शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

‘पीएचडी’साठी तीन वर्ष सुटीची अट होणार रद्द?

By admin | Updated: March 21, 2017 02:05 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’संदर्भातील नियम कडक केल्याने शेकडो उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

नागपूर विद्यापीठ : कुलगुरूंचे संकेत, विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्पष्टीकरणनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’संदर्भातील नियम कडक केल्याने शेकडो उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर ‘पीएचडी’साठी तीन वर्ष सुटीची अट रद्द होण्याची चिन्हे आहेत. खुद्द कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनीच तसे संकेत दिले आहेत. जर हा निर्णय झाला तर ‘पीएचडी’साठी इच्छुक असलेल्या अनेक शिक्षकांचा जीव भांड्यात पडणार आहे.‘पीएचडी’ नोंदणीसाठी ४ मार्चपर्यंत ‘आरआरसी’च्या (रिसर्च अ‍ॅन्ड रिकग्निशन कमिटी) बैठकी चालल्या. ‘आरआरसी’चे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आले आणि अनेकांना धक्काच बसला. ‘पीएचडी’साठी नोंदणी करायची असेल तर संबंधित उमेदवारांनी आस्थापनांच्या व्यवस्थापनांकडून तीन वर्ष रजेचे प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य असल्याची सूचना लिहिण्यात आली होती. हे प्रमाणपत्र एक महिन्याच्या आत सादर केले तरच नोंदणी शक्य होणार आहे, असे त्यात नमूद होते. एका महिन्यात तीन वर्षांची रजा मंजूर करून घेणे अनेकांसाठी अशक्यप्राय बाब आहे. खासगी व्यवस्थापनांत तर तीन वर्षांची रजा कधीच देण्यात येणार नाही. त्यामुळे आमची ‘पीएचडी’ नोंदणीचीच संधी हुकते की काय, अशी भीती अनेक उमेदवारांनी व्यक्त केली. विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘पीएचडी’ ही नियमित पूर्णकालीन पदवी असल्याचे नियमांत नमूद केले आहे. पूर्णकालीन पदवी असताना उमेदवार इतर शिक्षण किंवा इतर ठिकाणी नोकरी कशी करू शकणार, असा तर्क ठेवत विद्यापीठाने ही अट लावली होती. याबाबत आयोगाकडे अनेक तक्रारी गेल्या. यावर अखेर विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्टीकरण जारी केले. ‘पीएचडी’ पदवी ही नियमित असली तरी ती पूर्णकालीन किंवा अंशकालीन तत्त्वावर घेतली जाऊ शकते. केवळ ती विद्यापीठांच्या नियमांच्या मर्यादेत असावी. केवळ दूरस्थ शिक्षण पद्धतीतून घेतलेल्या ‘पीएचडी’ पदवीला मान्यता राहणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या स्पष्टोक्तीनंतर तीन वर्ष सुटीची आवश्यकता राहणार नाही, असेच दिसून येत आहे. याबाबत विद्यापीठाला अधिकृत पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र आयोगाच्या संकेतस्थळावर याची प्रत उपलब्ध आहे. आम्हाला पत्र प्राप्त होताच आम्ही पुढील कार्यवाही करू. कुठल्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ , असे कुलगुरू डॉ. काणे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)