शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

खडकाळ जमिनीवर फुलविले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:07 IST

विजय नागपूरे कळमेश्वर : ‘डार्क झोन’मध्ये असलेल्या परिसरात शेती करणे म्हणजे दिवा स्वप्नच! मात्र कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील ...

विजय नागपूरे

कळमेश्वर : ‘डार्क झोन’मध्ये असलेल्या परिसरात शेती करणे म्हणजे दिवा स्वप्नच! मात्र कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील नीळकंठ उर्फ बाबा कोढे यांनी खडकाळ जमिनीत २२ एकरात संत्रा आणि मोसंबीची बाग फुलविली. यात आंतरपीक म्हणून दहा क्विंटलच्या जवळपास अद्रकाची लागवड केली. या सर्व पिकांचे ओलीत करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करीत पाण्याचे योग्य नियोजन केले. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने २०१८ या वर्षासाठी उद्यान पंडित पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने कोढे यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

कोढे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत टेकडीवजा चढ-उताराच्या जमिनीचे सपाटीकरण करून चांगल्या दर्जाचे संत्रा उत्पादन घेतले आहे. २००२ त्यांनी मौजा तेलकामठी परिसरात जिरोला (रिठी) येथे २२ एकर डोंगराळ जमीन विकत घेतली. तिचे सपाटीकरण केले. परंतु हा परिसर ‘डार्क झोन’ मध्ये असून येथील भूगर्भात ८०० फूट खोलपर्यंत काळा दगड आहे. यामुळे शेतीचा विकास करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यातून मार्ग शोधत त्यांनी तेलकामठी शिवारातील केसरनाला तलावातून शेतातील विहिरीत व शेततळ्यात पाणी आणले.

अशी केली शेती

- २२ एकर जमिनीपैकी १२ एकरात १५०० संत्रा झाडे, एक हेक्टरमध्ये ५६० मोसंबी झाडे लावली. यात आंतरपीक म्हणून दहा क्विंटलच्या जवळपास अद्रकाची लागवड केली.

- या सर्व पिकांचे ओलीत करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करीत पाण्याचे योग्य नियोजन केले.

-संत्रा झाडांच्या दोन्ही बाजूस तीन-तीन फूट अंतरावर ठिंबक द्वारे पाणी देण्यात येत असल्याने एकाही संत्रा झाडाला डिंक्यासारखा रोग झाला नसल्याचे कोढे यांनी सांगितले.

सीताफळ, करवंद आणि मुंगन्याची झाडे

शेतात सभोवताली धुऱ्यावर १५० सीताफळ, ६०० करवंद, ६० मुंगन्याची झाडे कोढे लावली. त्यासोबतच शेतात केशर जातीची २० आंब्याची झाडे लावली. यापासून \सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असून शेतीसोबतच धुऱ्यावसुद्धा आपण उत्पादन घेऊ शकतो हे सिद्ध करून दाखविले.

दुष्काळात विक्रमी उत्पन्न

२०१८-१९ मध्ये कळमेश्वर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला होता. परंतु कोढे यांनी १५०० संत्रा झाडांपासून ११५ टन संत्रा विकून २० लाखाचे उत्पादन घेतले.

-

शेतमालाच्या उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे फार मोठी बाब आहे. त्यासाठी सखोल अभ्यासाची गरज असते. त्या दृष्टिकोनातून नेहमी कृषी विद्यापीठ व कृषी प्रतिष्ठान शिबिरे, कृषी महोत्सवाला वारंवार भेटी देत असतो. त्यामुळे मला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल या हेतूने मी अवलोकन करून शेतामध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत असतो.

- नीळकंठ कोढे, शेतकरी