शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2023 20:30 IST

Nagpur News फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर दिला पाहिजे. यातूनच निर्यातीमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्दे ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे उद्घाटन

नागपूर : भारतीय फार्मास्युटिकल क्षेत्राला जगभरात सन्मान असून भविष्यात याचा मोठा विस्तार होणार आहे. मात्र समोरील आव्हाने व संधी दोन्ही लक्षात घेता फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर दिला पाहिजे. यातूनच निर्यातीमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात शुक्रवारपासून ७१ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसला सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. वेणूगोपाल सोमानी, इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचे अध्यक्ष डॉमिनिक जॉर्डन, ‘आयपीसी’च्या स्थानिक आयोजन समितीचे मुख्य संरक्षक जगन्नाथ शिंदे, ‘आयपीसी’चे अध्यक्ष डॉ.टी.व्ही.नारायण, एपीटीआयचे अध्यक्ष डॉ.मिलिंद उमेकर, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन प्रतिनिधी डॉ. जयंत चौधरी, भारत बायोटेक इंडियन फार्मा ग्रॅज्युएट्स असोसिएशनचे एमडी डॉ. कृष्णा एल्ला, आयपीसीचे संघटन सचिव अतुल मंडलेकर व सचिव प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ.चंद्रकांत डोईफोडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, डॉ.प्रमोद खेडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय फार्मसी उद्योगाचा सातत्याने विस्तार होत आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. फार्मसी क्षेत्राला इतर लोकांशी जोडण्यासाठी कृषी आधारित उत्पादनांचा वापर करण्याची गरज आहे, असेदेखील गडकरी म्हणाले. देशातील लॉजिस्टिकचा खर्च कमी होत आहे. प्रगत देशांत लॉजिस्टिकचा खर्च १० ते १२ टक्के आहे. भारतात तो आता १६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे भविष्यात फार्मसी क्षेत्राला खूप संधी राहतील, असा विश्वासदेखील गडकरी यांनी व्यक्त केला. गडकरी यांच्या हस्ते प्रख्यात फार्मासिस्ट मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सर्वांना परवडणारी औषधे बनावी

भारतीय उत्पादने जगातील सर्वाधिक परवडणारी आणि दर्जेदार उत्पादने आहेत. जेनेरिक औषधांबरोबरच नावीन्य ही काळाची गरज आहे. यामुळे उत्पादनखर्च कमी करून औषधे सर्वांना परवडणारी बनविण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन डॉ.सोमानी यांनी केले.

गरिबांना औषधे मिळायला हवी

जगभरात काही देशांमध्ये गरजेपेक्षा जास्त औषधे उपलब्ध आहेत. मात्र, २ अब्ज लोकांना अद्यापही सहजपणे औषधे मिळू शकत नाही. या लोकांपर्यंत स्वस्त दरात औषधांचा पुरवठा झाला पाहिजे या दृष्टीने पावले उचचली पाहिजेत, असे प्रतिपादन डॉमिनिक जॉर्डन यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी