शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बंगालच्या रणधुमाळीत वेदना विरुद्ध वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात सद्यस्थितीत वेदना हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात सद्यस्थितीत वेदना हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची वेदना पायाच्या वेदनेहून महत्त्वाची नाही, असे भाष्य केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावरून ममता यांच्यावर हल्लाबोल करत राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या तेव्हा त्यांची वेदना दिसली नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे माझा पाय ठीक झाल्यावर इतर कुणीही बंगालच्या जमिनीवर चालूदेखील शकणार नाही, असा इशाराच ममता यांनी दिला.

बांकुरा जिल्ह्यातील राणीबंध येथे शहा यांनी रॅलीदरम्यान वेदनेचा मुद्दा उपस्थित केला. ममता बॅनर्जी लवकरच ठीक होतील. मात्र, ज्या भाजप कार्यकर्त्यांची तृणमूलच्या शासनकाळात हत्या झाली त्यांच्या कुटुंबीयांची वेदना सरकारला दिसली नाही. तृणमूलकडून आदिवासींना प्रमाणपत्रासाठी कमिशन मागण्यात येते. आमची सत्ता आली तर आदिवासींच्या भूमी अधिकारांना संरक्षण देण्यात येईल, असे शहा म्हणाले. शहा यांची झाडग्राम जिल्ह्यातदेखील रॅली होती. मात्र, ऐनवेळी हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळे त्यांनी व्हर्च्युअल भाषण केले.

ममतांचा पुनरोच्चार, माझ्याविरोधात षडयंत्रच

नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला नव्हता असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला होता. मात्र, झालदा येथे प्रचार सभेदरम्यान ममता यांनी माझ्याविरोधात षडयंत्र सुरू असल्याचा पुनरुच्चार केला. माझा संघर्ष सुरूच राहणार असून काही दिवसांत माझा पाय ठीक होईल. मग मी पाहते की, तुमचे पाय बंगालच्या जमिनीवर मोकळेपणे कसे चालतात, या शब्दांत भाजपच्या नेत्यांना इशारा दिला. जितके काम आमच्या सरकारने केले आहे तितके जगातील कुठल्याही सरकारने केलेले नाही. भाजपचे पंतप्रधान देशाला चालविण्यास सक्षम नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

ममतांनी बनू दिले नाही बंदर- गडकरी

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील इगरा येथील सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ममता बॅनर्जी यांनी तेजपूर येथे प्रस्तावित बंदर होऊ दिले नाही. सोबतच नंदीग्राम येथील एक ऑटोमोबाइल कंपनी राज्याबाहेर पळवून लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप लावला.

ममतांचा निवडणूक अर्ज रद्द करा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राम येथून उभे असलेले भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. नामांकन अर्जात बॅनर्जी यांनी सहा गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपविली आहे. यात सीबीआयच्या एका प्रकरणाचादेखील समावेश आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.