शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

प्रवाशांच्या भोजनाचेही होतेय खासगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:12 IST

टप्प्याटप्प्याने रेल्वेच्या सर्व विभागात आऊटसोर्सिंग सुरू असताना, ...

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाचा आदेश धडकला : बेस किचनचा ताबा जाणार ‘आयआरसीटीसी’कडे

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टप्प्याटप्प्याने रेल्वेच्या सर्व विभागात आऊटसोर्सिंग सुरू असताना, आता रेल्वे बोर्डाने प्रवाशांना दर्जेदार भोजन पुरवीत असलेल्या बेस किचनचा ताबाही ‘आयआरसीटीसी’कडे (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन) देण्याचा घाट घातला आहे. त्याबाबतचा आदेश नुकताच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात धडकला आहे. रेल्वेगाड्यात खासगी कंत्राटदारांकडून भोजन पुरवठा करताना प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी असताना, रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर आणि बल्लारशा येथे असे दोन बेस किचन आहेत तर मध्य रेल्वेत जवळपास १२ बेस किचन आहेत. बेस किचनमध्ये रेल्वेचे कर्मचारी भोजन, नाश्ता तयार करून ते रेल्वेगाड्यात पुरविण्याचे काम करतात. बेस किचनमध्ये रेल्वे बोर्डाने यापूर्वीच स्वयंपाक बनविण्याचे अत्याधुनिक यंत्र उपलब्ध करून दिले आहे.बेस किचनमधील कारभार सुरळीत सुरू असताना, अचानक रेल्वे बोर्डाने बेस किचन ‘आयआरसीटीसी’ला सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. २५ वर्षांच्या लीजवर रेल्वे बोर्डाकडून हे बेस किचन ‘आयआरसीटीसी’ला देण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश मध्य रेल्वेच्या अखत्यारितील सर्व विभागांना पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे काही दिवसात किचनवर आयआरसीटीसीचा ताबा दिसणार आहे.प्रवाशांच्या वाढणार तक्रारी‘आयआरसीटीसी’कडे बेस किचनचा ताबा दिल्यानंतर आयआरसीटीसी रेल्वेगाड्यात भोजन पुरविण्याचे कंत्राट खासगी कंत्राटदारांना देणार आहे. अनेकदा खासगी कंत्राटदारांकडून पेन्ट्रीकारमध्ये पुरविल्या जाणाºया भोजनाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे प्रवासी गोंधळ घालून रेल्वेगाडीत चेन पुलिंग करतात, असा अनुभव आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच अशा घटना होत असतात. कंत्राटदाराने पेन्ट्रीकारमध्ये ठेवलेले कामगार खासगी राहणार असल्यामुळे आणि रेल्वेशी त्यांचा संबंध नसल्यामुळे भविष्यात प्रवाशांच्या भोजनाबाबतच्या तक्रारी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.बेस किचन सोपविण्यास आम्ही तयार‘रेल्वे बोर्डाकडून बेस किचन आयआरसीटीसी’ला सोपविण्याचा आदेश आला आहे. आयआरसीटीसीच्या अधिकाºयांनीही तीनवेळा भेट दिली, परंतु कधी ताबा द्यायचा याचा कालावधी ठरला नाही. ‘आयआरसीटीसी’ने मागितले तेव्हा बेस किचन देण्यास आम्ही तयार आहोत.’-कुश किशोर मिश्रा, सिनिअर डीसीएम, मध्य रेल्वे नागपूर विभागपेंट्रीकारमधून प्रवाशांना मिळावी पावती‘आजपर्यंत पेंट्रीकारमधून प्रवाशांना खरेदी केलेल्या भोजनाची पावती मिळत नव्हती. त्यामुळे भोजन निकृष्ट असल्यास प्रवाशांना ग्राहक मंचात जाण्यासाठी कुठलाही पुरावा उपलब्ध राहत नव्हता. आता रेल्वेने आयआरसीटीसीकडे बेस किचनचा ताबा दिल्यानंतर प्रवाशांना भोजनासाठी आकारलेल्या दराबाबतची पावती मिळणे गरजेचे आहे. याशिवाय प्रवाशांना दर्जेदार भोजन मिळावे.’-बसंतकुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र