शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणातून बचावला तलावांचा प्राणवायू; विसर्जनावर बंदीने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 14:59 IST

दरवर्षी विसर्जन काळात नागपूर शहरातील तलावांच्या विसर्जनाची चिंता लागलेली असते. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे कोणत्याही तलावावर विसर्जन करण्यास संपूर्ण निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे विसर्जन होणाऱ्या तलावांना प्रदूषणातून मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देफुटाळा, सोनेगाव सुखावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी विसर्जन काळात शहरातील तलावांच्या विसर्जनाची चिंता लागलेली असते. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे एकतर गणेशोत्सवावर बंधने आली आणि दुसरीकडे कोणत्याही तलावावर विसर्जन करण्यास संपूर्ण निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे विसर्जन होणाऱ्या तलावांना प्रदूषणातून मोठा दिलासा मिळाला. दरवर्षीच्या निरीक्षणानुसार विसर्जन होताच तलावातील प्राणवायूचा स्तर खाली जातो आणि त्यातील जैवविविधतेला धोका निर्माण होतो. यावेळी मात्र असे काही झाले नाही.

कौस्तुभ चटर्जी यांच्या नेतृत्वात ग्रीन व्हिजीलच्या टीमने केलेल्या निरीक्षणातून समाधानकारक स्थिती स्पष्ट होत आहे. तलाव किंवा नदीच्या पाण्यात ६ मिलिग्रॅम/लिटर आॅक्सिजनचे प्रमाण असणे आवश्यक आहे तरच तलावातील जैवविविधता सुरक्षित राहण्यास मदत होते. मात्र नागपूर शहरातील प्रमाण ४.५० ते ५ मिलिग्रॅम/लिटर नोंदविण्यात आले आहे. यावर्षीही संस्थेच्या टीमने गणेशोत्सवापूर्वी फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव व गांधीसागत तलावातील पाण्यात नोंदविलेले ऑक्सिजनचे प्रमाण एवढेच होते.

दरवर्षी विसर्जनापूर्वी ही स्थिती राहते, मात्र विसर्जन होताच हे प्रमाण २.५० ते ३ मिलिग्रॅमपर्यंत खाली येते. हे प्रमाण २ वर गेले तर तलावातील मासे, इतर प्राणी, वनस्पतींच्या मृत्युचे सत्र सुरू होते व जैवविविधता नष्ट होण्याची स्थिती निर्माण होते. सुदैवाने यावेळी विसर्जनच न झाल्याने बहुतेक तलाव हा धोका होण्यापासून बचावले. पूर्वी आणि आता केलेल्या तलावांच्या परीक्षणात फार फरक न झाल्याची माहिती चटर्जी यांनी लोकमतशी बोलताना दिली.सक्करदरा तलाव धोक्यात फुटाळा, सोनेगाव सुरक्षित असले तरी शहरातील ऐतिहासिक सक्करदरा तलाव धोक्यात आहे. येथील पाण्यात ३ मिलिग्रॅम/लिटर ऑक्सिजनचे प्रमाण असल्याचे ग्रीन व्हिजीलच्या निरीक्षणात आढळून आले. आसपासच्या वस्त्यांमधील सांडपाणी या तलावात सोडले जात आहे. त्यामुळे नायट्रोजन, फास्फरसचे प्रमाण वाढले असून जलकुंभी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तलावातील इतर जीवजंतू आता मृतप्राय होत आहेत. हीच परिस्थिती राहिली तर नाईक तलावाप्रमाणे या तलावाची गटारगंगा होईल, अशी भीती चटर्जी यांनी व्यक्त केली.म्हणून गांधीसागरमध्ये माशांचा मृत्यूगांधीसागर तलावात काही दिवसापूर्वी माशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या तलावाचे परीक्षण केले असता पाण्यातील नुकसानकारक वनस्पती (फायटोप्लॅन्क्टन्स) आणि प्राणी (झुप्लॅन्क्टन्स)चे प्रमाण वाढले आहे. शिवाय गांधीसागर व फुटाळा या दोन्ही तलावातील मासेमारी लॉकडाऊन काळात बंद असल्याने माशांची संख्या वाढली व अन्नाच्या कमतरतेमुळेही माशांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण ग्रीन व्हिजीलने नोंदविले. या निरीक्षणाला नीरी व मनपानेही दुजोरा दिल्याचे चटर्जी यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Waterपाणीpollutionप्रदूषण