शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नारायणा ई-टेक्नो शाळेविरुद्ध पालकांची फसवणुकीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:06 IST

मंत्रिमहोदय आता करणार का कारवाई? : पालकांच्या तक्रारी नसल्याने प्रशासन कारवाईस हतबल नागपूर : नारायणा ई-टेक्नो स्कूलच्या विरोधात ...

मंत्रिमहोदय आता करणार का कारवाई? : पालकांच्या तक्रारी नसल्याने प्रशासन कारवाईस हतबल

नागपूर : नारायणा ई-टेक्नो स्कूलच्या विरोधात पालकांच्या तक्रारीच नसल्याचा हवाला देत, कारवाई करण्यास शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन व खुद्द मंत्रिमहोदयांनी हतबलता दाखविली होती. ज्या पालकांची फसवणूक झाली त्यांनी २४ डिसेंबर रोजी प्राथमिक शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालकांकडे शाळेने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन घेईल का? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

वाठोडा येथील नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या पाल्याचे पालक प्रशांत चकोले यांनी शाळेने फसवणूक केल्यासंदर्भात तक्रार केली आहे. प्रशांत चकोले यांनी मुलाची शैक्षणिक प्रगती व शाळेच्या अध्यापनासंदर्भात असमाधान व्यक्त करीत सहा महिन्यापूर्वी शाळेकडे टीसी मागितली होती. सहा महिन्यानंतर त्यांना किड्स प्ले इंग्लिश प्रायमरी स्कूल, दाभा या शाळेची टीसी दिली. त्या शाळेच्या टीसीवर असलेल्या युडाईज नंबर हा दुसऱ्याच शाळेचा होता. त्यामुळे त्यांच्या मुलाचा पुढच्या वर्गातील प्रवेश अडचणीत आला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले की, नारायणा ई-टेक्नो स्कूलमध्ये मी ६५ हजार रुपये शैक्षणिक शुल्क नियमितपणे भरले, तरीही शाळा व्यवस्थापनाने माझ्यासोबत फसवणुकीचा प्रकार केला. त्यांनी या आशयाची तक्रार शिक्षण उपसंचालक कार्यालय व प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली आहे.

लोकमतने नारायणा ई-टेक्नो स्कूलच्या संदर्भातील बनवाबनवी उजेडात आणली होती. शिक्षण विभागाने उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी केली होती. पण पालकांची तक्रार नसल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, अशी हतबलता शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखविली होती. दरम्यान, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे नागपूरला आले असता, त्यांनाही शाळेच्या बोगसपणाबद्दल विचारले असता, त्यांनी पालकांची तक्रार नसल्याचे सांगून कारवाई करण्यास नकार दिला होता. पोलीस प्रशासनाकडूनही अशाच प्रकारचे उत्तर आले होेते. परंतु आता पालकांनीच पुढे येऊन न्यायासाठी विभागाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे हतबल झालेले प्रशासन शाळेविरुद्ध कणखर भूमिका घेईल का? याची प्रतीक्षा आहे.