शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

बंगालच्या रणधुमाळीत वेदना विरुद्ध वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात सद्यस्थितीत वेदना हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात सद्यस्थितीत वेदना हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची वेदना पायाच्या वेदनेहून महत्त्वाची नाही, असे भाष्य केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावरून ममता यांच्यावर हल्लाबोल करत राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या तेव्हा त्यांची वेदना दिसली नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे माझा पाय ठीक झाल्यावर इतर कुणीही बंगालच्या जमिनीवर चालूदेखील शकणार नाही, असा इशाराच ममता यांनी दिला.

बांकुरा जिल्ह्यातील राणीबंध येथे शहा यांनी रॅलीदरम्यान वेदनेचा मुद्दा उपस्थित केला. ममता बॅनर्जी लवकरच ठीक होतील. मात्र, ज्या भाजप कार्यकर्त्यांची तृणमूलच्या शासनकाळात हत्या झाली त्यांच्या कुटुंबीयांची वेदना सरकारला दिसली नाही. तृणमूलकडून आदिवासींना प्रमाणपत्रासाठी कमिशन मागण्यात येते. आमची सत्ता आली तर आदिवासींच्या भूमी अधिकारांना संरक्षण देण्यात येईल, असे शहा म्हणाले. शहा यांची झाडग्राम जिल्ह्यातदेखील रॅली होती. मात्र, ऐनवेळी हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळे त्यांनी व्हर्च्युअल भाषण केले.

ममतांचा पुनरोच्चार, माझ्याविरोधात षडयंत्रच

नंदीग्राम येथे ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला नव्हता असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला होता. मात्र, झालदा येथे प्रचार सभेदरम्यान ममता यांनी माझ्याविरोधात षडयंत्र सुरू असल्याचा पुनरुच्चार केला. माझा संघर्ष सुरूच राहणार असून काही दिवसांत माझा पाय ठीक होईल. मग मी पाहते की, तुमचे पाय बंगालच्या जमिनीवर मोकळेपणे कसे चालतात, या शब्दांत भाजपच्या नेत्यांना इशारा दिला. जितके काम आमच्या सरकारने केले आहे तितके जगातील कुठल्याही सरकारने केलेले नाही. भाजपचे पंतप्रधान देशाला चालविण्यास सक्षम नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

ममतांनी बनू दिले नाही बंदर- गडकरी

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील इगरा येथील सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ममता बॅनर्जी यांनी तेजपूर येथे प्रस्तावित बंदर होऊ दिले नाही. सोबतच नंदीग्राम येथील एक ऑटोमोबाइल कंपनी राज्याबाहेर पळवून लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप लावला.

ममतांचा निवडणूक अर्ज रद्द करा

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राम येथून उभे असलेले भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. नामांकन अर्जात बॅनर्जी यांनी सहा गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपविली आहे. यात सीबीआयच्या एका प्रकरणाचादेखील समावेश आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.