शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

जाती व्यवस्था व असमानता दूर केल्याशिवाय शांतता अशक्य

By admin | Updated: May 13, 2014 00:54 IST

समाजातून जाती व्यवस्था आणि असमानता दूर होत नाही तोपर्यंत सरकार कोणाचेही असो देशात शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन विख्यात लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांनी येथे केले.

नागपूर : समाजातून जाती व्यवस्था आणि असमानता दूर होत नाही तोपर्यंत सरकार कोणाचेही असो देशात शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन विख्यात लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांनी येथे केले.

इंडिया पीस सेंटर आणि हिस्लॉप कॉलेज, दीनबंधू शिक्षण संस्था आणि सत्यशोधक इंटरनॅशनल यांच्या संयुक्तवतीने अरुंधती रॉय यांचे हिस्लॉप कॉलेजच्या सभागृहात ‘प्रॉस्पेक्टस् ऑफ पीस इन पोस्ट पोल इंडिया’ (निवडणुकीनंतर भारतातील शांततेचे भवितव्य) या विषयावर भाषण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना व घडामोडींचा हवाला देत रॉय यांनी त्यांचे वरील मत मांडले. जात नष्ट केल्याशिवाय शांतता निर्माण होणारच नाही. देशात निर्माण झालेली विषमता हे सुद्धा यासाठी महत्त्वाचे कारण आहे. आज समाजात मूठभर लोकांची संपत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली असून, समाजातील मोठा वर्ग गरीब होत चालला आहे. श्रीमंत मूठभर वर्गाकडे देशातील संपूर्ण शक्ती केंद्रित झाली आहे. देशाची धोरणे काय असावीत, कोण सत्तेवर यावे, हे तेच लोक ठरवू लागले आहेत. सर्वसामान्य जीवनातील प्रत्येक गोष्टीवर ते त्यांचे वर्चस्व निर्माण करू पाहात आहे, हे धोक्याचे आहे व ते थांबविण्याची गरज आहे, असे रॉय म्हणाल्या.

अयोध्येतील वादग्रस्त वास्तूचे दार उघडणे आणि खुल्या अर्थव्यवस्थेला परवानगी देणे, या दोन बाबींमुळे संपूर्ण देशातील वातावरणच बिघडले. देश जातीयतेसोबतच असमानतेच्या खाईत लोटल्या गेला. त्यातून निर्माण झालेला द्वेष आणि असमानता अद्यापही कायम आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकशाहीत फक्त निवडणुकाच महत्त्वाच्या नसतात तर लोकांच्या प्रश्नांनाही महत्त्वाचे स्थान असते. आजही भारतासारख्या विशाल देशात कुपोषण आहे. दलित आणि आदिवासींवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण अधिक आहे. या लोकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांतता कशी नांदेल, असा सवालही त्यांनी केला. व्यासपीठावर रॉजर गायकवाड, सुरेश खैरनार आणि सुनील सरदार उपस्थित होते. त्यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास झाला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुपंथ भट्टाचार्य यांनी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)