शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

श्रीमंतांच्या वस्तीत मजुरांना मिळेना घोटभर पाणी

By admin | Updated: April 13, 2017 02:57 IST

पाण्याला धर्म मानणारा देश आपला. तहानलेल्याला घोटभर पाणी देणे, हे आपल्या येथे पुण्याचे काम समजले जाते.

स्मार्ट सिटीत काम करणाऱ्या मजुरांची व्यथा : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण मंगेश व्यवहारे   नागपूर पाण्याला धर्म मानणारा देश आपला. तहानलेल्याला घोटभर पाणी देणे, हे आपल्या येथे पुण्याचे काम समजले जाते. परंतु बदलत्या काळासोबत ही पुण्याची भावनाही बदलत चालल्याची प्रचिती आपल्या नागपुरातही यायला लागली आहे. शहराला स्मार्ट करण्यासाठी शरीर होरपळून टाकणाऱ्या या प्रखर उन्हात सध्या शेकडो मजूर राबत आहेत. परंतु श्रीमंतांच्या या वस्तीला आपल्या परिश्रमाने सजवणारे हे मजूर घोटभर पाण्यालाही महाग झाले आहेत. या मजुरांची अर्धनग्न लेकरे पाण्यासाठी दारोदार भटकत असताना एसी, कूलरच्या गारव्यात वामकुक्षी घेणारे कुणीही दार उघडून त्यांना दोन घोट पाणी द्यायला तयार नाही. नागपूर शहराला स्मार्ट सिटीचा लूक देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी शहरभर भरपूर विकास कामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी परराज्यातील मजूर मोठ्या संख्येने नागपुरात आले आहेत. ४३ डिग्री तापमानात त्यांची अंगमेहनत सुरू आहे. अशात घशाला कोरड पडली की ते पाणी शोधतात, पण प्यायला पाणी मिळत नाही. एखाद्याने दिलेच तर चेहऱ्यावर त्रासिक भाव असतात. त्याचा तो त्रासिक चेहरा पाहून पुन्हा त्याच्या दारात जाण्याला या मजुरांचा स्वाभिमान परवानगी देत नाही. अबोल प्राणी-पक्ष्यांसाठी आपल्या अंगणात पाणी ठेवा, असे सोशल मीडियावर आवाहन करणाऱ्या आपल्या सभोवतालच्या तथाकथित समाजसेवकांना या बोलक्या मानवप्राण्यांची तहान कशी जाणवत नसेल, प्रश्नच आहे. हे सर्व मजूर शहरातील अनेक भागात रस्त्याचे सिमेंटीकरण, मेट्रोचे, फायबर आॅप्टिकसाठी नाल्या खोदण्याचे काम करीत आहेत. यातील बहुतांश मजूर हे परराज्यातील आहेत. अंगमेहनतीचे काम करीत असताना त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा बरसतात, घशाला कोरड पडते; पण फ्लॅट्स, बंगल्यांची दारे कडेकोट लागलेली. पिण्याचे पाणी मागायला जायचे तर कुठे, असा प्रश्न मजुरांना त्रस्त करीत आहे. कि मान एवढे करा नागपूरच्या विकासात आपला घाम ओतत असताना, नागपूरकरांना त्यांची व्यथा समजायला हवी. अनेकजण पशुपक्ष्यांसाठी जसे घराबाहेर पाण्याची सोय करतात. तशीच काहीशी सोय ज्या भागात मजुरांचे काम सुरू आहे, तिथे उपलब्ध करून द्यावी. त्यांना फ्रीजचे गार पाणी नको. तहान भागविण्यासाठी सार्वजनिक नळाचे पाणीसुद्धा त्यांना चालेल. अंगमेहनतीमुळे त्यांच्या गळ्याची कोरड सुटावी, त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांची पाण्यासाठी ओरड थांबावी, एवढीच अपेक्षा.