शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

‘पॅरालिसीस’च्या रुग्णाला पाजले रॉकेल

By admin | Updated: June 23, 2017 02:33 IST

एका ७० वर्षीय वृद्धाला अर्धांगवायूचा झटका आल्याने कुटुंबातील शिक्षित लोकांनी गावठी उपचार म्हणून कपभर रॉकेल पाजले.

डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे वाचला जीव : फुफ्फुस, मेंदू, रक्ताला पोहचली हानीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका ७० वर्षीय वृद्धाला अर्धांगवायूचा झटका आल्याने कुटुंबातील शिक्षित लोकांनी गावठी उपचार म्हणून कपभर रॉकेल पाजले. या प्रकाराने त्या वृद्धाचा जीवच धोक्यात आला. फुफ्फुस, मेंदू, रक्त व रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचले. वाचण्याची शक्यता फार कमी होती. मात्र, डॉक्टरांच्या कार्यकुशलतेमुळे वृद्धाला जीवनदान मिळाले. एकीकडे जगात किडनी ते हृदय प्रत्यारोपण होत असताना दुसरीकडे गैरसमजातून अर्धांगवायूचा (पॅरालिसीस) झटका आलेल्या रुग्णाला रॉकेल पाजले जात आहे, हा अघोरी प्रकार थांबायला हवा, असे आवाहन ‘क्रिटीकल केअर’ विशेषज्ञ डॉ. राजेंद्र चांडक यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.कडोरीलाल लोधी (७०) रा. नरसिंहपूर मध्यप्रदेश असे त्या रुग्णाचे नाव आहे. डॉ. चांडक म्हणाले, १५ जून रोजी कडोरीलाल लोधी यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला. ते बेशुद्ध झाले. कुटुंबातील लोकांनी उपचार म्हणून कपभर रॉकेल पाजले. त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाली. मध्य प्रदेशातील स्थानिक डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी तत्काळ नागपुरातील रामदासपेठ येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. १४-१५ तासानंतर रुग्ण रुग्णालयात पोहचला. लोधी हे कोमात गेल्यासारखेच होते. श्वास घेणेही कठीण झाले होते. ते झटके मारत होते. ‘एमआरआय’ केल्यावर मेंदूच्या अनेक रक्तवाहिन्या बुजल्याचे आढळून आले. डाव्या फुफ्फुसाचा बरचसा भाग व उजव्या फुफ्फुसाच्या काही भागालाही नुकसान पोहचले होते. ‘प्लेटलेट’ची संख्या कमी झाली होती. यामुळे थुंकीतून रक्त येत होते. रुग्णाला तत्काळ व्हेंटिलेटरवर ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. शरीरातील अनेक अवयवांवर उपचार सुरू करावे लागले. सात दिवसांच्या शर्तीच्या उपचारानंतर ते या धोक्यातून बाहेर आले. उद्या शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असलीतरी महिन्याभरात मूत्रपिंडाला (किडनी) नुकसान पोहचण्याची शक्यता आहे. फुफ्फुसामध्ये अजूनही समस्या आहे. हे सर्व केवळ कपभर रॉकेलमुळे झाले. ही प्रथा विदर्भासोबतच मध्य प्रदेशात पहायला मिळते. ती बंद होणे आवश्यक आहे. ‘पॅरालिसीस’ला घेऊन आजही सामान्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते दूर होणे आवश्यक असल्याचेही डॉ. चांडक म्हणाले. या रुग्णावरील उपचाराच्या चमूमध्ये डॉ. चांडक यांच्यासोबत डॉ. आर. के. गणेशे, डॉ. किरण पटेल, डॉ. मोहिद अन्सारी, डॉ. अतुल काटकर, मनीष तिवारी, गीतेश्री नायर आदींचा सहभाग होता. अर्धांगवायूचा झटका आल्यास हे करा!डॉ. चांडक म्हणाले, अर्धांगवायूचा झटका आल्यास रुग्णाला काही खायला, प्यायला देऊ नये. रुग्णाला एका कडेला झोपवून रुग्णालयात आणायला हवे. आणताना पायापासून खांदा, डोके वर राहील याची दक्षता घ्यायला हवी. जेवढ्या लवकर रुग्णालयात रुग्ण येईल तेवढ्या लवकर तो बरा होण्याची शक्यता अधिक राहते.अर्धांगवायूचा झटका आल्यास हे करा!डॉ. चांडक म्हणाले, अर्धांगवायूचा झटका आल्यास रुग्णाला काही खायला, प्यायला देऊ नये. रुग्णाला एका कडेला झोपवून रुग्णालयात आणायला हवे. आणताना पायापासून खांदा, डोके वर राहील याची दक्षता घ्यायला हवी. जेवढ्या लवकर रुग्णालयात रुग्ण येईल तेवढ्या लवकर तो बरा होण्याची शक्यता अधिक राहते.