शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Election 2019; निवडणूक प्रचारालाही प्लास्टिकबंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 11:44 IST

प्लास्टिकबंदीचा फटका यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार साहित्य व्यावसायिकांना बसला असून, कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीत दिसताहेत कागदी बिल्ले कागदी साहित्य महाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारने २ ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आणली आहे. त्याचा फटका यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार साहित्य व्यावसायिकांना बसला असून, कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला आहे.ठोक विक्रेत्यांनी सांगितले की, विदर्भात प्लास्टिक प्रचार साहित्यांची जवळपास १५०० कोटींची उलाढाल आहे. केंद्र सरकारने भारत सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याच्या दिशेने निर्णय घेतल्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्लास्टिकचे प्रचार साहित्य हद्दपार झाले असून, त्याऐवजी कागदी आणि कापडी प्रचार साहित्य बाजारात आले आहेत. विक्रेते म्हणाले, कोणत्याही निवडणुकीसाठी प्रचार साहित्यांची जुळवाजुळव सहा महिन्यांपूर्वीपासून करावी लागते. उमेदवारांनी खरेदी न केल्यामुळे व्यावसायिकांजवळ प्लास्टिकचे प्रचार साहित्य पडून आहेत. निवडणूक आयोगानेही या साहित्यावर बंदी टाकली आहे. आयोगाने तसे पत्र प्रचार साहित्य तयार करणाऱ्यांना आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्वच पक्षांना पाठविले आहे. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.सध्या उत्पादकांकडे आणि बाजारात कागदी बिल्ले उपलब्ध आहेत. शिवाय उमेदवारांचे फोटो लावलेले कागदी पोस्टर्स तयार करून मिळत आहेत. बाजारात कुठेच प्लास्टिकचे प्रचार साहित्य उपलब्ध नाही. विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ तारखेला होणार आहे. सर्वच पक्षांच्या प्रचाराची लगबग सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजूनही प्रचार साहित्य व्यावसायिकांमध्ये त्याची पूर्तता करण्यासाठी धडपड सुरू आहे.नागपुरात विविध पक्षांचे प्रचार साहित्य मुंबई आणि दिल्लीहून येते. नागपुरात प्रचार साहित्यांची विक्री करणारे ५० पेक्षा जास्त ठोक आणि चिल्लर व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे अनेकांनी प्रचार साहित्यांची पूर्वनोंदणी करून आगाऊ रक्कम दिली आहे.पर्याय म्हणून आता उत्पादक पुन्हा कागदी प्रचार साहित्यांकडे वळले आहेत. विशेष म्हणजे खिशाला लावण्यात येणाऱ्या प्लास्टिक बिल्ल्यांऐवजी इतिहासात जमा झालेले कागदी बिल्ले आता परत निवडणुकांमध्ये दिसत आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019