शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उद्यमशीलतेतूनच परिस्थितीवर मात

By admin | Updated: May 10, 2015 02:16 IST

शेतीक्षेत्रातील सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. परंतु या परिस्थितीला घाबरून पळून जाण्याऐवजी त्याचा सामना करून त्या परिस्थितीवर मात करायची

नागपूर : शेतीक्षेत्रातील सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. परंतु या परिस्थितीला घाबरून पळून जाण्याऐवजी त्याचा सामना करून त्या परिस्थितीवर मात करायची असेल तर त्यासाठी उद्यमशीलता हवी. परंतु सोबतच संवेदनशीलताही आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केले. अ‍ॅग्रोव्हेट- अ‍ॅग्रोइंजिनियर्स मित्र परिवार आणि निर्मिती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी आयोजित प्रणय श्रावण पराते लिखित ‘भू-मेह’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना गडकरी बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री श्रावण पराते, प्रा. शरद पाटील,धनंजय धार्मिक, शिवनाथ बोरसे, बाबा डवरे, दिलीप मोहितकर आणि ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे व्यासपीठावर उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांनी मी प्रभावित आहे. त्यांचे अनेक विचार डोळे उघडणारे आहेत. सरकार कुणाचेही असो शेतमालाला योग्य भाव कुणीही देऊ शकत नाही. गेली अनेक वर्षे तांदळाला एकच किंमत आहे. तीच परिस्थिती इतर पिकांचीही आहे. त्यामुळे जोडधंदा करण्याची गरज आहे. उद्यमशीलतेतूनच परिस्थिती बदलू शकते. त्यासाठी नवनवीन कल्पना राबविण्याची गरज आहे. गहू व धानाऐवजी एनर्जी क्रॉप काढा, बाजारात त्याला चांगली मागणी आहे. जागतिक बाजाराचा अंदाज घेऊन उत्पादन करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. नागपुरातील सावजी भोजन हे देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे दोसा, वडापाव, कॅफे याप्रमाणे सावजी भोजनाचाही ब्रॅण्ड तयार करून चेन तयार करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या देशात अनेक विचार आहेत, मतभिन्नता आहे. परंतु सर्वांचा उद्देश मात्र एकच आहे. तो म्हणजे या देशातील गरिबांना चांगले जगता यावे. तेव्हा एका उद्देशासाठी सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शरद निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भू-मेह हे पुस्तक नसून भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांमधून निर्माण झालेल्या सामाजिक परिणामांचा दस्तऐवज असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी राम आखरे, किशोर ठाकरे, सुनिता उकुंडे, किशोर जिचकार, संजय जैवार, प्रशांत सपाटे आणि स्वाती हुद्दार यांचा सत्कार करण्यात आला. संचालन संजय धोटे यांनी केले. प्रा. प्रकाश कडू यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)