शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

लोकांना विचार करण्यापासून रोखले जातेय

By admin | Updated: May 9, 2014 02:20 IST

लेखनाची वैचारिक बैठकच नष्ट होत असेल तर ती गंभीर आणि चिंतेची बाब असून, अविवेकी लोकांची जमात वाढत चालल्याचे आणि विचारवंतांची जात संपत चालल्याचे ते लक्षण आहे

नागपूर : लेखनाची वैचारिक बैठकच नष्ट होत असेल तर ती गंभीर आणि चिंतेची बाब असून, अविवेकी लोकांची जमात वाढत चालल्याचे आणि विचारवंतांची जात संपत चालल्याचे ते लक्षण आहे. विचारच संपत चालल्याची प्रक्रिया वेगवान होत असल्याचेही ते लक्षण आहे. असा वैचारिकदृष्ट्या कुपोषित समाज लोकशाहीसाठी गंभीर धोका निर्माण करीत आहे, असा विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. शैलेंद्र लेंडे यांनी व्यक्त केला. मराठीतील वैचारिक लेखनाचे काय झाले? या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.प्रगतिशील लेखक संघ आणि धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत मनोहर तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुनीती देव, डॉ. इंद्रजित ओरके उपस्थित होते. हा परिसंवाद राजाराम वाचनालय, धरमपेठ येथे पार पडला. डॉ. सुनीती देव म्हणाल्या, मराठीतील सर्व वाड्मय प्रकार आणि कलांचा पाया वैचारिक बाजूंनी समृद्ध आहे. यासंदर्भातली अनेक उदाहरणे त्यांनी दिली.विचार करायला प्रवृत्त करते ते वैचारिक लेखन, अशी वैचारिकतेची व्याख्या त्यांनी केली.डॉ. इंद्रजित ओरके म्हणाले, मराठीला वैचारिक लेखनाची समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा परिवर्तनवादी, प्रबोधनकारी, मार्क्‍सवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी यांच्यात विखुरली आहे. पण विशिष्ट धर्माधिष्ठित बाबींच्या प्रभावाखाली मराठी लेखनाने ही परंपरा पंगू केल्याचे आता जाणवते आहे. त्यामुळेच प्रागतिक विचारांच्या हाती राजसत्ता येत नाही.यासाठी नव्या वैचारिक प्रबोधनाची नितांत गरज आता निर्माण झाली आहे. साहित्य संस्थांचे कार्यही फारसे आशादायी नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हायची असेल तर सध्याची स्थिती बदलून मराठीत वैचारिक आणि सैद्धांतिक लेखन मजबुतीने झाले पाहिजे. वैचारिक ग्रंथांची निर्मिती न होणे ही चिंतेची बाब आहे. विचारवंतांना पचविण्याची सवय समाजाला त्यासाठी लागली पाहिजे.विचारच करता न येणे हा लोकांचा खरा प्रश्न आहे. भारतातली तरुण पिढी हा विचार करू शकते पण तो केला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन प्रसेनजित गायकवाड यांनी तर आभार प्रकाश दुलेवाले यांनी मानले. (प्रतिनिधी)