शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेविरुद्धची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल

By admin | Updated: September 1, 2014 01:10 IST

राज्यातील सहकारी बँक ठेवीदारांच्या हितरक्षणासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. बँकिंग रेग्युलेशन कायद्यातील

हायकोर्ट : सहकारी बँक ठेवीदारांच्या हितरक्षणाचा प्रश्ननागपूर : राज्यातील सहकारी बँक ठेवीदारांच्या हितरक्षणासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. बँकिंग रेग्युलेशन कायद्यातील तांत्रिक कलमाच्या बळावर रिझर्व्ह बँक कोट्यवधी रुपये मिळवित असून ठेवीदारांना त्याचा काहीच लाभ देण्यात येत नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. अ‍ॅड. सुनील खरे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. गैरव्यवहारामुळे बंद पडलेल्या सर्व सहकारी बँकांच्या पीडित ठेवीदारांतर्फे ते न्यायालयात आले आहेत. बँकांना परवाना देण्याचा व परवाना रद्द करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. परंतु, परवाना निलंबित करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. केंद्र शासन बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम ४५ अंतर्गत गैरव्यवहार किंवा इतर कारणांमुळे कोणत्याही बँकेचा परवाना निलंबित करू शकते. यानंतर बँकांना कोणताही व्यवहार करता येत नाही. निलंबनाचा कालावधी जास्तीतजास्त ६ महिन्यांचा राहू शकतो. परंतु, या कलमांतर्गत परवाना निलंबित करण्याचे धोरण १९९७ पासून बदलविण्यात आले. रिझर्व्ह बँक आता कलम ३५-ए अंतर्गत संबंधित बँकांवर व्यवहार न करण्याचे बंधन लादत आहे. नागपूर महिला सहकारी बँकेवर २००४ मध्ये कलम ३५-ए अंतर्गत बंधने लादण्यात आली. यामुळे ठेवीदारांना ठेव विमा योजनेंतर्गत १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम २०१० मध्ये देण्यात आली. कलम ४५ अंतर्गत कारवाई झाली असती तर ही रक्कम २००५ मध्येच मिळाली असती. ५ वर्षे रक्कम वापरायला मिळाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने सुमारे ११.५ टक्के दराने ३० कोटी रुपये उत्पन्न मिळविल्याचा दावा, याचिकाकर्त्याने केला आहे.रिझर्व्ह बँकेने कोट्यवधी रुपये मिळविले, पण एकाही ठेवीदाराला व्याज दिले नाही. अतिरिक्त उत्पन्नाचा लाभ ठेवीदारांना मिळाला पाहिजे. समता बँकेवर २००६ मध्ये लादलेली बंधने २०१० पर्यंत, तर परमात्मा बँकेवर २००८ मध्ये लादलेली बंधने अडीच वर्षे चालली. रिझर्व्ह बँकेची सिस्टर संस्था असलेल्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनतर्फे ठेव विमा योजना राबविली जाते. बंधने लादल्यानंतर बँकांकडून प्रिमियम वसुल करणे बंद व्हायला पाहिजे. परंतु, महिला बँकेकडून बंधने लादल्यानंतर ५ वर्षांपर्यंत प्रिमियम घेऊन ५० लाख रुपये कमविण्यात आले, असे याचिकाकर्त्याने नमूद केले आहे. ठेवीदारांना त्यांची मुळ रक्कम व भरपाई देण्यात यावी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.(प्रतिनिधी)