शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

समतेचा पाया असणारे तत्त्वज्ञान कधीच मरत नाही

By admin | Updated: December 14, 2015 03:23 IST

समता, बंधूभाव व न्याय या विचारांचा पाया असलेले तत्त्वज्ञान कधीच मरत नाही. बाबासाहेबांची चळवळ या तत्त्वज्ञानावर आधारित होती....

कृष्णा किरवले यांचे मत : एससीएस व्याख्यानमालेचा दुसरा दिवसनागपूर : समता, बंधूभाव व न्याय या विचारांचा पाया असलेले तत्त्वज्ञान कधीच मरत नाही. बाबासाहेबांची चळवळ या तत्त्वज्ञानावर आधारित होती, असे मत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. कृष्णा किरवले यांनी व्यक्त केले. ते एससीएस व्याख्यानमालेत ‘आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि समकालीन पुरोगामी चळवळी’ विषयावर बोलत होते. समाजहिताला मारक चळवळींचा नाश केला पाहिजे, असे सूत्र बाबासाहेबांनी मांडले होते. मानव कल्याणासाठी उभारलेल्या चळवळी कधीच फसत नसतात. बाबासाहेबांनी वाताहत झालेल्या लोकांच्या विकासाकरिता चळवळ उभी केली होती. व्यक्ती विकासातून समाज, समाजातून राष्ट्र व राष्ट्र विकासातून विश्व विकास हे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले होते. असे करताना त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा व भावनांना चळवळीतून वजा केले होते. तत्त्वज्ञान व चळवळीला विलग करता येत नाही. त्यांचा संबंध देह व सावलीप्रमाणे आहे. पण काही लोक तत्त्वज्ञानाला विकृत करतात. त्यावर उभ्या राहिलेल्या चळवळींचा बळी जातो. चळवळी करणाऱ्या व्यक्तीने तत्त्वज्ञानावरील निष्ठा सतत जपली पाहिजे, असे किरवले यांनी सांगितले.चळीवळीमध्ये बहुसंख्य व अल्पसंख्य असा प्रश्न निर्माण होतो. बहुसंख्यांकांच्या चळवळी अल्पसंख्यांकांवर भारी पडतात. अशावेळी अल्पसंख्यांकांनी चार पावले मागे गेल्यास चुकीचे होत नाही. या पराभवातून नवीन शक्ती निर्माण होते. बाबासाहेबांनी चळवळीसंदर्भात अशी भूमिका घेतली होती, याकडे किरवले यांनी लक्ष वेधले.बाबासाहेबांनी प्राचीन वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला होता. सर्व वाचल्यावर ते बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी डोळे झाकून काहीच केले नाही. त्यांच्याजवळ वैज्ञानिक दृष्टी व मानवतावाद होता. जोसेफ निडहॅम या शास्त्रज्ञानुसार विज्ञान, तंत्रज्ञान व औद्योगिकीकरणाचा प्रसार भारतीय भूमीतून झाला आहे. पहिले वैज्ञानिक गौतम बुद्ध होते. परंतु, आपल्याकडील अभ्यासकांच्या प्रचंड मर्यादा आहेत. त्यांना या सत्य परिस्थितीचा शोध घेता आला नाही, अशी खंत किरवले यांनी व्यक्त केली.संत चोखामेळा समाज मुलींची शिक्षण संस्थेतर्फे पाचपावलीतील एससीएस शाळेच्या प्रांगणात ही तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम, उपाध्यक्ष व्ही. टी. चिकटे, एस. डी. सूर्यवंशी, सचिव पवन गजभिये, अधीक्षक प्रा. भाऊ लोखंडे, प्राचार्या मंगला पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. (प्रतिनिधी)