शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

पाकिस्तान आण्विक हल्ल्याचा मूर्खपणा करणार नाही

By admin | Updated: September 30, 2016 03:20 IST

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे.

माजी सैन्य अधिकाऱ्यांचे मत : मानसिक युद्ध, फिदायीन हल्ल्यांवर राहील भरनागपूर : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. जर दोन्ही देशांत युद्ध सुरू झाले तर पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु माजी सैन्य अधिकाऱ्यांनी मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. जर पाकिस्तानने आण्विक हल्ला केला तर प्रत्यक्षात भारतापेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होईल. याची पाकिस्तान सैन्याला जाणीव आहे. त्यामुळे ते असे पाऊल उचलण्याचा मूर्खपणा करणार नाही, असे मत भारतीय सैन्याच्या माजी सैन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.मुळात पाकिस्तानचा भ्याड व छुपे हल्ले करण्यावर भर असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर तो मी नव्हेच असे दाखविण्यासाठी ही त्यांची रणनीती आहे. जर युद्ध पेटलेच तर पाकिस्तान अण्वस्त्र वापरण्याची चूक करणार नाही. जर त्यांनी असे केले तर भारताचा काही भाग नष्ट होईल. परंतु प्रत्युत्तरात संपूर्ण पाकिस्तान बेचिराख होईल. भारताचे कमी व पाकिस्तानचेच जास्त नुकसान होईल, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले. थेट हल्ला करण्यापेक्षा पाकिस्तान दहशतवादी हल्ले करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेवरदेखील पुढील काही काळ विशेष लक्ष द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.चीनलादेखील बसेल फटकाजर पाकिस्तानने अण्वस्त्रांचा उपयोग केला तर त्याचा फटका चीनलादेखील बसेल. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी चिनी कामगार विविध प्रकल्पांवर काम करत आहेत. शिवाय अण्वस्त्रांमुळे होणाऱ्या किरणोत्सर्गाचा फटका चीनलादेखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनच पाकिस्तानला असे पाऊल उचलू देणार नाही, असे मत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)