शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

पामतेलाची आयात थांबली; साेयाबीन, माेहरीचे दर वधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 13:45 IST

साेयाबीनवरील स्टाॅक लिमिट व ढेपेची आयात आणि माेहरीच्या वायद्यावरील बंदीमुळे दाेन्ही तेलबियांचे दर उतरले हाेते.

ठळक मुद्देइंडाेनेशियाने निर्यातीवर बंदी घातली मागणी वाढली आणि उत्पादन घटले

सुनील चरपे

नागपूर : देशात खाद्यतेलाची मागणी १२ ते १६ टक्क्यांनी वाढली असताना साेयाबीन, माेहरीसह इतर तेलबियांचे उत्पादन २५ ते ३४ टक्क्यांनी घटले आहे. देशांतर्गत खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या पामतेलावर इंडाेनेशियाने निर्यातबंदी लावली. त्यामुळे पामतेलाची आयात बंद झाल्याने देशांतर्गत बाजारातील साेयाबीन व माेहरीचे दर वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षांपासून साेयाबीन व इतर तेलबियांच्या उत्पादनात घट येत आहे. सन २०२१-२२ च्या हंगामात माेहरीचे १२७ लाख टन तर साेयाबीनचे १०८ टन उत्पादन हाेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला हाेता. वास्तवात, माेहरीचे १०५ लाख टन आणि साेयाबीनचे ९७ लाख टन उत्पादन झाले. सूर्यफूल, भुईमूग व इतर तेलबियांचे उत्पादन तुलनेत फारच कमी आहे. हे उत्पादन देशांतर्गत खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी बरेच कमी आहे.

सन २०२०-२१ च्या हंगामात साेयाबीनच्या दराने ११ हजारी तर माेहरीच्या दराने ९ हजारी गाठली हाेती. साेयाबीनवरील स्टाॅक लिमिट व ढेपेची आयात आणि माेहरीच्या वायद्यावरील बंदीमुळे दाेन्ही तेलबियांचे दर उतरले हाेते.

सन २०२१-२२ च्या हंगामात साेयाबीन व माेहरीच्या उत्पादनात माेठी घट झाली असून, खाद्यतेलाचा वापर व मागणी वाढली आहे. त्यामुळे या दाेन्हीसह इतर तेलबियांचे दर वाढण्याची शक्यता केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे मावळली हाेती. सध्या माेहरीला प्रति क्विंटल ५,२०० ते ६,५०० आणि साेयाबीनला ६,००० ते ७,७०० रुपये दर मिळत आहे. त्यातच इंडाेनेशियाने पामतेल निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने या दाेन्ही तेलबियांचे दर वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे विकायला साेयाबीन नसल्याने त्यांना या दरवाढीचा फायदा मिळणार नाही, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

७० टक्के पामतेलाची आयात

भारताला खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी ५५ ते ५७ टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते. यात किमान ६२ टक्के पामतेल, २५ टक्के साेयाबीन, १० टक्के सूर्यफूल व ३ टक्के इतर तेलाची आयात केली जाते. भारतात ६० टक्के पामतेल इंडाेनेशिया तर ४० टक्के मलेशियातून आयात केले जाते.

खाद्यतेलाचा वाढता वापर

भारतात प्रति व्यक्ती वर्षाकाठी १२ किलाे खाद्यतेल खाण्याची शिफारस भारतीय आयुर्विज्ञान संशाेधन परिषदेने केली असली तरी प्रति व्यक्ती १८ किलाे खाद्यतेल सेवन केले जाते. खाद्यतेलाचा वापर वाढल्याने ही गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक रिफाईंड ऑईलमध्ये ३८ ते ४० टक्के पामतेल मिसळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे देशात पामतेलाचा वापर वाढला आहे.

टॅग्स :agricultureशेतीbusinessव्यवसाय