शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

यंदा ५ लाख १०० हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:50 IST

कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या साध्य झालेल्या खरिपाच्या क्षेत्रापेक्षा यंदा सुमारे २२ हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ केली आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे.

 

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या साध्य झालेल्या खरिपाच्या क्षेत्रापेक्षा यंदा सुमारे २२ हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ केली आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे.नागपूर जिल्ह्याचे पीक लागवडीलायक क्षेत्र ६ लाख ३३ हजार २१२ हेक्टर आहे. त्यातील सर्वसाधारण खरिपाचे क्षेत्र ४ लाख ७९ हजार २०९ हेक्टर असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. सरासरी पर्जन्यमान १,०३७ मिमी असून २०१९-२० मध्ये सरासरीपेक्षा ११४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातही पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.जिल्ह्यातील खरिपासाठी या हंगामात १ लाख ५ हजार ३०० हेक्टरवर तृणधान्याचे नियोजन केले आहे. मागील वर्षी ९७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रफळावर भात, गहू, मका, ज्वारी अशा तृणधान्याचे उत्पादन घेण्यात आले होते. तर कडधान्यासाठी ६८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले आहे. मागील हंगामातही यासाठी एवढेच नियोजन असले तरी ५३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर ते यशस्वी होऊ शकले.यंदाच्या खरिपात कापसाच्या पिकाचे क्षेत्र मागील वर्षीपेक्षा १० हजार हेक्टरने वाढविण्यात आले आहे. गतवर्षी २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले होते. मात्र नियोजनापेक्षा जास्त १० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊन यंदा हे क्षेत्र वाढविण्यात आले आहे.उसाच्या खरिपाचे नियोजन मागील वर्षीएवढेच ३०० हेक्टर ठेवण्यात आले आहे. गतवर्षी उसासाठी अधिक क्षेत्रफळ गृहीत धरले असले तरी १ हजार ९०० हेक्टरवरच शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली.९२ हजार क्विंटलवर बियाणे लागणारयंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात ९२ हजार ५६४.३० क्विंटल बियाण्यांची आवश्यक्ता भासणार आहे. महाबीजच्या ३३ हजार ४१३ बियाण्यांची मागणी होणार असून या बियाण्यांमध्ये यंदा जवळपास ३ हजार क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. खासगी बियाण्यांचे गतवर्षीचे नियोजन ६५ हजारांवरून ५६ हजार १५१.३० क्विंटलवर करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :agricultureशेती