शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
6
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
7
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
8
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
10
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
11
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
12
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
13
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
14
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
15
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
16
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
17
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
18
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
19
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
20
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा

पामतेलाची आयात थांबली; साेयाबीन, माेहरीचे दर वधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 13:45 IST

साेयाबीनवरील स्टाॅक लिमिट व ढेपेची आयात आणि माेहरीच्या वायद्यावरील बंदीमुळे दाेन्ही तेलबियांचे दर उतरले हाेते.

ठळक मुद्देइंडाेनेशियाने निर्यातीवर बंदी घातली मागणी वाढली आणि उत्पादन घटले

सुनील चरपे

नागपूर : देशात खाद्यतेलाची मागणी १२ ते १६ टक्क्यांनी वाढली असताना साेयाबीन, माेहरीसह इतर तेलबियांचे उत्पादन २५ ते ३४ टक्क्यांनी घटले आहे. देशांतर्गत खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या पामतेलावर इंडाेनेशियाने निर्यातबंदी लावली. त्यामुळे पामतेलाची आयात बंद झाल्याने देशांतर्गत बाजारातील साेयाबीन व माेहरीचे दर वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षांपासून साेयाबीन व इतर तेलबियांच्या उत्पादनात घट येत आहे. सन २०२१-२२ च्या हंगामात माेहरीचे १२७ लाख टन तर साेयाबीनचे १०८ टन उत्पादन हाेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला हाेता. वास्तवात, माेहरीचे १०५ लाख टन आणि साेयाबीनचे ९७ लाख टन उत्पादन झाले. सूर्यफूल, भुईमूग व इतर तेलबियांचे उत्पादन तुलनेत फारच कमी आहे. हे उत्पादन देशांतर्गत खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी बरेच कमी आहे.

सन २०२०-२१ च्या हंगामात साेयाबीनच्या दराने ११ हजारी तर माेहरीच्या दराने ९ हजारी गाठली हाेती. साेयाबीनवरील स्टाॅक लिमिट व ढेपेची आयात आणि माेहरीच्या वायद्यावरील बंदीमुळे दाेन्ही तेलबियांचे दर उतरले हाेते.

सन २०२१-२२ च्या हंगामात साेयाबीन व माेहरीच्या उत्पादनात माेठी घट झाली असून, खाद्यतेलाचा वापर व मागणी वाढली आहे. त्यामुळे या दाेन्हीसह इतर तेलबियांचे दर वाढण्याची शक्यता केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे मावळली हाेती. सध्या माेहरीला प्रति क्विंटल ५,२०० ते ६,५०० आणि साेयाबीनला ६,००० ते ७,७०० रुपये दर मिळत आहे. त्यातच इंडाेनेशियाने पामतेल निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने या दाेन्ही तेलबियांचे दर वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे विकायला साेयाबीन नसल्याने त्यांना या दरवाढीचा फायदा मिळणार नाही, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

७० टक्के पामतेलाची आयात

भारताला खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी ५५ ते ५७ टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते. यात किमान ६२ टक्के पामतेल, २५ टक्के साेयाबीन, १० टक्के सूर्यफूल व ३ टक्के इतर तेलाची आयात केली जाते. भारतात ६० टक्के पामतेल इंडाेनेशिया तर ४० टक्के मलेशियातून आयात केले जाते.

खाद्यतेलाचा वाढता वापर

भारतात प्रति व्यक्ती वर्षाकाठी १२ किलाे खाद्यतेल खाण्याची शिफारस भारतीय आयुर्विज्ञान संशाेधन परिषदेने केली असली तरी प्रति व्यक्ती १८ किलाे खाद्यतेल सेवन केले जाते. खाद्यतेलाचा वापर वाढल्याने ही गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक रिफाईंड ऑईलमध्ये ३८ ते ४० टक्के पामतेल मिसळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे देशात पामतेलाचा वापर वाढला आहे.

टॅग्स :agricultureशेतीbusinessव्यवसाय