शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम-नागपूर’च्या संचालकीय मंडळ स्थापनेला वेग

By admin | Updated: November 20, 2015 03:08 IST

‘आयआयएम-नागपूर’चे वर्ग सुरू झाले असून संस्थेला मिहान येथे जागादेखील देण्यात आली आहे.

येत्या महिन्याभरात चित्र स्पष्ट होणारनागपूर : ‘आयआयएम-नागपूर’चे वर्ग सुरू झाले असून संस्थेला मिहान येथे जागादेखील देण्यात आली आहे. आता संस्थेसाठी संचालकीय मंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चेअरमन तसेच सदस्यांच्या नियुक्तीसाठी सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित सदस्य नामनिर्देशित होईपर्यंत कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव विनय शील ओबेरॉय यांच्याकडे संचालकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा तात्पुरता प्रभार देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या मंडळातील १५ सदस्यांमध्ये राज्य शासन, उद्योगजगत, शिक्षण क्षेत्र तसेच ‘आयआयएम’मधील तज्ज्ञांचा समावेश राहू शकतो.देशातील सर्व ‘आयआयएम’चा कारभार हा संचालकीय मंडळाच्या माध्यमातूनच चालतो. २०१३ च्या कंपनी कायद्यानुसार संचालक मंडळाची स्थापना करणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी लागते. संचालकीय मंडळाच्या स्थापनेशिवाय ‘आयआयएम-नागपूर’ची नोंदणी होऊ शकत नाही. त्यांनतर या मंडळाकडून संचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. संचालकच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. ही बाब लक्षात घेता ‘आयआयएम-अहमदाबाद’च्या प्रशासनाकडून सातत्याने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयासोबत संवाद साधण्यात येत आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटीने ‘आयआयएम-नागपूर’चे प्रकल्प समन्वयक ले. कर्नल (निवृत्त) मकरंद अलूर यांच्याकडे जागेचे वाटप पत्र सोपविले.संचालकीय मंडळासाठी काही नावे अंतिम करण्यात आली आहेत. येत्या महिन्याभरात चित्र स्पष्ट होईल. शिवाय ‘आयआयएम-नागपूर’च्या इमारतीचे भूमिपूजनदेखील डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊ शकते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.(प्रतिनिधी)दर्जा कायम राखण्यावर भरसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती ही लांबलचक व वेळखावू प्रक्रिया आहे. त्यामुळे तोपर्यंत ‘आयआयएम-अहमदाबाद’ येथील तज्ज्ञ शिक्षकच येथे वर्ग घेणार आहेत. शिवाय काही ‘व्हिजिटिंग’ प्राध्यापकदेखील राहतील. ‘आयआयएम’च्या शिक्षणप्रणालीचा दर्जा कायम राहावा यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.