शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:06 IST

नागपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्र शासनाने परवानगी नाकारली आहे. नागपूरसह विदर्भातून हजारो भाविक पंढरपूरची वारी ...

नागपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्र शासनाने परवानगी नाकारली आहे. नागपूरसह विदर्भातून हजारो भाविक पंढरपूरची वारी करतात. परंतु, परवानगी नसल्यामुळे त्यांना वारी करता येणार नाही, याचे त्यांना दु:ख आहे. पंढरपूरच्या वारीमुळे एसटी महामंडळालाही मोठे उत्पन्न होते. मात्र, बसच जाणार नसल्यामुळे या वर्षीसुद्धा एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला १३ लाख ८५ हजारांचा फटका बसणार आहे.

दरवर्षी जायच्या २१ बस

एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातून दरवर्षी पंढरपूरसाठी २१ बस सोडण्यात येत होत्या. एकूण ३७ हजार ८६९ किलोमीटरचे अंतर या बस पूर्ण करीत होत्या. त्याद्वारे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला १३ लाख ८५ हजार ३३३ रुपये उत्पन्न मिळत होते. परंतु, पंढरपूरच्या वारीलाच परवानगी नाकारण्यात आल्यामुळे एसटीला हे उत्पन्न मिळणार नसल्याची स्थिती आहे.

तीन हजारांवर प्रवासी करीत होते वारी

पंढरपूरच्या वारीसाठी नागपूरसह विदर्भातून हजारो प्रवासी जातात. वारीसाठी बहुतांश भाविक एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु, कोरोनामुळे वारीलाच परवानगी नाकारण्यात आल्यामुळे भाविकांचा नाइलाज झाला आहे. एकट्या नागपूर विभागातून ८ जुलै ते २९ जुलै २०१९ दरम्यान ३७७६ भाविकांनी पंढरपूरसाठी प्रवास केल्याची नोंद एसटी महामंडळाने केली आहे.

यंदा एकही पालखी नाही

पंढरपूरच्या वारीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने ज्यादा बस सोडण्यात येतात. परंतु, कोरोनामुळे वारीला परवानगी नसल्यामुळे यंदा एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातून एकही बस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार नाही. त्यामुळे भाविकांसाठी या वर्षी एसटी बस उपलब्ध राहणार नाहीत.

परंपरा मोडित काढायला नको होती

‘दरवर्षी होणारी वारी या वर्षी झाली नाही. शासनाने वारीला जाण्यासाठी परवानगी देण्याची गरज नव्हती. ५०० ऐवजी किमान चार ते पाच लोकांना जाऊ द्यावे, अशी मागणी होती. रात्री वारी करून गावाच्या बाहेर थांबण्याची आमची तयारी होती. वारी चुकू न देणे हे वारकऱ्याचे ध्येय असते. शासनाने या ध्येयात अडथळा आणला. शासनाने परंपरा मोडीत काढायला नको होती.’

-सनत गुप्ता, वारकरी

धर्मावर आघात करू नये

‘पंढरपूरच्या वारीला ७०० वर्षांची परंपरा आहे. ३६० वर्षे तुकोबांच्या पायी वारीला झाले आहेत. वारीला जाता आले नाही याचे दु:ख आहे. मंदिरातून धर्मजागरण चालते. मंदिरही बंद असल्यामुळे भाविकांची निराशा झाली आहे. शासन धर्मावरच आघात करीत आहे.’

श्रीरामपंत जोशी, वारकरी

एसटीला १४ लाखांचे नुकसान

‘कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आषाढी एकादशी यात्रा रद्द करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे नागपूर विभागाला अंदाजे १४ लाख रुपयांच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागणार आहे.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

............