शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

पाचगाव देशातील पहिले वायफाय गाव

By admin | Updated: July 5, 2015 02:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर नागपूर जिल्ह्यातील पाचगाव (ता. उमरेड) येथे नि:शुल्क ‘वायफाय’ सुरू ..

उमरेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या घोषणेनंतर नागपूर जिल्ह्यातील पाचगाव (ता. उमरेड) येथे नि:शुल्क ‘वायफाय’ सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यानुसार पाचगाव हे देशातील पहिले ‘वायफाय’ गाव ठरले आहे. संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत २५ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन शनिवारी पाचगाव येथे करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे, विकास कुंभारे, अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, डॉ. राजीव पोतदार, अशोक मानकर, आनंद राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी, पंचायत समिती सभापती शालू मेंढुले, उपसभापती गोविंदा इटनकर, पाचगाव येथील सरपंच पुष्पशीला मेश्राम, उपसरपंच रामाजी हटवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.महाराष्ट्रात १०० टक्के ग्रामपंचायती वायफाय यंत्रणेशी जोडण्यात येणार असून, देशभरातील अन्य राज्यांत ४० टक्के ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा पुरविण्यात येणार आहे. सदर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असून, डिसेंबर २०१५ पर्यंत या टेक्नॉॅलॉजीचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. संसद आदर्श ग्राम या योजनेंतर्गत ‘विकास आराखडा’ही तयार करण्यात आला असून, केंद्र शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविला गेला. या योजनेत विकास आराखडा सादर करणाऱ्या पहिल्या गावाची नोंदही पाचगाव या गावाची झाली असून, येत्या सहा महिन्यात विकास कामांच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणाही करण्यात येणार आहे़ बेरोजगारीच्या विळख्यातून मुक्त झालेला युवावर्ग, व्यसनमुक्त समाज, कर्जमुक्त शेतकरी असे स्वप्न मी या गावाचे बघत आहे. जोपर्यंत आपण आदर्श होणार नाही, तोपर्यंत गावही आदर्शाच्या पंक्तीत बसणार नाही. माझेही गाव असेच झाले पाहिजे, असे अन्य गावांसमोर आदर्शव्रत हे गाव उभारायचे आहे. या गावाचा सर्वांगीण विकास करण्यास मी कटिबद्ध असल्याचे वचनही यावेळी गडकरी यांनी दिले. तावडे म्हणाले, महाराष्ट्रात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुमारे १० लाख शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. यापुढे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही. विद्यार्थ्यांना हवे असलेले आणि अंगभूत कलागुण कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणावर यापुढे आपला भर राहील. दहावीत एकही विद्यार्थी नापास ठरणार नाही, अशी योजनाही अमलात आणली असून प्रशिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोणीकर यांनी सात कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन याकडेही लक्ष दिले पाहिजे असे म्हणत राज्यातील ५६ लाख कुटुंबाकडे शौचालयाची निर्मिती होणार असल्याचेही ते बोलले. खासदार कृपाल तुमाने यांनी ५० लाख रुपयांचा निधी पाचगावसाठी जाहीर केला. आमदार सुधीर पारवे यांनी भूमिगत नाल्यांसाठी आमदार निधी देणार असल्याचे जाहीर केले. शासनाच्या योजनेबाबतचा आढावाही सादर केला. संचालन डॉ. अर्चना कडू यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. (प्रतिनिधी)योजनांचा पडला पाऊससुमारे आठवडाभरापासून पावसाने सर्वत्र दांडी मारली असली तरी शासनाच्या विविध योजनांचा ‘पाऊस’ मात्र शनिवारी उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे पडला. एकूण २५ कोटी रुपयांच्या कामांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करताच आता पाचगावचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. गिट्टीखदानीचे गाव ‘पाचगाव’ अशी ओळख असणाऱ्या या गावात संसद आदर्श ग्राम योजनेमुळे आदर्श गावाच्या यादीतही या गावाची नोंद झाली आहे. बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकऱ्यांच्या मालाला दाम, विकासकामांची गंगा आणि संपूर्ण ‘हायफाय, वायफाय’ यंत्रणा अशी वैभवसंपन्नता पाचगाव या गावाला लाभणार आहे. पाचगाव येथे इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण आहे. आता या गावात अकरावी आणि बारावीसोबतच तंत्रशिक्षणाचीही जोड देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. तसेच शाळा दुरुस्तीसाठी १ कोटी ४४ लाख रुपयांचा निधीही जाहीर केला. ई- लायब्ररी सेवा, समाजभवन, शुद्ध, स्वच्छ पाण्यासाठी ७ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, मुख्य मार्गाच्या सिमेंटीकरणासाठी ६ कोटीचा निधी, प्राथमिक आरोग्य केंद्र, अ‍ॅम्बुलन्स सुविधा, पशुवैद्यकीय दवाखाना, क्रीडांगण, व्यायामशाळा, स्मशानभूमी, जलयुक्त शिवार, कोल्हापुरी बंधारा आदी योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे.