शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

दुर्मीळ आजारावरील उपचारापासून रुग्ण अद्यापही दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:14 IST

आशिष अग्रवाल नागपूर : आरोग्य क्षेत्राप्रति सरकारची उदासीनता असल्यामुळे आजही देशातील शेकडो मुले दुर्मीळ आजारांवरील योग्य उपचारापासून दूर आहेत. ...

आशिष अग्रवाल

नागपूर : आरोग्य क्षेत्राप्रति सरकारची उदासीनता असल्यामुळे आजही देशातील शेकडो मुले दुर्मीळ आजारांवरील योग्य उपचारापासून दूर आहेत. केंद्र सरकारने नुकतेच दुर्मीळ आजारांसाठी राष्ट्रीय धोरण तयार केले आहे. लवकरच ते लागूही होणार आहे, परंतु त्यात आवश्यक बदल केल्यावरच ते गरीब कुटुंबासाठी फायद्याचे ठरेल.

देशात ७,००० पेक्षा जास्त दुर्मीळ आजाराची नोंद आहे. यात केवळ १२ ते १५ प्रकारच्या दुर्मीळ आजारावर उपचारांची सोय आहे. दुर्मीळ आजाराचे लवकर निदान होत नाही. यामुळे उपचारालाही उशीर होता. विशेष म्हणजे, या आजाराचे निदान करण्यासाठी अनुभव विशेषज्ञाची गरज असते, परंतु देशात विशेषज्ञांची संख्या कमी असल्याने याचा फटका रुग्णांना बसतो. देशात दुर्मीळ आजारांचे किती रुग्ण आहेत, याची नेमकी संख्या नाही. एका अंदाजानुसार, भारतात ७ लाखांपेक्षा जास्त लोक दुर्मीळ आजाराने पीडित आहेत. यातील काही आजारांवर उपचार आहेत किंवा ते खूप खर्चिक आहेत. ‘आर्गनायजेशन फॉर रेअर डीजिस इंडिया’चे (ओआरडीआई) सहसंस्थापक प्रसन्ना शिरोळेनुसार काही दुर्लभ आजारांवरील खर्च हा लाखांपासून ते कोटींपर्यंत आहे. आनुवंशिक आजार असल्याने याला विमा सुरक्षेचे कवचही नाही. या विषयीचे राष्ट्रीय धोरण २०१७ मध्ये लागू करण्यात आले होते, परंतु नंतर ते अयशस्वी ठरले. आता पुन्हा नवीन धोरण सरकारने तयार केले आहे. हे धोरण तीन भागांत वाटले आहे. पहिला भाग बीपीएल वर्गासाठी आहे. यात समाविष्ट कुटुंबासाठी १५ लाख रुपयांचे अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे, परंतु रोगाच्या निदानासाठी येणारा खर्चच एवढा मोठा राहतो की, गरीब कुटुंबे चाचणीच करीत नाही. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

-वेळेत निदान आवश्यक

डॉ.विनित वानखेडे म्हणाले, दुर्मीळ आजारांवरील योग्य उपचारासाठी वेळेत निदान होणे आवश्यक आहे. काही आजारांचे नमुने चेन्नईत पाठविले जातात. याचा अहवाल येण्यास साधारण चार आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागतो, शिवाय तपासणीचा खर्चही मोठा असतो. ‘स्पायनल मस्कुलर एट्रोफी’ (एसएमए) दुर्मीळ आजार आहे. यावरील एका डोसची किंमत १६ कोटी रुपये आहे. उपचारासाठी २० डोसची गरज पडते. भविष्यात उपचाराचा खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे.