शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

‘पॅरालिसीस’च्या रुग्णाला पाजले रॉकेल

By admin | Updated: June 23, 2017 02:33 IST

एका ७० वर्षीय वृद्धाला अर्धांगवायूचा झटका आल्याने कुटुंबातील शिक्षित लोकांनी गावठी उपचार म्हणून कपभर रॉकेल पाजले.

डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे वाचला जीव : फुफ्फुस, मेंदू, रक्ताला पोहचली हानीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका ७० वर्षीय वृद्धाला अर्धांगवायूचा झटका आल्याने कुटुंबातील शिक्षित लोकांनी गावठी उपचार म्हणून कपभर रॉकेल पाजले. या प्रकाराने त्या वृद्धाचा जीवच धोक्यात आला. फुफ्फुस, मेंदू, रक्त व रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचले. वाचण्याची शक्यता फार कमी होती. मात्र, डॉक्टरांच्या कार्यकुशलतेमुळे वृद्धाला जीवनदान मिळाले. एकीकडे जगात किडनी ते हृदय प्रत्यारोपण होत असताना दुसरीकडे गैरसमजातून अर्धांगवायूचा (पॅरालिसीस) झटका आलेल्या रुग्णाला रॉकेल पाजले जात आहे, हा अघोरी प्रकार थांबायला हवा, असे आवाहन ‘क्रिटीकल केअर’ विशेषज्ञ डॉ. राजेंद्र चांडक यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केले.कडोरीलाल लोधी (७०) रा. नरसिंहपूर मध्यप्रदेश असे त्या रुग्णाचे नाव आहे. डॉ. चांडक म्हणाले, १५ जून रोजी कडोरीलाल लोधी यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला. ते बेशुद्ध झाले. कुटुंबातील लोकांनी उपचार म्हणून कपभर रॉकेल पाजले. त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाली. मध्य प्रदेशातील स्थानिक डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी तत्काळ नागपुरातील रामदासपेठ येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. १४-१५ तासानंतर रुग्ण रुग्णालयात पोहचला. लोधी हे कोमात गेल्यासारखेच होते. श्वास घेणेही कठीण झाले होते. ते झटके मारत होते. ‘एमआरआय’ केल्यावर मेंदूच्या अनेक रक्तवाहिन्या बुजल्याचे आढळून आले. डाव्या फुफ्फुसाचा बरचसा भाग व उजव्या फुफ्फुसाच्या काही भागालाही नुकसान पोहचले होते. ‘प्लेटलेट’ची संख्या कमी झाली होती. यामुळे थुंकीतून रक्त येत होते. रुग्णाला तत्काळ व्हेंटिलेटरवर ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. शरीरातील अनेक अवयवांवर उपचार सुरू करावे लागले. सात दिवसांच्या शर्तीच्या उपचारानंतर ते या धोक्यातून बाहेर आले. उद्या शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असलीतरी महिन्याभरात मूत्रपिंडाला (किडनी) नुकसान पोहचण्याची शक्यता आहे. फुफ्फुसामध्ये अजूनही समस्या आहे. हे सर्व केवळ कपभर रॉकेलमुळे झाले. ही प्रथा विदर्भासोबतच मध्य प्रदेशात पहायला मिळते. ती बंद होणे आवश्यक आहे. ‘पॅरालिसीस’ला घेऊन आजही सामान्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते दूर होणे आवश्यक असल्याचेही डॉ. चांडक म्हणाले. या रुग्णावरील उपचाराच्या चमूमध्ये डॉ. चांडक यांच्यासोबत डॉ. आर. के. गणेशे, डॉ. किरण पटेल, डॉ. मोहिद अन्सारी, डॉ. अतुल काटकर, मनीष तिवारी, गीतेश्री नायर आदींचा सहभाग होता. अर्धांगवायूचा झटका आल्यास हे करा!डॉ. चांडक म्हणाले, अर्धांगवायूचा झटका आल्यास रुग्णाला काही खायला, प्यायला देऊ नये. रुग्णाला एका कडेला झोपवून रुग्णालयात आणायला हवे. आणताना पायापासून खांदा, डोके वर राहील याची दक्षता घ्यायला हवी. जेवढ्या लवकर रुग्णालयात रुग्ण येईल तेवढ्या लवकर तो बरा होण्याची शक्यता अधिक राहते.अर्धांगवायूचा झटका आल्यास हे करा!डॉ. चांडक म्हणाले, अर्धांगवायूचा झटका आल्यास रुग्णाला काही खायला, प्यायला देऊ नये. रुग्णाला एका कडेला झोपवून रुग्णालयात आणायला हवे. आणताना पायापासून खांदा, डोके वर राहील याची दक्षता घ्यायला हवी. जेवढ्या लवकर रुग्णालयात रुग्ण येईल तेवढ्या लवकर तो बरा होण्याची शक्यता अधिक राहते.