शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या आवाहनाला पंडित, ज्योतिषाचार्यांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 16:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला शास्त्रार्थ करणारे विद्वान पंडित आणि ज्योतीषाचार्यांनीही पाठिंबा दिला आहे.

ठळक मुद्दे वसुधैव कुटुंबकमसाठी हा क्षण महत्त्वाचा दीप उजळा घरोघरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या विरोधात एकजूट होण्यासाठी आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण साधण्याची प्रार्थना करण्याच्या उद्देशाने रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन कोणत्याही अंधश्रद्धेपोटी नसून, समाजात एकमेकांप्रतीची आस्था निर्माण करण्यासाठी आणि सर्वांच्या पाठीशी सर्वच उभे आहेत, ही भावना निर्माण करण्यासाठी केले गेले. पंतप्रधानांच्या या आवाहनाला शास्त्रार्थ करणारे विद्वान पंडित आणि ज्योतीषाचार्यांनीही पाठिंबा दिला आहे.माणूस संकटाला घाबरतो आणि घाबरलेला प्राणी संकटापासून मुक्ती मिळविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्याचा मागे पुढे पाहत नाही. एका अर्थाने संकटाच्या काळात प्राण्याचे चित्त थाऱ्यावर राहत नाही आणि तो विचलित होत जातो. अशा वेळी नेतृत्त्वकर्त्याने संयम बाळगत संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये विश्वास आणि लढण्याची क्षमता जागृत करावी लागते. तेच कार्य पंतप्रधान करत आहेत. केंद्र व राज्य सरकारांमार्फत वेगवेगळ्या यंत्रणा युद्धस्तरावर कोरोना विषाणूच्या विरोधात कार्य करित आहेत. डॉक्टर, नर्सेस थेट मैदानात असून, त्याला बॅकअप म्हणून पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा मैदानावर सज्ज आहेत. हे अशा प्रकारे युद्ध सुरू असताना, जे मागे राहिले असतात त्यांना धीर देण्याचे कर्तव्य नेतृत्त्वकर्त्याचे आहे. नेमके तेच कार्य पंतप्रधानांकडून होत असून, २२ मार्च ला टाळी-थाळी-घंटा नाद करण्याचे आवाहन केले गेले तर ५ एप्रिलला दिवे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याला प्रत्येकच गोष्ट राजकारणाच्या दृष्टीकोणातून बघणाऱ्यांकडून तोल-मोल लावल्या जात आहे तर सर्वसामान्यांकडूनही संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. मात्र, कायम मुहूर्ताचा, शुभ-अशुभ तिथीचा, ग्रह-ताºयांचा अभ्यास करणाºया ज्योतिषशास्त्रज्ञांकडून पंतप्रधानांच्या या आवाहनाला एकदिलाने पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रावरील विश्वास हा ज्याचा त्याचा एक भाग असला तरी एक शास्त्र म्हणून अभ्यासावयाच्या ठोकताळ्यात ५ एप्रिल हा दिवस अतिशय शुभ असा प्राप्त झाल्याचे ज्योतीशास्त्रज्ञ सांगत आहेत.चंद्राचा सिंह राशीत प्रवेश - अनिल वैद्य: रविवारी ५ एप्रिल रोजी चंद्र सिंह राशीत (सूर्याची रास) सात अंश ३१ कलेवरून भ्रमण करणार आहेत. ग्रहांच्या विशिष्ट परिस्थितीमुळे रात्री ८.४५ वाजता पृथ्वी आणि चंद्राच्या दरम्यान एक पोकळी निर्माण होणार असून, सूर्याचे अतिनिल किरणे आणि इन्फ्रारेड किरणे चंद्रावरून अपवर्तित होऊन भारतीय उपखंडावर पडणार आहेत. या किरणांमुळे विषाणूची हालचाल मंदावते. याच वेळी दिवे प्रज्वलित केल्याने कोट्यवधी दिव्यांतून एकसाथ निघणारा प्रकाश व ऊर्जा त्या किरणांना साथ देईल आणि शत्रूच्या विरोधात एकसाथ उभे असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होईल, असे आंतराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.एकोप्यासाठी सर्वच कार्य शुभ - कमलेश शर्मा: सामाजिक एकोप्यासाठी केलेले सर्वच कार्य शुभ आणि त्याचा महूर्तही शुभच असतो. पंतप्रधानांनी भारताच्या आरोग्यासाठी दिपप्रज्वलनाचे आवाहन केले आहे. दीपप्रज्वलनाची शुभ क्रिया ही दररोजच केली जाते आणि एका विशिष्टसमयी संपूर्ण देश ही क्रिया करत असेल तर आपण सगळेच एक आहोत आणि एकमुखाने कोरोनाचा नायनाट करण्यास सज्ज आहोत, ही भावना प्रबळ होईल, अशी भावना सीताबर्डी येथे शनी मंदिरचे प्रमुख पुजारी व शास्त्र अभ्यासक पं. कमलेश शर्मा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या