शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

योजना अमर्याद पण लाभ मर्यादित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST

शरद मिरे भिवापूर : महाडीबीटी म्हणजे ‘अर्ज एक आणि योजना अनेक’ असा गवगवा करत शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांपुढे अनुदानित ...

शरद मिरे

भिवापूर : महाडीबीटी म्हणजे ‘अर्ज एक आणि योजना अनेक’ असा गवगवा करत शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांपुढे अनुदानित बियाणांचा देखावा उभा केला. त्यानुसार तालुक्यातील तब्बल ३,२४२ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केले. मात्र त्यापैकी केवळ ५२९ शेतकऱ्यांनाच अनुदानित बियाणांची लॉटरी लागली. त्यामुळे महाडीबीटीकडे एका अर्जात अमर्याद योजनांचा समावेश असला तरी लाभ मात्र मर्यादित शेतकऱ्यांनाच मिळत आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी नानाविध योजना व साहित्य अनुदानावर मिळते. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना योजनानिहाय वेगवेगळे अर्ज यापूर्वी करावे लागायचे. एकाच अर्जात या सर्व योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने यंदापासून ‘महाडीबीटी पोर्टल’ ही सेवा अंमलात आणली. मात्र या पोर्टलवर अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा खरोखरच लाभ मिळतो का, असा प्रश्न विचारल्यास, त्याचे उत्तर मात्र नाही मिळते. कारण याला लॉटरी पद्धती कारणीभूत ठरली आहे. खरीप हंगामातील बियाणांसाठी तालुक्यातील ३,२४२ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केले. त्यापैकी केवळ ५२९ शेतकऱ्यांनाच अनुदानित सोयाबीन बियाणांची लॉटरी लागली आहे. त्यामुळे बियाणांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. अशा लॉटरी पद्धतीमुळे शेतकऱ्यांना खरेच न्याय मिळणार का, हा प्रश्नच आहे.

तूर आणि धानाचीही लॉटरी

महाडीबीटी पोर्टलमध्ये कृषी विषयक १७ ते १८ अनुदानित योजनांचा समावेश आहे. त्यासाठी तालुक्यातील ३,२४२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले. त्यापैकी सोयाबीन बियाणाकरिता ५२९ शेतकऱ्यांना लॉटरी लागली. तर धान पिकासाठी ९९ व तूर पिकासाठी १३९ शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. सोयाबीन बियाणासाठी ३५ अर्जदार शेतकरी वेटिंगवर आहेत. मात्र बियाणाची कमतरता असल्यामुळे वेटिंगवरील शेतकऱ्यांना ते मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र अनुदानित धान व तूर यातील सर्वांनाच मिळण्याची शक्यता आहे.

--

४०,२३३ हेक्टरचे नियोजन

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने गत वर्षी खरीप हंगामात ४०,२०९.४ हेक्टरमध्ये पीक लागवडीचे उद्दिष्ट साध्य केले होते. या वर्षी त्यात थोडी वाढ झाली असून ४०,२३३ हेक्टरचे उद्दिष्ट ठेवत कृषी विभागाने त्या पद्धतीचे नियोजन केले आहे. यात सोयाबीन १९,८०० हेक्टर, धान २,९६९ हेक्टर, कापूस १,४०८२ हेक्टर, मिरची १,०५७ हेक्टर, तूर १,५११ हेक्टर, ऊस १३ हेक्टर, हळद १२० हेक्टर, भाजीपाला ६७१ हेक्टरमध्ये लागवडीचे नियोजन केले आहे, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी श्याम गिरी यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोयाबीन, धान, मिरची, हळद, भाजीपाला यांचे लागवड क्षेत्र वाढले आहे. तर कापूस, तूर यांचे क्षेत्र कमी झाल्याचे दिसते.