शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना विचार करण्यापासून रोखले जातेय

By admin | Updated: May 9, 2014 02:20 IST

लेखनाची वैचारिक बैठकच नष्ट होत असेल तर ती गंभीर आणि चिंतेची बाब असून, अविवेकी लोकांची जमात वाढत चालल्याचे आणि विचारवंतांची जात संपत चालल्याचे ते लक्षण आहे

नागपूर : लेखनाची वैचारिक बैठकच नष्ट होत असेल तर ती गंभीर आणि चिंतेची बाब असून, अविवेकी लोकांची जमात वाढत चालल्याचे आणि विचारवंतांची जात संपत चालल्याचे ते लक्षण आहे. विचारच संपत चालल्याची प्रक्रिया वेगवान होत असल्याचेही ते लक्षण आहे. असा वैचारिकदृष्ट्या कुपोषित समाज लोकशाहीसाठी गंभीर धोका निर्माण करीत आहे, असा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केला. मराठीतील वैचारिक लेखनाचे काय झाले? या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.प्रगतिशील लेखक संघ आणि धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत मनोहर तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुनीती देव, डॉ. इंद्रजित ओरके उपस्थित होते. हा परिसंवाद राजाराम वाचनालय, धरमपेठ येथे पार पडला. डॉ. सुनीती देव म्हणाल्या, मराठीतील सर्व वाड्मय प्रकार आणि कलांचा पाया वैचारिक बाजूंनी समृद्ध आहे. यासंदर्भातली अनेक उदाहरणे त्यांनी दिली.विचार करायला प्रवृत्त करते ते वैचारिक लेखन, अशी वैचारिकतेची व्याख्या त्यांनी केली.डॉ. इंद्रजित ओरके म्हणाले, मराठीला वैचारिक लेखनाची समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा परिवर्तनवादी, प्रबोधनकारी, मार्क्‍सवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी यांच्यात विखुरली आहे. पण विशिष्ट धर्माधिष्ठित बाबींच्या प्रभावाखाली मराठी लेखनाने ही परंपरा पंगू केल्याचे आता जाणवते आहे. त्यामुळेच प्रागतिक विचारांच्या हाती राजसत्ता येत नाही.यासाठी नव्या वैचारिक प्रबोधनाची नितांत गरज आता निर्माण झाली आहे. साहित्य संस्थांचे कार्यही फारसे आशादायी नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हायची असेल तर सध्याची स्थिती बदलून मराठीत वैचारिक आणि सैद्धांतिक लेखन मजबुतीने झाले पाहिजे. वैचारिक ग्रंथांची निर्मिती न होणे ही चिंतेची बाब आहे. विचारवंतांना पचविण्याची सवय समाजाला त्यासाठी लागली पाहिजे.विचारच करता न येणे हा लोकांचा खरा प्रश्न आहे. भारतातली तरुण पिढी हा विचार करू शकते पण तो केला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन प्रसेनजित गायकवाड यांनी तर आभार प्रकाश दुलेवाले यांनी मानले. (प्रतिनिधी)