शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

उन्नत शेतीतून ६,३९० शेतकरी समृद्धीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 15:52 IST

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याकरिता शासनाने राबविलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानातून वर्धा जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ३९० शेतकऱ्यांनी समृद्धीची वाट धरल्याचे दिसून आले आहे.

रूपेश खैरी। वर्धा : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याकरिता शासनाने राबविलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानातून वर्धा जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ३९० शेतकऱ्यांनी समृद्धीची वाट धरल्याचे दिसून आले आहे. शेती शेतकऱ्यांची, तंत्रासह बियाणे आमचे; पण उत्पन्न तुमचे असे म्हणत शासनाने राज्यात हे अभियान सुरू केले आहे. या अभियानातून शेतकऱ्यांना लागवड व पेरणीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे.या अभियानात सहभागी शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञ प्रशिक्षण देत असून त्यांच्या मार्गदर्शनातून वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १ हजार ५६० हेक्टरवर विकसित तंत्राने शेती सुरू आहे. शेतकऱ्यांकडून वापरण्यात येत असलेल्या बियाण्यांच्या क्षमतेनुसार उत्पादनाचें उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अभियानात प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांकडूनच दुसऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचाही प्रयोग होत आहे. यातून शेतकऱ्यांचा विश्वास वाढणार असल्याचेही कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. अभियानात सहभागी शेतकऱ्यांना शासनाच्या कंपनीचे बियाणे देण्यात आले आहे. या बियाण्यावर काही शेतकऱ्यांनी अविश्वास दर्शविल्याने त्यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे वापरण्याचीही मुभा देण्यात आली आहे. याची रक्कम शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून परत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अभियानात सोयाबीन व तुरीचाच पेरा च्अभियानात आतापर्यंत ४ हजार ५२५ हेक्टरवर सोयाबीन आणि १ हजार ८७५ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे. येथे बियाण्याच्या उत्पादन क्षमतेनुसार शेतकऱ्यांनी त्यांना यंदा किती उत्पन्न होईल याचा अंदाज बांधला आहे. त्यांची त्याच दिशेने वाटचालही सुरू आहे. यात शेतकऱ्यांना किती उत्पादन होणार हे हंगामाच्या अखेरीच कळणार आहे.शेतकऱ्यांची शासकीय बियाण्यांकडे पाठ च्शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या अभियानात सहभागी शेतकऱ्यांना महाबीज, कृभको आणि राष्ट्रीय बीज निगमच्या बियाण्यांचा वापर करण्याच्या सूचना होत्या. मात्र शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्यांवर अविश्वास दर्शवित ते बियाणे वापरण्यास नकार देत ती बियाणे परत केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीची बियाणे वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या अभियानात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत त्यांच्या शेतात कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून पेरा करण्यात येत आहे. यात वापरण्यात येत असलेल्या बियाण्याच्या क्षमतेनुसार उत्पादनाचे उद्दिष्ट ठरविण्यात येत आहे. वर्धेत या अभियानाला शेतकऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळत आहे. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.