शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

समतेचा पाया असणारे तत्त्वज्ञान कधीच मरत नाही

By admin | Updated: December 14, 2015 03:23 IST

समता, बंधूभाव व न्याय या विचारांचा पाया असलेले तत्त्वज्ञान कधीच मरत नाही. बाबासाहेबांची चळवळ या तत्त्वज्ञानावर आधारित होती....

कृष्णा किरवले यांचे मत : एससीएस व्याख्यानमालेचा दुसरा दिवसनागपूर : समता, बंधूभाव व न्याय या विचारांचा पाया असलेले तत्त्वज्ञान कधीच मरत नाही. बाबासाहेबांची चळवळ या तत्त्वज्ञानावर आधारित होती, असे मत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. कृष्णा किरवले यांनी व्यक्त केले. ते एससीएस व्याख्यानमालेत ‘आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि समकालीन पुरोगामी चळवळी’ विषयावर बोलत होते. समाजहिताला मारक चळवळींचा नाश केला पाहिजे, असे सूत्र बाबासाहेबांनी मांडले होते. मानव कल्याणासाठी उभारलेल्या चळवळी कधीच फसत नसतात. बाबासाहेबांनी वाताहत झालेल्या लोकांच्या विकासाकरिता चळवळ उभी केली होती. व्यक्ती विकासातून समाज, समाजातून राष्ट्र व राष्ट्र विकासातून विश्व विकास हे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले होते. असे करताना त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा व भावनांना चळवळीतून वजा केले होते. तत्त्वज्ञान व चळवळीला विलग करता येत नाही. त्यांचा संबंध देह व सावलीप्रमाणे आहे. पण काही लोक तत्त्वज्ञानाला विकृत करतात. त्यावर उभ्या राहिलेल्या चळवळींचा बळी जातो. चळवळी करणाऱ्या व्यक्तीने तत्त्वज्ञानावरील निष्ठा सतत जपली पाहिजे, असे किरवले यांनी सांगितले.चळीवळीमध्ये बहुसंख्य व अल्पसंख्य असा प्रश्न निर्माण होतो. बहुसंख्यांकांच्या चळवळी अल्पसंख्यांकांवर भारी पडतात. अशावेळी अल्पसंख्यांकांनी चार पावले मागे गेल्यास चुकीचे होत नाही. या पराभवातून नवीन शक्ती निर्माण होते. बाबासाहेबांनी चळवळीसंदर्भात अशी भूमिका घेतली होती, याकडे किरवले यांनी लक्ष वेधले.बाबासाहेबांनी प्राचीन वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला होता. सर्व वाचल्यावर ते बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी डोळे झाकून काहीच केले नाही. त्यांच्याजवळ वैज्ञानिक दृष्टी व मानवतावाद होता. जोसेफ निडहॅम या शास्त्रज्ञानुसार विज्ञान, तंत्रज्ञान व औद्योगिकीकरणाचा प्रसार भारतीय भूमीतून झाला आहे. पहिले वैज्ञानिक गौतम बुद्ध होते. परंतु, आपल्याकडील अभ्यासकांच्या प्रचंड मर्यादा आहेत. त्यांना या सत्य परिस्थितीचा शोध घेता आला नाही, अशी खंत किरवले यांनी व्यक्त केली.संत चोखामेळा समाज मुलींची शिक्षण संस्थेतर्फे पाचपावलीतील एससीएस शाळेच्या प्रांगणात ही तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम, उपाध्यक्ष व्ही. टी. चिकटे, एस. डी. सूर्यवंशी, सचिव पवन गजभिये, अधीक्षक प्रा. भाऊ लोखंडे, प्राचार्या मंगला पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. (प्रतिनिधी)