शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नागपूरच्या कृषी महाविद्यालयाची जागा दिवसेंदिवस होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:17 IST

कृषी महाविद्यालय हे केवळ एक महाविद्यालय नसून ते नागपूर शहराची एक ओळख आहे. या महाविद्यालयातून भविष्यातील कृषी संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक निर्माण होतात. परंतु अलीकडे मात्र या महाविद्यालयाकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी असलेली महाविद्यालयाकडील जागा हळूहळू कमी होत चालली आहे. परिणामी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षण व संशोधनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व मित्र परिवार चिंतित आहे.

ठळक मुद्देकृषी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम : आजी-माजी विद्यार्थ्यांना चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी महाविद्यालय हे केवळ एक महाविद्यालय नसून ते नागपूर शहराची एक ओळख आहे. या महाविद्यालयातून भविष्यातील कृषी संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक निर्माण होतात. परंतु अलीकडे मात्र या महाविद्यालयाकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी असलेली महाविद्यालयाकडील जागा हळूहळू कमी होत चालली आहे. परिणामी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षण व संशोधनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी व मित्र परिवार चिंतित आहे.अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेले नागपूर कृषी महाविद्यालय शहराच्या अतिशय मोक्याच्या व मध्यभागी परिसरात आहे. महाविद्यालयाकडे मोक्याच्या ठिकाणी जवळपास ४४६.२१ हेक्टर जमीन होती. यात महाराजबागेचाही समावेश आहे. यापैकी ५९.३९ हेक्टर जमीन ही यापूर्वी वेगवेगळ्या शासकीय व निमशासकीय संस्थेला हस्तांतरित करण्यात आली. तर बजाजनगर, शंकरनगर, रामदासपेठ यासारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत २९.६९ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आहे. त्यामुळे सध्या कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात फक्त ३६०.१३ हेक्टर जमीन आहे.आता महापालिकेने रामदासपेठ येथील व्हीआयपी रोडला लागून असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या जमिनीवर नवीन वॉकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅक तयार करण्याचे धोरण आखले आहे. यासाठी या जमिनीवरील जुने वृक्ष तोडले जाणार आहेत. त्यामुळे येथील आजी-माजी विद्यार्थी संतापले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घणारे ९२० विद्यार्थी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे २२४ विद्यार्थी आणि कृषी व्यवस्थापनाचे शिक्षण घेणारे ६० असे एकूण १२०४ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. कृषी महाविद्यालयाच्या मानकानुसार ६० विद्यार्थ्यांसाठी किमान १०० एकर जमिनीची आवश्यकता असते. त्यामुळे जवळपास दोन हजार एकर जागा महाविद्यालयाकडे असायला हवी. सध्या कृषी महाविद्यालयाकडे सध्या ८७७.५० एकरच्या जवळपास जमीन आहे. ती मुळातच कमी आहे. त्यामुळे ही जागा अशीच कमी होत गेली तर भविष्यात महाविद्यालयाची मान्यताच संकटात सापडू शकते.अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनियर मित्र परिवाराचा पुढाकारकृषी महाविद्यालयाची ही जागा वाचविण्यासाठी अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनियर मित्र परिवारने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या मोहिमेत आजी-माजी विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीही सहभागी होत आहे. याअंतर्गत नवीन वॉकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅकच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीcollegeमहाविद्यालय