शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

परफॉर्मन्स सुधारा अन्यथा मंडळ, सेल बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:27 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र काम करीत आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काहीशी शिथिलता आली आहे.

ठळक मुद्देभाजप अध्यक्षांचा इशारा : महिनाभराचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र काम करीत आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काहीशी शिथिलता आली आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. याची जाणीव ठेवून पक्षाच्या आघाड्या व सेलच्या पदाधिकाºयांनी कामाला गती दिली पाहिजे. जे काम करणार नाहीत, महिनाभरात परफॉर्मन्स सुधारणार नाहीत त्या आघाड्या व सेल बरखास्त करून नव्याने नियुक्ती केली जाईल, असा इशारा शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिला.शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी भाजपाच्या विविध २२ आघाडी व सेलचे अध्यक्ष, महामंत्री यांची बैठक घेतली. यावेळी महामंत्री संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, संघटनमंत्री भोजराज डुंबे आदी उपस्थित होते. या बैठकीत आघाडी व सेलने गेल्या सहा महिन्यात कोणकोणती कामे केली, याचा आढावा घेतला. काही आघाडीचे अध्यक्ष केलेल्या कामाची माहिती व्यवस्थित सांगू शकले नाहीत तर काही बनवाबनवी करीत असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत कोहळे यांनी संबंधितांना ताकीद दिली.कोहळे म्हणाले, काही लोक फक्त पदे घेऊन घरी बसले आहेत. त्यांची आघाडी फक्त कागदावरच सुरू आहे. आता तसे होणार नाही. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. प्रत्येकाला पक्षासाठी आपले योगदान द्यायचे आहे. प्रत्येकाने केलेल्या कामाचा लेखाजोखा पक्षातर्फे ठेवला जात आहे. त्यामुळे आपल्याकडे कुणाचेही लक्ष नाही, असे कुणी समजण्याचे कारण नाही. पदाधिकारी निष्क्रिय झाले आहेत, असे निदर्शनास आले तर पद काढून घेऊन आघाडी बरखास्त करायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.आघाड्यांना साप्ताहिक बैठक सक्तीची- प्रत्येक आघाडी व सेलची शहरस्तरावर साप्ताहिक बैठक घेतली जावी. या बैठकीचा अहवाल शहर कार्यालयाकडे सादर करावा. प्रत्येक आघाडी व सेलने मंडळ तसेच प्रभागस्तरापर्यंत रचना करावी. यासाठी सक्षम कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांची नियुक्ती करावी; सोबत प्रत्येक आघाडी व सेल सोशल मीडियावर सक्रिय असावा. पक्षातर्फे राबविण्यात असलेले उपक्रम व सरकारतर्फे केली जात असलेली कामे याचा प्रचार-प्रसार करण्यात आघाड्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.