शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

उद्यमशीलतेतूनच परिस्थितीवर मात

By admin | Updated: May 10, 2015 02:16 IST

शेतीक्षेत्रातील सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. परंतु या परिस्थितीला घाबरून पळून जाण्याऐवजी त्याचा सामना करून त्या परिस्थितीवर मात करायची

नागपूर : शेतीक्षेत्रातील सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. परंतु या परिस्थितीला घाबरून पळून जाण्याऐवजी त्याचा सामना करून त्या परिस्थितीवर मात करायची असेल तर त्यासाठी उद्यमशीलता हवी. परंतु सोबतच संवेदनशीलताही आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले. अ‍ॅग्रोव्हेट- अ‍ॅग्रोइंजिनियर्स मित्र परिवार आणि निर्मिती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी आयोजित प्रणय श्रावण पराते लिखित ‘भू-मेह’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना गडकरी बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री श्रावण पराते, प्रा. शरद पाटील,धनंजय धार्मिक, शिवनाथ बोरसे, बाबा डवरे, दिलीप मोहितकर आणि ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे व्यासपीठावर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांनी मी प्रभावित आहे. त्यांचे अनेक विचार डोळे उघडणारे आहेत. सरकार कुणाचेही असो शेतमालाला योग्य भाव कुणीही देऊ शकत नाही. गेली अनेक वर्षे तांदळाला एकच किंमत आहे. तीच परिस्थिती इतर पिकांचीही आहे. त्यामुळे जोडधंदा करण्याची गरज आहे. उद्यमशीलतेतूनच परिस्थिती बदलू शकते. त्यासाठी नवनवीन कल्पना राबविण्याची गरज आहे. गहू व धानाऐवजी एनर्जी क्रॉप काढा, बाजारात त्याला चांगली मागणी आहे. जागतिक बाजाराचा अंदाज घेऊन उत्पादन करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. नागपुरातील सावजी भोजन हे देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे दोसा, वडापाव, कॅफे याप्रमाणे सावजी भोजनाचाही ब्रॅण्ड तयार करून चेन तयार करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या देशात अनेक विचार आहेत, मतभिन्नता आहे. परंतु सर्वांचा उद्देश मात्र एकच आहे. तो म्हणजे या देशातील गरिबांना चांगले जगता यावे. तेव्हा एका उद्देशासाठी सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शरद निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भू-मेह हे पुस्तक नसून भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांमधून निर्माण झालेल्या सामाजिक परिणामांचा दस्तऐवज असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी राम आखरे, किशोर ठाकरे, सुनिता उकुंडे, किशोर जिचकार, संजय जैवार, प्रशांत सपाटे आणि स्वाती हुद्दार यांचा सत्कार करण्यात आला. संचालन संजय धोटे यांनी केले. प्रा. प्रकाश कडू यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)