शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

पाकिस्तानी साखरेमुळे कारखानदारांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:20 IST

सरकारने साखरेवरील आयात कर ५० वरून १०० टक्के केल्यानंतरही भारतात पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात साखर आयात होत असल्याने कारखानदारांना फटका बसणार आहे.

- सोपान पांढरीपांडे नागपूर : सरकारने साखरेवरील आयात कर ५० वरून १०० टक्के केल्यानंतरही भारतात पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात साखर आयात होत असल्याने कारखानदारांना फटका बसणार आहे.सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह ठाणे जिल्ह्यातील दहिसर-मोरी गावातील व्हिडी लॉजिस्टिक्सच्या गोदामावर हल्लाबोल आंदोलन केले. पाकिस्तानातील चिस्तियन व लालूवल्लू या ब्रँडच्या साखर साठ्याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर टाकला. ‘लोकमत’शी बोलताना आव्हाड म्हणाले की, ही साखर मुंबईच्या सुकुमार एक्स्पोर्ट इम्पोर्टस् कंपनीने आयात केलेल्या ४७०० टन साखर साठ्यापैकी आहे. ही साखर भारतात कशी आली, त्याची चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. यापूर्वीही पाकिस्तानी साखर नवी मुंबई व पंजाब, हरियाणामधील गावांमध्ये उपलब्ध असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर झळकल्या आहेत.इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहित पवार म्हणाले, ही साखर आयात कर वाढण्यापूर्वी आलेली असावी अशी शक्यता आहे. भारतीय साखरेपेक्षा एक ते दोन रु. प्रति किलो ती स्वस्त विकली जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कारखानदारांवर दबाव आणला आहे. कारखानदारांना घाऊक व्यापाºयांना साखर २४ ते २५ रुपये किलो दराने विकावी लागत आहे. साखरेचा उत्पादन खर्च ३२ ते ३४ रुपये किलो येतो. तीन महिन्यांपूर्वी साखरेचे किरकोळ दर ४० ते ४२ रुपये होते. ते आता ३६ ते ३८ रुपयांवर आले आहेत. पाकिस्तानी साखरेमुळे प्रत्येक कारखान्याला किलोमागे ९ ते १० रुपये नुकसान सहन करावे लागत आहे. भारतातील ४९३ साखर कारखानदारांना अशा तºहेने २२ हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता पवार यांनी बोलून दाखविली.पाकिस्तानात साखरेचा उत्पादन खर्च १८ रुपये प्रति किलो आहे. १०० टक्के आयात करानंतर किलोमागे साखर ३६ ते ४० रुपयांत पडेल. त्यामुळे ही साखर कशी आली हे शोधणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी सरकारने चौकशी करून ही आयात बंद केली पाहिजे, असे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे महासंचाक डॉ. अबिनाश वर्मा यांनी सांगितले.भारतात गेल्या वर्षीची ४.५० दशलक्ष टन साखर शिल्लक आहे. यावर्षी आतापर्यंत ३१ दशलक्ष टन साखर तयार झाली आहे. त्यामुळे एकूण उपलब्धता ३५.५० दशलक्ष टन झाली आहे. त्या प्रमाणात मागणी फक्त २५ दशलक्ष टनाची असल्याने देशात १० दशलक्ष टन अतिरिक्त साखर उत्पादन झाले आहे.>ठाण्यात हल्लाबोलसोमवारी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह दहिसर-मोरी येथील गोदामांवर हल्लाबोल करून पाकिस्तानातून आलेल्या दोन हजार मेट्रीक टन साखरेपैकी काही गोण्यांवर ‘हल्लाबोल’ आंदोलन करून ती नष्ट केली.