शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंदी : राज्यातील ३० हजार कोटींचे उद्योग बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 10:48 IST

राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर जवळपास २५ ते ३० टक्के अर्थात वार्षिक ३० हजार कोटी उलाढालीच्या उद्योगांवर कुऱ्हाड कोसळली आहे.

ठळक मुद्दे२२ जूनला हायकोर्टात सुनावणी

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर जवळपास २५ ते ३० टक्के अर्थात वार्षिक ३० हजार कोटी उलाढालीच्या उद्योगांवर कुऱ्हाड कोसळली आहे. बंदी टाकलेल्या वस्तूंचे उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे बेरोजगारी लाखाच्या संख्येत वाढली आहे. पण याप्रकरणी २२ जून रोजी हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच बंदीची रूषरेषा स्पष्ट होणार आहे.

लहान उद्योगांसमोर बँकांचे हप्ते फेडण्याचे संकटबँकेच्या आर्थिक पुरवठ्यावर लहान उद्योग सुरू होतात. पण बंदीमुळे सुरू असलेले उद्योग बंद झाले आहेत. त्यांच्यासमोर बँकेच्या थकीत कर्जाचे हप्ते फेडण्याचे नवे संकट उभे राहिले आहे. थकीत कर्जामुळे बँकांनाही फटका बसणार आहे. बरेच उद्योग दोन लाख ते दोन कोटींपर्यंतच्या गुंतवणुकीचे आहेत. प्लास्टिक बॅग उत्पादन हा सूक्ष्म आणि लघु उद्योग विभागात मोडणारा व्यवसाय आहे. प्लास्टिक बॅग निर्मितीत महाराष्ट्रातील प्रकल्प व उपकरणांमध्ये जवळपास चार हजार कोटींची गुंतवणूक आहे. १० हजार कोटींपेक्षा जास्त पैसा बँकांमध्ये अडकला आहे. सरकारच्या प्लास्टिक बंदी निर्णयावर २२ जूनला हायकोर्टात निर्णय होणार आहे. महाराष्ट्र प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनने सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितली आहे. मंत्रालयातील अधिकाºयांच्या सही, शिक्क्यासह कोणताही कागद अजूनही संबंधित विभागाकडे आलेला नाही. अधिकाऱ्यांसह उद्योजकही संभ्रमात आहेत. बंदीच्या सर्व बाजू न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.बेरोजगारीचे संकट, शासनाच्या महसुलावर परिणामविदर्भ प्लास्टिक इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीकांत धोंडरीकर म्हणाले, राज्यात दहा हजारांपेक्षा जास्त प्लास्टिक उद्योग आहेत. त्यापैकी विदर्भात एक हजार आणि मराठवाड्यात १५००, कोकणात एक हजार आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे सर्वाधिक कारखाने आहेत. याशिवाय प्लास्टिक गृहउद्योग लाखाच्या घरात आहे. अशा स्थितीत सरकारने बंदी टाकून काय साधले, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, देशात एकीकडे स्कील इंडिया, मेक इन इंडिया, यासारख्या विविध उपक्रमांतून लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन उद्योजकांना आणि या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना संकटात टाकले आहे. बंदीमुळे सरकारला कोट्यवधींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.या वस्तूंच्या प्लास्टिक पॅकिंगवर बंदी नाहीदूध, अन्नधान्य, औषधे, रेनकोट, नर्सरीमध्ये वापरायचे प्लास्टिक, वेफर्स, फरसाण, तिखट, मसाले, हळद, चिप्स, बिस्किट आणि वस्तूंच्या पॅकिंगसाठी लागणारे प्लास्टिक.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी