शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

‘आयआयएम-नागपूर’मधील फ्रेशर्स’ची टक्केवारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:14 IST

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये ‘आयआयएम’मध्ये प्रवेश घेणाऱ्या ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असले तरी टक्केवारीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देनोकरीतून शिक्षणाकडे परत वळलेल्या अभियंत्यांचे प्रमाण मात्र अधिकच वाणिज्य शाखेतील केवळ ६ टक्के विद्यार्थी

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये पहिल्या तीन ‘बॅच’मध्ये सर्व जागा भरल्या गेल्या नव्हत्या. ‘प्लेसमेंट’चा टक्का वाढल्याने यंदा तरी सर्व जागांवर प्रवेश होतील, असा अंदाज होता. मात्र यंदादेखील पूर्ण जागांवर प्रवेश होऊ शकला नाही. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील ‘आयआयएम’मध्ये प्रवेश घेणाऱ्या ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांचे प्रमाण उद्योगक्षेत्राचा अनुभव असलेल्यांच्या तुलनेत कमी असले तरी मागील तीन वर्षांच्या तुलनेत टक्केवारीत वाढ झाली आहे.यातही ‘आयआयएम-नागपूर’च्या या ‘बॅच’मधील बहुतांश विद्यार्थी कुठे ना कुठे कार्यरत राहून चुकले आहे. यंदाच्या ‘बॅच’मधील ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची टक्केवारी ११ टक्के इतकी आहे. ८९ टक्के विद्यार्थ्यांना ३ वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव आहे. विद्यार्थ्यांचा उद्योगक्षेत्रात कामाचा सरासरी अनुभव हा ३० महिने इतका आहे तर विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे २५ वर्षे इतके आहे.

यंदाही पूर्ण प्रवेश नाहीतदेशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे संस्थेचे पालकत्व देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या येथे उड्या पडतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात एकाही वर्षी येथील पूर्ण जागांवर प्रवेश झाले नाहीत. पहिल्या वर्षी ‘पीजीपी’ (पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमात ६० पैकी ५३ प्रवेश झाले होते तर दुसºया वर्षी हीच संख्या ५४ इतकी होती. मागील वर्षी ५७ प्रवेश होते. यंदा ‘आयआयएम’च्या जागांमध्ये दुपटीने वाढ झाली. मात्र १२० पैकी यंदा १११ जागांवरच प्रवेश झाले. मागील तीन वर्षांत ‘आयआयएम-नागपूर’ने शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर भर दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०१७-१८ मध्ये तर १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी ‘पॅकेज’मध्ये १४ टक्क्यांची वाढ दिसून आली. येथील पूर्ण जागा न भरल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.‘आयटी’ क्षेत्रातील ५२ टक्के विद्यार्थी‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ‘आयटी’ क्षेत्रातील अभियंत्यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक होते. दुसºया ‘बॅच’मध्ये ५७.१४ टक्के ‘आयटी’ अभियांत्रिकी क्षेत्रातील होते. मागील वर्षी हेच प्रमाण अवघे २ टक्के होते. तर यंदाच्या ‘बॅच’मधील ५२ टक्के विद्यार्थी हे ‘आयटी’ शाखेतील आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र