शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना दंड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:29 IST

लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु लोकशाहीसाठी आपल्या लेखणीचा वापर करणाºयांच्या सातत्याने हत्या होत असतील तर हे लोकशाहीची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे प्रतीक आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र दक्षिणायनतर्फे निदर्शने : देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु लोकशाहीसाठी आपल्या लेखणीचा वापर करणाºयांच्या सातत्याने हत्या होत असतील तर हे लोकशाहीची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे प्रतीक आहे. बंगळुरूमधील आघाडीच्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्याही दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसारखी विचारांना दडपण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना कठोर दंड करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र दक्षिणायनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.महाराष्ट्र दक्षिणायनच्या वतीने संविधान चौकात आयोजित निदर्शने आंदोलनात उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करीत गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना कठोर दंड देण्याची मागणी केली. ‘हिटलरशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी गौरी लंकेश यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, शासन कोणत्याही पक्षाचे असो, संविधानातील मूल्ये, जीवनाच्या दृष्टीनुसार चालावयास हवे. संविधानाच्या विरोधात जाऊन कुणालाही शासन करता येणार नाही. अशाप्रकारे विचार मांडणाºयांची हत्या करणे म्हणजे संविधानाच्या मार्गाने जाणाºया शक्ती नष्ट करणे होय. शासनाने लंकेश गौरी यांच्या मारेकºयांना कडक शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले, देशात विचारांना संपविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा हत्या करणे बहादुरीचे काम नाही. लोकशाहीसाठी लेखणीचा वापर करणाºयांची हत्या होत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी गौरी लंकेश यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. सुनिती देव म्हणाल्या, संविधानानुसार प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु हत्येचा मार्ग अवलंबत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्यात येत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आंदोलनात अमिताभ पावडे, हरीश देशमुख, ताराचंद शर्मा, अजय शाहू, दिलीप खैरकर, कॉंग्रेस सेवादलाचे शहर मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे, प्रभू राजगडकर, सुरेखा देवघरे, डॉ. रेखा बाराहाते, श्याम काळे, संगीता महाजन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.