शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

रिझर्व्ह बँकेविरुद्धची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल

By admin | Updated: September 1, 2014 01:10 IST

राज्यातील सहकारी बँक ठेवीदारांच्या हितरक्षणासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. बँकिंग रेग्युलेशन कायद्यातील

हायकोर्ट : सहकारी बँक ठेवीदारांच्या हितरक्षणाचा प्रश्ननागपूर : राज्यातील सहकारी बँक ठेवीदारांच्या हितरक्षणासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. बँकिंग रेग्युलेशन कायद्यातील तांत्रिक कलमाच्या बळावर रिझर्व्ह बँक कोट्यवधी रुपये मिळवित असून ठेवीदारांना त्याचा काहीच लाभ देण्यात येत नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. अ‍ॅड. सुनील खरे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. गैरव्यवहारामुळे बंद पडलेल्या सर्व सहकारी बँकांच्या पीडित ठेवीदारांतर्फे ते न्यायालयात आले आहेत. बँकांना परवाना देण्याचा व परवाना रद्द करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. परंतु, परवाना निलंबित करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. केंद्र शासन बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम ४५ अंतर्गत गैरव्यवहार किंवा इतर कारणांमुळे कोणत्याही बँकेचा परवाना निलंबित करू शकते. यानंतर बँकांना कोणताही व्यवहार करता येत नाही. निलंबनाचा कालावधी जास्तीतजास्त ६ महिन्यांचा राहू शकतो. परंतु, या कलमांतर्गत परवाना निलंबित करण्याचे धोरण १९९७ पासून बदलविण्यात आले. रिझर्व्ह बँक आता कलम ३५-ए अंतर्गत संबंधित बँकांवर व्यवहार न करण्याचे बंधन लादत आहे. नागपूर महिला सहकारी बँकेवर २००४ मध्ये कलम ३५-ए अंतर्गत बंधने लादण्यात आली. यामुळे ठेवीदारांना ठेव विमा योजनेंतर्गत १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम २०१० मध्ये देण्यात आली. कलम ४५ अंतर्गत कारवाई झाली असती तर ही रक्कम २००५ मध्येच मिळाली असती. ५ वर्षे रक्कम वापरायला मिळाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने सुमारे ११.५ टक्के दराने ३० कोटी रुपये उत्पन्न मिळविल्याचा दावा, याचिकाकर्त्याने केला आहे.रिझर्व्ह बँकेने कोट्यवधी रुपये मिळविले, पण एकाही ठेवीदाराला व्याज दिले नाही. अतिरिक्त उत्पन्नाचा लाभ ठेवीदारांना मिळाला पाहिजे. समता बँकेवर २००६ मध्ये लादलेली बंधने २०१० पर्यंत, तर परमात्मा बँकेवर २००८ मध्ये लादलेली बंधने अडीच वर्षे चालली. रिझर्व्ह बँकेची सिस्टर संस्था असलेल्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनतर्फे ठेव विमा योजना राबविली जाते. बंधने लादल्यानंतर बँकांकडून प्रिमियम वसुल करणे बंद व्हायला पाहिजे. परंतु, महिला बँकेकडून बंधने लादल्यानंतर ५ वर्षांपर्यंत प्रिमियम घेऊन ५० लाख रुपये कमविण्यात आले, असे याचिकाकर्त्याने नमूद केले आहे. ठेवीदारांना त्यांची मुळ रक्कम व भरपाई देण्यात यावी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.(प्रतिनिधी)