शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पामतेलाची आयात थांबली; साेयाबीन, माेहरीचे दर वधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 13:45 IST

साेयाबीनवरील स्टाॅक लिमिट व ढेपेची आयात आणि माेहरीच्या वायद्यावरील बंदीमुळे दाेन्ही तेलबियांचे दर उतरले हाेते.

ठळक मुद्देइंडाेनेशियाने निर्यातीवर बंदी घातली मागणी वाढली आणि उत्पादन घटले

सुनील चरपे

नागपूर : देशात खाद्यतेलाची मागणी १२ ते १६ टक्क्यांनी वाढली असताना साेयाबीन, माेहरीसह इतर तेलबियांचे उत्पादन २५ ते ३४ टक्क्यांनी घटले आहे. देशांतर्गत खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या पामतेलावर इंडाेनेशियाने निर्यातबंदी लावली. त्यामुळे पामतेलाची आयात बंद झाल्याने देशांतर्गत बाजारातील साेयाबीन व माेहरीचे दर वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षांपासून साेयाबीन व इतर तेलबियांच्या उत्पादनात घट येत आहे. सन २०२१-२२ च्या हंगामात माेहरीचे १२७ लाख टन तर साेयाबीनचे १०८ टन उत्पादन हाेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला हाेता. वास्तवात, माेहरीचे १०५ लाख टन आणि साेयाबीनचे ९७ लाख टन उत्पादन झाले. सूर्यफूल, भुईमूग व इतर तेलबियांचे उत्पादन तुलनेत फारच कमी आहे. हे उत्पादन देशांतर्गत खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी बरेच कमी आहे.

सन २०२०-२१ च्या हंगामात साेयाबीनच्या दराने ११ हजारी तर माेहरीच्या दराने ९ हजारी गाठली हाेती. साेयाबीनवरील स्टाॅक लिमिट व ढेपेची आयात आणि माेहरीच्या वायद्यावरील बंदीमुळे दाेन्ही तेलबियांचे दर उतरले हाेते.

सन २०२१-२२ च्या हंगामात साेयाबीन व माेहरीच्या उत्पादनात माेठी घट झाली असून, खाद्यतेलाचा वापर व मागणी वाढली आहे. त्यामुळे या दाेन्हीसह इतर तेलबियांचे दर वाढण्याची शक्यता केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे मावळली हाेती. सध्या माेहरीला प्रति क्विंटल ५,२०० ते ६,५०० आणि साेयाबीनला ६,००० ते ७,७०० रुपये दर मिळत आहे. त्यातच इंडाेनेशियाने पामतेल निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने या दाेन्ही तेलबियांचे दर वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे विकायला साेयाबीन नसल्याने त्यांना या दरवाढीचा फायदा मिळणार नाही, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

७० टक्के पामतेलाची आयात

भारताला खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी ५५ ते ५७ टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते. यात किमान ६२ टक्के पामतेल, २५ टक्के साेयाबीन, १० टक्के सूर्यफूल व ३ टक्के इतर तेलाची आयात केली जाते. भारतात ६० टक्के पामतेल इंडाेनेशिया तर ४० टक्के मलेशियातून आयात केले जाते.

खाद्यतेलाचा वाढता वापर

भारतात प्रति व्यक्ती वर्षाकाठी १२ किलाे खाद्यतेल खाण्याची शिफारस भारतीय आयुर्विज्ञान संशाेधन परिषदेने केली असली तरी प्रति व्यक्ती १८ किलाे खाद्यतेल सेवन केले जाते. खाद्यतेलाचा वापर वाढल्याने ही गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक रिफाईंड ऑईलमध्ये ३८ ते ४० टक्के पामतेल मिसळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे देशात पामतेलाचा वापर वाढला आहे.

टॅग्स :agricultureशेतीbusinessव्यवसाय