शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

‘आयआयएम-नागपूर’मधील फ्रेशर्स’ची टक्केवारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:14 IST

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये ‘आयआयएम’मध्ये प्रवेश घेणाऱ्या ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असले तरी टक्केवारीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देनोकरीतून शिक्षणाकडे परत वळलेल्या अभियंत्यांचे प्रमाण मात्र अधिकच वाणिज्य शाखेतील केवळ ६ टक्के विद्यार्थी

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये पहिल्या तीन ‘बॅच’मध्ये सर्व जागा भरल्या गेल्या नव्हत्या. ‘प्लेसमेंट’चा टक्का वाढल्याने यंदा तरी सर्व जागांवर प्रवेश होतील, असा अंदाज होता. मात्र यंदादेखील पूर्ण जागांवर प्रवेश होऊ शकला नाही. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील ‘आयआयएम’मध्ये प्रवेश घेणाऱ्या ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांचे प्रमाण उद्योगक्षेत्राचा अनुभव असलेल्यांच्या तुलनेत कमी असले तरी मागील तीन वर्षांच्या तुलनेत टक्केवारीत वाढ झाली आहे.यातही ‘आयआयएम-नागपूर’च्या या ‘बॅच’मधील बहुतांश विद्यार्थी कुठे ना कुठे कार्यरत राहून चुकले आहे. यंदाच्या ‘बॅच’मधील ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची टक्केवारी ११ टक्के इतकी आहे. ८९ टक्के विद्यार्थ्यांना ३ वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव आहे. विद्यार्थ्यांचा उद्योगक्षेत्रात कामाचा सरासरी अनुभव हा ३० महिने इतका आहे तर विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे २५ वर्षे इतके आहे.

यंदाही पूर्ण प्रवेश नाहीतदेशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे संस्थेचे पालकत्व देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या येथे उड्या पडतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात एकाही वर्षी येथील पूर्ण जागांवर प्रवेश झाले नाहीत. पहिल्या वर्षी ‘पीजीपी’ (पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमात ६० पैकी ५३ प्रवेश झाले होते तर दुसºया वर्षी हीच संख्या ५४ इतकी होती. मागील वर्षी ५७ प्रवेश होते. यंदा ‘आयआयएम’च्या जागांमध्ये दुपटीने वाढ झाली. मात्र १२० पैकी यंदा १११ जागांवरच प्रवेश झाले. मागील तीन वर्षांत ‘आयआयएम-नागपूर’ने शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर भर दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०१७-१८ मध्ये तर १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी ‘पॅकेज’मध्ये १४ टक्क्यांची वाढ दिसून आली. येथील पूर्ण जागा न भरल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.‘आयटी’ क्षेत्रातील ५२ टक्के विद्यार्थी‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ‘आयटी’ क्षेत्रातील अभियंत्यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक होते. दुसºया ‘बॅच’मध्ये ५७.१४ टक्के ‘आयटी’ अभियांत्रिकी क्षेत्रातील होते. मागील वर्षी हेच प्रमाण अवघे २ टक्के होते. तर यंदाच्या ‘बॅच’मधील ५२ टक्के विद्यार्थी हे ‘आयटी’ शाखेतील आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र