नागपूरकर फसले फसविणार्यांचे काय ? नागपूर : सेबीची परवानगी किंवा रिझर्व्ह बँकेचा परवाना नसलेल्या विविध वेल्थ मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्यांनी धुमाकूळ घालून नागपूरकरांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आहे. हा आकडा पाच हजार कोटींच्या घरात आहे. बोगस कंपन्यांनी घशात टाकलेल्या रकमेपैकी कुणाला किती रक्कम परत मिळाली, याचा खुलासा अद्यापही झालेला नाही. अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्व कंपन्यांची दामदुप्पट आणि व्याजदराच्या योजना सारख्याच आहेत. या बोगस कंपन्यांमध्ये आपण कोणत्या कायद्याखाली आयुष्यभराची पुंजी गुंतवीत आहोत, याची इत्थंभूत माहिती गुंतवणूकदार जोपर्यंत करून घेणार नाहीत, तोपर्यंत अग्रवाल, झामरे, मंचलवार, जोशी, वासनकर यासारखे अनेक जण बोगस कंपन्या उघडून खोटी माहिती देऊन लोकांना लुबाडत राहतील. त्यामुळे लोकांना गुंतवणुकीसंदर्भात जागरूक होण्याची गरज आहे, हे तितकेच खरे. उद्योजकांनाही १२ टक्के व्याजदर परवडणारा नाही, मग या बोगस कंपन्या ५0 टक्के व्याजदर देतात तरी कशा? फसविल्या गेलेल्यांमध्ये बहुतांश उच्चशिक्षित आहेत. गुंतवणूक करताना काय बघावे ंकंपनीला सेबी किंवा रिझर्व्ह बँकेची परवानगी आहे का? ंकंपनी देत असलेला व्याजदर खरंच व्यावहारिक आहे का? ंकंपनीने कुठे गुंतवणूक केली व रिटर्न खरंच मिळेल का? ंडी-मॅट अकाऊंटमध्ये तेवढय़ा रकमेचे शेअर जमा आहेत काय? ंकंपनीची यंत्रणा ज्ञानी आहे का? ंकंपनीच्या जाहिराती भपकेगिरीच्या आहेत काय?
उल्लू बनाविंग!
By admin | Updated: May 13, 2014 00:51 IST