शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याला १.२० लाख रुपये भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:25 IST

नागपूर : तक्रारकर्त्या शेतकऱ्याला ऊस पिकासह इतर वस्तूच्या नुकसानीसाठी १ लाख रुपये तर, शारीरिक-मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी ...

नागपूर : तक्रारकर्त्या शेतकऱ्याला ऊस पिकासह इतर वस्तूच्या नुकसानीसाठी १ लाख रुपये तर, शारीरिक-मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी १० हजार अशी एकूण १ लाख २० हजार रुपये भरपाई अदा करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने महावितरण कंपनीला दिला.

नत्थू चौधरी असे तक्रारकर्त्या शेतकऱ्याचे नाव असून ते भागेबोरी, ता. भिवापूर येथील रहिवासी आहेत. त्यांची तक्रार मंचच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी नुकतीच निकाली काढली. सदर आदेशाच्या अंमलबजावणीसाठी महावितरणला एक महिन्याची मुदत देण्यात आली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून भरपाईची रक्कम दोषी कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याचे आणि त्याचा अहवाल सहा महिन्यात सादर करण्याचे निर्देशही मंचने महावितरणला दिले.

चौधरी यांनी शेत सिंचनासाठी महावितरण कंपनीकडून वीज जोडणी घेतली आहे. त्यांच्या शेतातून वीज लाईन गेली आहे. त्या वीज लाईनच्या तारा लोंबकळत होत्या आणि त्यावर पक्षी बसल्यानंतर विजेच्या ठिणग्या उडत होत्या. त्यामुळे चौधरी यांनी ७ मे २०१७ रोजी महावितरणला तक्रार करून वीज लाईन दुरुस्त करण्याची मागणी केली होती. परंतु महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, १६ डिसेंबर २०१८ रोजी वीजतारा एकमेकांना घासून मोठी ठिणगी उडाली. त्यामुळे शेतात आग लागून उसाचे पीक, पाईप, मोटर इत्यादी वस्तू जळाल्याने १५ ते २० लाख रुपयाचे नुकसान झाले. त्यानंतर चौधरी यांनी यासंदर्भात महावितरणला माहिती देऊन भरपाई मागितली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. करिता, त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने रेकॉर्डवरील पुरावे व महावितरणची बाजू लक्षात घेता, तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिला.

-----------------

...तर नुकसान टळले असते

चौधरी त्यांनी तक्रार दिल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून आवश्यक निर्देश दिले असते तर नुकसान टळले असते, परंतु तसे करण्यात आले नाही. महावितरण अधिकाऱ्यांची ग्राहकाप्रति असलेली उदासीनता, बेजबाबदारपणा व कायदेशीर तरतुदींकडे केलेले दुर्लक्ष यामुळे सदर तक्रार उद्भवली, असे मत मंचने व्यक्त केले.