शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

मध्य प्रदेशातून भाजप नेत्यांचे फोन 'टॅप' झाले  : देवेंद्र फडणवीसांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 23:57 IST

आमच्या सरकारच्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांचे किंवा विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्याचे ‘फोन टॅपिंग’चे आदेश दिले नव्हते. उलट निवडणुकांच्या कालावधीत मध्य प्रदेशातूनच भाजप नेत्यांचे फोन ‘टॅप’ झाल्याची माहिती मिळाली असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ठळक मुद्देआमच्या कार्यकाळात आम्ही कुठलेही आदेश दिले नाहीत

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आमच्या सरकारच्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांचे किंवा विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्याचे ‘फोन टॅपिंग’चे आदेश दिले नव्हते. उलट निवडणुकांच्या कालावधीत मध्य प्रदेशातूनच भाजप नेत्यांचे फोन ‘टॅप’ झाल्याची माहिती मिळाली असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपुरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.निवडणुकांच्या काळात आमचे फोन ‘टॅप’ केले गेल्याची माहिती आहे. यासंदर्भातील तथ्य केंद्र तसेच मध्य प्रदेश सरकार शोधेल. परंतु आम्ही कधीच कुणाचे फोन ‘टॅप’ केले नाहीत. ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे त्याची विश्वासार्हता सगळ्यांना माहीत आहे, असे फडणवीस म्हणाले.‘टॅपिंग’संदर्भातील आरोपांची चौकशी व्हावी व त्याचा अहवाल सरकारने जनतेसमोर आणावा. कॉंग्रेस सरकारच्या काळात शिवसेना आणि भाजप नेत्यांचे फोन ‘टॅप’ होत होते व ती बाब बाहेरही आली होती, असेदेखील त्यांनी सांगितले. भीमा कोरेगाव प्रकरणात शहरी नक्षलवादाबाबत ज्या बाबी समोर आल्यात त्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या आहेत व त्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक असे वक्तव्य करुन पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरणाचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMediaमाध्यमे