शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

रेल्वेतील एसी बंदमुळे प्रवासी घालताहेत गोंधळ

By admin | Updated: May 24, 2015 02:59 IST

उन्हाळ्यात एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून रेल्वे प्रशासनाकडुन एसी दुरुस्त करण्यासाठी काहीच ...

नागपूर : उन्हाळ्यात एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून रेल्वे प्रशासनाकडुन एसी दुरुस्त करण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज प्रवासी गोंधळ घालत आहेत. शनिवारी सायंकाळी गीतांजली एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी सकाळपासून एसी बंद असल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर गोंधळ घातला.नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज एसी बंद असल्यामुळे प्रवासी गोंधळ घालण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस सकाळी ६ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून निघाली. गाडी सुटल्यानंतर गाडीतील बी-१ कोचमधील एसी बंद असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी गाडीतील टीटीईला याबाबत तक्रार केली. परंतु पुढील स्थानकावर एसी सुरू करू, असे आश्वासन प्रवाशांना देण्यात आले. परंतु दुपारी १२ वाजेपर्यंत एसी सुरू न झाल्यामुळे आणि उन्हामुळे कोचमध्ये बसणे कठीण झाल्यानंतर प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दुपारी १२.३५ वाजता ही गाडी भुसावळ रेल्वेस्थानकावर पोहोचली. यावेळी प्रवाशांचा संयम सुटला त्यांनी एसी सुरू केल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेऊन वारंवार चेनपुलिंग करून १५ मिनिटे गाडी रोखून धरली. यावेळीही त्यांना पुढील स्थानकावर एसी सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर वर्धा रेल्वेस्थानक आल्यानंतर पुन्हा प्रवाशांनी एसी दुरुस्त करण्याची मागणी केली. परंतु रेल्वेस्थानकावर आलेल्या मेकॅनिकने एसी वर्ध्याला दुरुस्त होऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर तेथून गाडी सुटली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी सायंकाळी ६.५५ वाजता आली आणि प्रवाशांनी गोंधळ घालणे सुरू केले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या कोचमधील एसी दुरुस्त केला आणि ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. (प्रतिनिधी)