शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सी-२० परिषदेविषयी वाद उपस्थित करणारी जनहित याचिका फेटाळली

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 13, 2023 19:10 IST

जी-२० परिषदेंतर्गत होत असलेल्या सी-२० म्हणजे सिव्हिल-ट्वेंटी इंडिया परिषदेविषयी वाद उपस्थित करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली.

राकेश घानोडे

नागपूर : जी-२० परिषदेंतर्गत होत असलेल्या सी-२० म्हणजे सिव्हिल-ट्वेंटी इंडिया परिषदेविषयी वाद उपस्थित करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. तसेच निरर्थक याचिका दाखल केल्यामुळे याचिकाकर्त्यावर दहा हजार रुपयांचा दावा खर्चदेखील बसवला.

जनार्दन मून असे याचिकाकर्त्याचे नाव असून, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे २० ते २२ मार्चपर्यंत सी-२० परिषद आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष यांच्याशी संबंधित असलेल्या रामभाऊ माळगी प्रबोधिनीला या परिषदेच्या आयोजनाचे काम दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रबोधिनीचे अध्यक्ष आहेत. हे कोट्यवधी रुपयांचे काम असून, त्यासाठी टेंडर जारी करण्यात आले नाही. ही कृती सार्वजनिक निधीचा दुरुपयोग करणारी आहे, असा आरोप मून यांनी केला होता आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

केंद्र सरकार, राज्य सरकार व इतर प्रतिवादींनी मून यांचे हे आरोप फेटाळून लावले. सी-२० परिषदेसाठी केंद्र सरकारने निधी दिला नाही. परिषदेची कामे राज्य सरकारच्या निधीतून केली जात आहेत. रामभाऊ माळगी प्रबोधिनी परिषदेची संयोजक आहे. त्यासाठी टेंडर जारी करण्याची गरज नाही. जी-२० समूहाच्या शाखेने प्रबोधिनीला ही जबाबदारी दिली आहे, अशी माहितीसुद्धा न्यायालयाला दिली. परिणामी, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अश्विन इंगोले यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय