शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2023 20:30 IST

Nagpur News फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर दिला पाहिजे. यातूनच निर्यातीमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्दे ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे उद्घाटन

नागपूर : भारतीय फार्मास्युटिकल क्षेत्राला जगभरात सन्मान असून भविष्यात याचा मोठा विस्तार होणार आहे. मात्र समोरील आव्हाने व संधी दोन्ही लक्षात घेता फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर दिला पाहिजे. यातूनच निर्यातीमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात शुक्रवारपासून ७१ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसला सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. वेणूगोपाल सोमानी, इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचे अध्यक्ष डॉमिनिक जॉर्डन, ‘आयपीसी’च्या स्थानिक आयोजन समितीचे मुख्य संरक्षक जगन्नाथ शिंदे, ‘आयपीसी’चे अध्यक्ष डॉ.टी.व्ही.नारायण, एपीटीआयचे अध्यक्ष डॉ.मिलिंद उमेकर, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन प्रतिनिधी डॉ. जयंत चौधरी, भारत बायोटेक इंडियन फार्मा ग्रॅज्युएट्स असोसिएशनचे एमडी डॉ. कृष्णा एल्ला, आयपीसीचे संघटन सचिव अतुल मंडलेकर व सचिव प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ.चंद्रकांत डोईफोडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, डॉ.प्रमोद खेडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय फार्मसी उद्योगाचा सातत्याने विस्तार होत आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. फार्मसी क्षेत्राला इतर लोकांशी जोडण्यासाठी कृषी आधारित उत्पादनांचा वापर करण्याची गरज आहे, असेदेखील गडकरी म्हणाले. देशातील लॉजिस्टिकचा खर्च कमी होत आहे. प्रगत देशांत लॉजिस्टिकचा खर्च १० ते १२ टक्के आहे. भारतात तो आता १६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे भविष्यात फार्मसी क्षेत्राला खूप संधी राहतील, असा विश्वासदेखील गडकरी यांनी व्यक्त केला. गडकरी यांच्या हस्ते प्रख्यात फार्मासिस्ट मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सर्वांना परवडणारी औषधे बनावी

भारतीय उत्पादने जगातील सर्वाधिक परवडणारी आणि दर्जेदार उत्पादने आहेत. जेनेरिक औषधांबरोबरच नावीन्य ही काळाची गरज आहे. यामुळे उत्पादनखर्च कमी करून औषधे सर्वांना परवडणारी बनविण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन डॉ.सोमानी यांनी केले.

गरिबांना औषधे मिळायला हवी

जगभरात काही देशांमध्ये गरजेपेक्षा जास्त औषधे उपलब्ध आहेत. मात्र, २ अब्ज लोकांना अद्यापही सहजपणे औषधे मिळू शकत नाही. या लोकांपर्यंत स्वस्त दरात औषधांचा पुरवठा झाला पाहिजे या दृष्टीने पावले उचचली पाहिजेत, असे प्रतिपादन डॉमिनिक जॉर्डन यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी