शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधानंतरही प्लास्टिकवर नियंत्रण येईना ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:07 IST

नागपूर : अमर्याद वापरामुळे भरमसाठ वाढलेल्या प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चार वर्षांपूर्वी त्यावर निर्बंध घातले. मात्र, अंमलबजावणीबाबत ...

नागपूर : अमर्याद वापरामुळे भरमसाठ वाढलेल्या प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चार वर्षांपूर्वी त्यावर निर्बंध घातले. मात्र, अंमलबजावणीबाबत याेग्य नियाेजन नसल्याने हवे तसे यश मिळताना दिसत नाही. नागपूर शहराचा विचार केल्यास, आजही घरातून, औद्याेगिक तसेच शासकीय व खासगी संस्थांमधून निघणाऱ्या कचऱ्यामध्ये जैविक कचऱ्यानंतर प्लास्टिकच दुसऱ्या क्रमांकावर आहे. शहरात दरराेज गाेळा हाेणाऱ्या कचऱ्यामध्ये सरासरी ६० टक्के जैविक, यानंतर १६ टक्के प्लास्टिक कचऱ्याचा समावेश आहे.

वैश्विक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाने धाेक्याची मर्यादा केव्हाच ओलांडली आणि आता हा विळखा अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी कठाेर पावले उचलण्यासाठी जगभरातून प्रयत्न हाेत आहेत. प्लास्टिक पिशव्यांवर प्रतिबंध लावल्यानंतर जागृत नागरिकांनी त्याचा वापर बंद केला, पण मायक्राॅनच्या फरकाचा आधार घेऊन सर्रास वापर हाेत आहे. अनेक खाद्यपदार्थ विक्रेता संस्थांमध्ये पेपर बॅगचा उपयाेग हाेणे ही समाधानाची गाेष्ट आहे. मात्र, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी प्लास्टिकचाच वापर हाेत आहे, तर विविध क्षेत्रांतील प्लास्टिक बाॅटलचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे वस्त्यापासून समुद्राच्या टाेकापर्यंत आणि हिमालयासारखे उंच पर्वतही प्लास्टिक प्रदूषणाने व्यापले आहेत.

नागपूर शहरातून दरराेज १२०० टनांवर कचरा गाेळा केला जाताे. म्हणजे प्रतिव्यक्ती दरराेज सरासरी ४४४ ग्रॅम कचरा बाहेर टाकताे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) ने सर्व झाेनच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधून केलेल्या सर्वेक्षणात प्लास्टिक कचऱ्याचाच समावेश अधिक असल्याचे नमूद केले आहे. सर्वाधिक प्लास्टिक शासकीय व खासगी संस्थांमधून निघताे, तर निवासी वस्त्यामधून प्रमाण कमी आहे.

निवासी वस्त्या (टक्के) व्यावसायिक क्षेत्र संस्था डम्पसाइट सरासरी

जैविक कचरा ७७ ४० ६०

प्लास्टिक कचरा ११.६० २०.१७ ३० १८ १६

पेपर वेस्ट ७.६६ २३ व २१.१६ कार्डबाेर्ड १६.८८ ११ ११.२०

- काेराेनामुळे रखडला प्लास्टिक व्यवस्थापनाचा प्लॅन

नीरीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेने प्लास्टिक प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी एक प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन ‘युनायटेड नेशन्स एनव्हायर्नमेंट प्राेग्राम’मध्ये स्वीकारण्यात आला आहे. यावर्षी जानेवारीपासून हा कार्यक्रम राबविण्यात येणार हाेता. मात्र, काेराेनामुळेच ही याेजना कार्यान्वित हाेऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले. परिस्थिती सुधारल्यास हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.