शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’ प्रवेशात पर्सेन्टाईल’चा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 10:17 IST

सद्यस्थितीत सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांचे निकाल जाहीर झाले असून प्रवेशाचे वारे सुरू आहेत. मात्र ‘बीएएमएस’ व ‘बीएचएमएस’मध्ये प्रवेश घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देप्रवेश कसा मिळणार?राज्य शासनाच्या लेटलतिफीमुळे विद्यार्थी अडचणीत

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांचे निकाल जाहीर झाले असून प्रवेशाचे वारे सुरू आहेत. मात्र ‘बीएएमएस’ व ‘बीएचएमएस’मध्ये प्रवेश घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘नीट’ पात्रतेसोबतच किमान ‘पर्सेन्टाईल’ची अट लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा कक्षाने यासंदर्भातील बदल हे ‘नीट’चे निकाल जाहीर केल्यानंतर जारी केले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे प्रवेशाला मुकण्याची चिन्हे आहेत.राज्यातील ‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’ या आयुष पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे ‘नीट’मधील गुणांच्या आधारावरच होतात. ‘नीट’मध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आतापर्यंत प्रवेशासाठी पात्र ठरत होता. किमान गुणांची कुठलीही अट यापूर्वी नव्हती. मात्र यंदापासून आयुष मंत्रालयाने किमान ‘पर्सेन्टाईल’ची अट अंतर्भूत केली. यासंदर्भात मंत्रालयाने १२ फेब्रुवारी २०१८ व ५ जून २०१८ रोजी पत्राद्वारे राज्य शासनाला कळविले होते. मात्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे याची दखलच घेण्यात आली नाही व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचलीच नाही.दरम्यान, ६ जून रोजी प्रवेश परीक्षा कक्षाने प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रकदेखील जारी केले व अनेक विद्यार्थ्यांनी यासाठी ‘आॅनलाईन’ नोंदणीदेखील केली. मात्र ११ जून रोजी आयुष मंत्रालयातर्फे प्रवेशासाठी किमान ‘पर्सेन्टाईल’ची अट सर्व राज्यांनी पाळण्याची ताकीदच देण्यात आली. ‘आयुष’ मंत्रालयाचे संचालक फ्रँकलिन खोबूंग यांनी तसे पत्रच पाठविले. त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे १५ जून रोजी पत्र जारी करून या अटीनुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

आमचा दोष काय?यासंदर्भात विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. जर केंद्र शासनाने प्रवेशप्रक्रियेबाबत राज्य शासनाला फेब्रुवारी महिन्यातच कळविले होते तर ‘पर्सेन्टाईल’ची अट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचविली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर व प्रवेशासाठी अर्ज दाखल केल्यानंतर याबाबत सुधारित निकष जारी करणे हा आमच्यावर अन्याय असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

काय आहे ‘पर्सेन्टाईल’ची अट?मागील वर्षीपर्यंत ‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’ या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘नीट’मधील किमान गुणांची अट नव्हती. यंदा किमान ‘पर्सेन्टाईल’चे निकष लावण्यात आले आहेत. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ‘नीट’मध्ये किमान ५० ‘पर्सेन्टाईल’ तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४० ‘पर्सेन्टाईल’ असणे आवश्यक आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र