शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

प्रदूषणातून बचावला तलावांचा प्राणवायू; विसर्जनावर बंदीने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 14:59 IST

दरवर्षी विसर्जन काळात नागपूर शहरातील तलावांच्या विसर्जनाची चिंता लागलेली असते. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे कोणत्याही तलावावर विसर्जन करण्यास संपूर्ण निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे विसर्जन होणाऱ्या तलावांना प्रदूषणातून मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देफुटाळा, सोनेगाव सुखावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी विसर्जन काळात शहरातील तलावांच्या विसर्जनाची चिंता लागलेली असते. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे एकतर गणेशोत्सवावर बंधने आली आणि दुसरीकडे कोणत्याही तलावावर विसर्जन करण्यास संपूर्ण निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे विसर्जन होणाऱ्या तलावांना प्रदूषणातून मोठा दिलासा मिळाला. दरवर्षीच्या निरीक्षणानुसार विसर्जन होताच तलावातील प्राणवायूचा स्तर खाली जातो आणि त्यातील जैवविविधतेला धोका निर्माण होतो. यावेळी मात्र असे काही झाले नाही.

कौस्तुभ चटर्जी यांच्या नेतृत्वात ग्रीन व्हिजीलच्या टीमने केलेल्या निरीक्षणातून समाधानकारक स्थिती स्पष्ट होत आहे. तलाव किंवा नदीच्या पाण्यात ६ मिलिग्रॅम/लिटर आॅक्सिजनचे प्रमाण असणे आवश्यक आहे तरच तलावातील जैवविविधता सुरक्षित राहण्यास मदत होते. मात्र नागपूर शहरातील प्रमाण ४.५० ते ५ मिलिग्रॅम/लिटर नोंदविण्यात आले आहे. यावर्षीही संस्थेच्या टीमने गणेशोत्सवापूर्वी फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव व गांधीसागत तलावातील पाण्यात नोंदविलेले ऑक्सिजनचे प्रमाण एवढेच होते.

दरवर्षी विसर्जनापूर्वी ही स्थिती राहते, मात्र विसर्जन होताच हे प्रमाण २.५० ते ३ मिलिग्रॅमपर्यंत खाली येते. हे प्रमाण २ वर गेले तर तलावातील मासे, इतर प्राणी, वनस्पतींच्या मृत्युचे सत्र सुरू होते व जैवविविधता नष्ट होण्याची स्थिती निर्माण होते. सुदैवाने यावेळी विसर्जनच न झाल्याने बहुतेक तलाव हा धोका होण्यापासून बचावले. पूर्वी आणि आता केलेल्या तलावांच्या परीक्षणात फार फरक न झाल्याची माहिती चटर्जी यांनी लोकमतशी बोलताना दिली.सक्करदरा तलाव धोक्यात फुटाळा, सोनेगाव सुरक्षित असले तरी शहरातील ऐतिहासिक सक्करदरा तलाव धोक्यात आहे. येथील पाण्यात ३ मिलिग्रॅम/लिटर ऑक्सिजनचे प्रमाण असल्याचे ग्रीन व्हिजीलच्या निरीक्षणात आढळून आले. आसपासच्या वस्त्यांमधील सांडपाणी या तलावात सोडले जात आहे. त्यामुळे नायट्रोजन, फास्फरसचे प्रमाण वाढले असून जलकुंभी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तलावातील इतर जीवजंतू आता मृतप्राय होत आहेत. हीच परिस्थिती राहिली तर नाईक तलावाप्रमाणे या तलावाची गटारगंगा होईल, अशी भीती चटर्जी यांनी व्यक्त केली.म्हणून गांधीसागरमध्ये माशांचा मृत्यूगांधीसागर तलावात काही दिवसापूर्वी माशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या तलावाचे परीक्षण केले असता पाण्यातील नुकसानकारक वनस्पती (फायटोप्लॅन्क्टन्स) आणि प्राणी (झुप्लॅन्क्टन्स)चे प्रमाण वाढले आहे. शिवाय गांधीसागर व फुटाळा या दोन्ही तलावातील मासेमारी लॉकडाऊन काळात बंद असल्याने माशांची संख्या वाढली व अन्नाच्या कमतरतेमुळेही माशांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण ग्रीन व्हिजीलने नोंदविले. या निरीक्षणाला नीरी व मनपानेही दुजोरा दिल्याचे चटर्जी यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Waterपाणीpollutionप्रदूषण