शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

बातमीच्या पलीकडे ‘आऊट लुक ’ करणारा एडिटर

By admin | Updated: March 9, 2015 01:51 IST

ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता यांच्या निधनाची बातमी कळली आणि साऱ्या

मोईज मन्नान हक ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता यांच्या निधनाची बातमी कळली आणि साऱ्या आठवणींचा पट माझ्या डोळ्यासमोर आला. अनेकदा एखादा माणूस आपल्यासोबत असतो तेव्हा त्याचे मोठेपण काय आहे? याचा विचारही आपण करीत नाही. पण त्या माणसाला आपण हरवितो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्याला कळतात. विनोद मेहता म्हणजे असेच व्यक्तिमत्त्व. बातमीसाठीही अभ्यास करावा लागतो आणि पत्रकाराची नजर इतरांपेक्षा वेगळी असावी लागते, हे शिकविणारा माणूस तो होता. बातमी कुठल्याही प्रदेशाची असो बातमीवर प्रामाणिक प्रेम करणारे संपादक म्हणजे विनोद मेहता होते. पत्रकारितेच्या प्रारंभीच्या काळात मला कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची इच्छा होती. मी व्यवस्थापनशास्त्राची पदवी घेतली होती. पण अगदीच नवीन असल्याने काही काळ पत्रकारिता करण्याचे मी ठरविले. ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांच्याशी ओळख होती. तेव्हा ते मुंबईला इंडियन पोस्टमध्ये मुख्य वार्ताहर होते आणि विनोद मेहता संपादक होते. तेथे मी मुलाखतीसाठी गेलो. भारतकुमार राऊत यांच्याकडे मी विनोद मेहता यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आत फोन केला तेव्हा मेहता खूप व्यस्त होते. पण त्यांनी पाच मिनिटांसाठी मला बोलाविले आणि तब्बल दीड तास विदर्भाच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. त्यांचा एवढा अभ्यास पाहून मी प्रभावित झालो. त्यानंतर त्यांनीच मला इंडियन पोस्टचे विदर्भ करस्पॉन्डट म्हणून रुजू करून घेतले. त्यांचे व्हिजन ग्लोबल होते. विदर्भातल्या समस्यांना त्यांनी मुंबईच्या वर्तमानपत्रात महत्त्वाचे स्थान दिले. विदर्भाच्या माझ्या बातम्यांवर त्यांनी कधीच अन्याय केला नाही. सीताबर्डीच्या आर्मी बटालियनच्या जागेवर झोपडपट्टी वसली होती. रात्री आर्मीच्या लोकांनी झोपडपट्टी हटविली आणि गरीब नागरिकांना ते मारहाण करायला लागले. त्यावेळी खा. बनवारीलाल पुरोहित झोपडपट्टीवासीयांच्या बाजूने उभे राहिले. ही बातमी डेव्हलप होत असताना मी मेहतांना फोन केला. त्यांनी बातमी पाठवण्याचे सांगितले. बराच वेळ प्रयत्न केल्यावर माझ्या हाती बातमी लागली. पण या बातमीसाठी त्यांनी प्रथम पानावर जागा राखून ठेवली होती. त्यादिवशी पेपरच्या प्रिंटिंगलाही उशीर झाला, पण त्यांनी ही बातमी मोठी घेतली होती. पुरोगामी विचारांचे मेहता माझ्या पिढीसाठी आदर्शच होते. लहान माणसांशीही सतत संपर्क ठेवून राहणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या जाण्याचे दु:ख आहे. (लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे सहायक प्राध्यापक आहेत.)