविण्यात येणार आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे