शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तलाठी कार्यालयांचे थकीत भाडे १० लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:09 IST

शरद मिरे भिवापूर : किरायाने राहणारे भाडेकरू नियमीत भाडे देत नसल्याच्या तक्रारी ऐकिवात आहे. प्रसंगी असे प्रकरण पोलिसातही पोहोचल्याच्या ...

शरद मिरे

भिवापूर : किरायाने राहणारे भाडेकरू नियमीत भाडे देत नसल्याच्या तक्रारी ऐकिवात आहे. प्रसंगी असे प्रकरण पोलिसातही पोहोचल्याच्या घटना आहेत. मात्र शासनाचे अधिकृत तलाठी कार्यालये पाच-पाच वर्ष घरभाडे थकीत ठेवत असेल तर याची तक्रार करायची कुणाकडे, हा प्रश्नच आहे. कारण तालुक्यात किरायाच्या घरात तलाठी कार्यालय असलेल्या १५ गावातील १८ घरमालकांच्या थकीत रकमेचा आकडा १० लाखाच्या घरात आहे. त्यामुळे ही थकबाकी मिळणार कधी, हा प्रश्नच आहे. तालुक्यातील बहुतांश सर्वच तलाठी साजामध्ये तलाठी कार्यालये किरायाच्या घरात आहे. त्यासाठी घरमालकाला एक हजार रुपये प्रति महिना घरभाडे दिल्या जाते. मात्र तालुक्यातील १५ गावांमध्ये किरायाच्या घरात असलेल्या तलाठी कार्यालयाचे घरभाडे गत पाच वर्षांपासून घरमालकाला देण्यात आलेले नाही. यात झमकोली, भगवानपूर, पिरावा, बेसूर, मांगरुळ, पाहमी, गोंडबोरी, सालेभट्टी, थूटानबोरी, अड्याळ, कारगाव, वासी, धामणगाव (वि.म.), तास व भिवापूर अशाप्रकारे १५ साजातील तलाठी कार्यालयाचे भाडे जुलै २०१५ ते मार्च २०२१ पर्यंत थकीत आहे. थकीत भाड्याची रक्कम १० लाख ३२ हजार रुपयाच्या घरात आहे. गत पाच वर्षांपासून किराया मिळत नसल्याने असला सरकारी भाडेकरू कोणत्या कामाचा, असा सूर घरमालकांकडून आळवला जात आहे. याबाबत काही घरमालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत थकीत घरभाडे तात्काळ देण्याची मागणीही केली आहे.

असा आहे थकीत रकमेचा आकडा

तालुक्यात १५ साजातील तलाठी कार्यालयाचे थकीत भाडे १० लाख ३२ हजार रुपये इतके आहे. साजानिहाय घरमालक व थकीत रक्कम पुढीलप्रमाणे आहे. रंजना वाकडे (३६-झमकोली), वाय.के. नन्नावरे (४०-भगवानपूर), आर.व्ही. चुटे (४०-अ-पिरावा), राजेश मुंडले (४४-मांगरुळ), परसराम पिल्लेवान (८२-पाहमी) प्रत्येकी ६९ हजार रुपये भाडे थकीत, जयंत दाणी (४१-बेसूर) ३८ हजार रुपये, रंजना कुकडे (४१-बेसूर) ३१ हजार रुपये, सुरेंद्र काकडे (८७-गोंडबोरी), मनमोहित घोडेस्वार (७६-अ-थूटानबोरी), राजपूत तांबे (७७-अड्याळ), बी.टी. राऊत (८०-कारगाव), खुशाल गजभिये (८६-वासी), शालू मेश्राम (९०-धामणगाव) यांचे प्रत्येकी ७० हजार रुपये भाडे थकीत आहे. आनंद जनबंधू (७८-भिवापूर ) ४० हजार रुपये, विलास सहारे (७८-भिवापूर) ३० हजार रुपये, टा.क. देशमुख (७५-सालेभट्टी) १२ हजार रुपये, दारुबाबाई शेंडे (७५-सालेभट्टी) ५८ हजार रुपये, पंचमसिंग मोरे (७९-तास) यांचे ५८ हजार रुपये घरभाडे थकीत आहे.

थकीत १० लाख आणि मिळाले १५ हजार

तलाठी कार्यालयाच्या भाड्याची देय रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयाला प्राप्त होते. मात्र गत पाच वर्षांपासून घरभाड्याची देय असलेली आवश्यक पूर्ण रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली नाही. परिणामी थकीत घरभाड्याचा आकडा वाढत गेला. तालुक्यात १५ तलाठी साजातील १८ घरमालकांचे तब्बल १० लाख ३२ हजार रुपये घरभाडे थकीत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केवळ १५ हजार रुपये तहसील कार्यालयाला प्राप्त झाले. त्यामुळे १५ हजार रुपये १८ घरमालकांना देणार कसे, हा प्रश्नच आहे.