शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2023 20:30 IST

Nagpur News फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर दिला पाहिजे. यातूनच निर्यातीमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्दे ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे उद्घाटन

नागपूर : भारतीय फार्मास्युटिकल क्षेत्राला जगभरात सन्मान असून भविष्यात याचा मोठा विस्तार होणार आहे. मात्र समोरील आव्हाने व संधी दोन्ही लक्षात घेता फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर दिला पाहिजे. यातूनच निर्यातीमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात शुक्रवारपासून ७१ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसला सुरुवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. वेणूगोपाल सोमानी, इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचे अध्यक्ष डॉमिनिक जॉर्डन, ‘आयपीसी’च्या स्थानिक आयोजन समितीचे मुख्य संरक्षक जगन्नाथ शिंदे, ‘आयपीसी’चे अध्यक्ष डॉ.टी.व्ही.नारायण, एपीटीआयचे अध्यक्ष डॉ.मिलिंद उमेकर, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन प्रतिनिधी डॉ. जयंत चौधरी, भारत बायोटेक इंडियन फार्मा ग्रॅज्युएट्स असोसिएशनचे एमडी डॉ. कृष्णा एल्ला, आयपीसीचे संघटन सचिव अतुल मंडलेकर व सचिव प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ.चंद्रकांत डोईफोडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, डॉ.प्रमोद खेडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय फार्मसी उद्योगाचा सातत्याने विस्तार होत आहे. या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. फार्मसी क्षेत्राला इतर लोकांशी जोडण्यासाठी कृषी आधारित उत्पादनांचा वापर करण्याची गरज आहे, असेदेखील गडकरी म्हणाले. देशातील लॉजिस्टिकचा खर्च कमी होत आहे. प्रगत देशांत लॉजिस्टिकचा खर्च १० ते १२ टक्के आहे. भारतात तो आता १६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे भविष्यात फार्मसी क्षेत्राला खूप संधी राहतील, असा विश्वासदेखील गडकरी यांनी व्यक्त केला. गडकरी यांच्या हस्ते प्रख्यात फार्मासिस्ट मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सर्वांना परवडणारी औषधे बनावी

भारतीय उत्पादने जगातील सर्वाधिक परवडणारी आणि दर्जेदार उत्पादने आहेत. जेनेरिक औषधांबरोबरच नावीन्य ही काळाची गरज आहे. यामुळे उत्पादनखर्च कमी करून औषधे सर्वांना परवडणारी बनविण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन डॉ.सोमानी यांनी केले.

गरिबांना औषधे मिळायला हवी

जगभरात काही देशांमध्ये गरजेपेक्षा जास्त औषधे उपलब्ध आहेत. मात्र, २ अब्ज लोकांना अद्यापही सहजपणे औषधे मिळू शकत नाही. या लोकांपर्यंत स्वस्त दरात औषधांचा पुरवठा झाला पाहिजे या दृष्टीने पावले उचचली पाहिजेत, असे प्रतिपादन डॉमिनिक जॉर्डन यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी