शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

देशभक्ती कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही - प्रणव मुखर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 06:18 IST

आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे.

नागपूर : आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे. देशाला कुठलाही भूगोल, भाषा आणि धर्म-पंथाची चौकट नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशभक्ती ही कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही, असे परखड मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त करीत रा. स्व. संघाला खडे बोल सुनावले. संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, वर्गाचे सर्वाधिकारी गजेंद्रसिंह प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसच्या मुशीतून घडलेले प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला येणार असल्यामुळे देशात खळबळ उडाली होती.हिंसाचाराविषयी नाराजीमी येथे देश व देशभक्ती काय असते हे समजवायला आलो आहे, असे म्हणत प्रणव मुखर्जी यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना मांडली. देशात सतत सुरू असलेल्या हिंसाचाराचा उल्लेख करीत त्यांनी नाव न घेता भाजपाचे कानही टोचले.भारतीय राष्ट्रवाद ही वैश्विक भावना आहे. भारताचा राष्ट्रवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वावर आधारित असल्याने भारताचे दरवाजे सर्वांना खुले आहेत. राष्ट्रवाद विशिष्ट एका जात, धर्म, भाषा यांच्या अधीन नाही. देशासाठी समर्पण हीच खरी देशभक्ती आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.गांधी, नेहरूंचे विचार ऐकविलेया वेळी प्रणव मुखर्जी यांनी संघ स्वयंसेवकांना महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरूयांच्या विचारांमधील राष्ट्रवाद समजावून सांगितला.भारतीय राष्ट्रवाद हा विध्वंसक, आक्रमक नाही, असे महात्मा गांधी म्हणाले होते; तर पंडित नेहरू यांनी राष्ट्रवाद हा हिंदू, मुस्लीम, शीख व इतर धर्मांच्या विचारांच्या एकत्रीकरणातूनच येऊ शकतो, असे विचार मांडले होते.काँग्रेसमध्ये संतापनवी दिल्ली : प्रणव मुखर्जी रा. स्व. संघाच्या व्यासपीठावर गेल्याबद्दल काँग्रेसने स्पष्ट शब्दांत संताप व्यक्त केला आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा संघाशी संबंधित असताना आणि संघाचा इतिहास माहीत असताना मुखर्जी यांनी तिथे जायला नको होते, अशा आशयाचे ट्विट काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत संघाचा सहभाग नव्हता आणि तिरंग्याबद्दलही संघाला आदर नाही. गांधीजींच्या हत्येनंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी मिठाईही वाटली होती, याचाही उल्लेख काँग्रेसने ट्विटमध्ये केला आहे.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ