शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तान आण्विक हल्ल्याचा मूर्खपणा करणार नाही

By admin | Updated: September 30, 2016 03:20 IST

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे.

माजी सैन्य अधिकाऱ्यांचे मत : मानसिक युद्ध, फिदायीन हल्ल्यांवर राहील भरनागपूर : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. जर दोन्ही देशांत युद्ध सुरू झाले तर पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु माजी सैन्य अधिकाऱ्यांनी मात्र अशी शक्यता फेटाळून लावली आहे. जर पाकिस्तानने आण्विक हल्ला केला तर प्रत्यक्षात भारतापेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होईल. याची पाकिस्तान सैन्याला जाणीव आहे. त्यामुळे ते असे पाऊल उचलण्याचा मूर्खपणा करणार नाही, असे मत भारतीय सैन्याच्या माजी सैन्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.मुळात पाकिस्तानचा भ्याड व छुपे हल्ले करण्यावर भर असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर तो मी नव्हेच असे दाखविण्यासाठी ही त्यांची रणनीती आहे. जर युद्ध पेटलेच तर पाकिस्तान अण्वस्त्र वापरण्याची चूक करणार नाही. जर त्यांनी असे केले तर भारताचा काही भाग नष्ट होईल. परंतु प्रत्युत्तरात संपूर्ण पाकिस्तान बेचिराख होईल. भारताचे कमी व पाकिस्तानचेच जास्त नुकसान होईल, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले. थेट हल्ला करण्यापेक्षा पाकिस्तान दहशतवादी हल्ले करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेवरदेखील पुढील काही काळ विशेष लक्ष द्यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.चीनलादेखील बसेल फटकाजर पाकिस्तानने अण्वस्त्रांचा उपयोग केला तर त्याचा फटका चीनलादेखील बसेल. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी चिनी कामगार विविध प्रकल्पांवर काम करत आहेत. शिवाय अण्वस्त्रांमुळे होणाऱ्या किरणोत्सर्गाचा फटका चीनलादेखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनच पाकिस्तानला असे पाऊल उचलू देणार नाही, असे मत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)